शहरं
Join us  
Trending Stories
1
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
2
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
3
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
4
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
5
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
6
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
7
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
8
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
9
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
10
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
11
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
12
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
13
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
14
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
15
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
16
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
17
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा
18
Viral Video: ट्रेनमधून प्रवास करताना कधीच 'अशी' चूक करू नका; जीवघेणी घटना कॅमेऱ्यात कैद!
19
Tulsi Vivah 2025 Wishes: तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Images, Whatsapp Status शेअर करून आमंत्रित करा आपल्या नातेवाईकांना
20
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार

विमानसेवेमुळे ‘अब दिल्ली दूर नहीं’; वर्षभरात लाखांवर विमान प्रवास्यांची राजधानीत ये-जा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2022 17:44 IST

मुंबई-औरंगाबाद-मुंबई मार्गावर प्रवाशांची संख्या लाखाच्या जवळ

औरंगाबाद : औरंगाबादहूनदिल्लीसाठी एअर इंडिया आणि इंडिगोची विमानसेवा सुरू आहे. या विमानसेवेमुळेदिल्लीला अवघ्या २ तासांत पोहोचणे शक्य झाले आहे. मागील वर्षभरात एक लाखांवर प्रवाशांनी दिल्लीला विमानाने ये-जा केली, तर मुंबई-औरंगाबाद-मुंबई मार्गावरील प्रवाशांची संख्या लाखाच्या जवळ आहे.

औरंगाबादहून सध्या दिल्ली, मुंबई आणि हैदराबादसाठी विमानसेवा सुरू आहे. कोरोनामुळे बंगळुरु आणि अहमदाबादची विमानसेवा खंडित झाली आहे. दिल्लीला जाण्यासाठी आजघडीला सचखंड एक्सप्रेस आहे. रेल्वेबरोबर दिल्लीसाठी हवाई कनेक्टिव्हिटीही उपलब्ध आहे. गतवर्षी सकाळच्या वेळेतही दिल्लीसाठी विमान सुरू झाले होते. त्यामुळे सकाळी दिल्लीला जाऊन सायंकाळी परतही येता येत होते. परंतु, तिसऱ्या लाटेमुळे दिल्लीचे सकाळचे विमान बंद झाले. सध्या सायंकाळीच विमान आहे. मुंबईसाठी रेल्वेची कनेक्टिव्हिटी आहे. त्याबरोबरच विमानानेही मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची मोठी संख्या आहे.

शहरातील आयटी आणि उद्योग क्षेत्रासह बंगळुरु येथे शिक्षण घेणाऱ्या, नोकरी करणाऱ्यांसाठी विमानसेवा महत्त्वपूर्ण ठरते. कोरोनामुळे ही विमान सेवा खंडित झाली होती. परंतु, पहिली लाट ओसरल्यानंतर ही विमानसेवा डिसेंबर २०२०मध्ये पुन्हा सुरू झाली होती. परंतु, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे ही विमानसेवा पुन्हा बंद पडली. बंगळुरु विमानसेवेसह अहमदाबादसाठी विमानसेवा सुरू होण्याची प्रवाशांना प्रतीक्षा करावी लागत आहे.

कनेक्टिंग फ्लाईटने गाठली ही शहरेऔरंगाबादेतून दिल्ली, मुंबईला विमानाने गेल्यानंतर कनेक्टिंग फ्लाईटने इतर शहरही गाठले जाते. गेल्या वर्षभरात चेन्नईला १२४१, कोलकाता येथे ४४७, जयपूर येथे ३४२ आणि वडोदरा येथे ३ प्रवाशांनी प्रवास केला.

बंगळुरुसाठी सुरू व्हावी पुन्हा विमानसेवाबंगळुरुसाठी पुन्हा एकदा विमानसेवा सुरू होणे आवश्यक आहे. औरंगाबादहून बंगळुरूसाठी १८० आसनी विमान आठवड्यातून २ दिवस किंवा ७२ आसनी विमान आठवड्यातून ५ दिवस सुरू केले तर प्रवाशांची सुविधा होईल. त्याबरोबर हैदराबादला जाणारे विमान सध्या प्रवाशांनी भरून जात आहे. हैदराबादसाठी आता मोठे विमान सुरू करणे गरजेचे आहे, असे औरंगाबाद एअर कनेक्टिव्हिटी एव्हिएशन ग्रुपचे अक्षय चाबूकस्वार म्हणाले.

सन २०२१मधील विमान प्रवाशांची संख्या (येणारे आणि जाणारे एकत्रित)शहर - विमान प्रवासीदिल्ली - १,११,९३२मुंबई - ९३,०१७हैदराबाद - ३०,१६१बंगळुरु - ६,९४१अहमदाबाद - ४,१६७

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादairplaneविमानdelhiदिल्लीAurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ