शहरं
Join us  
Trending Stories
1
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
2
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
3
Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले
4
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
5
दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन
6
सोनं-शेअर्स विसरा! चांदीने दिला सर्वाधिक परतावा, किंमत १.११ लाख रुपयांवर, अजून किती वाढणार?
7
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
8
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
9
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
10
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
11
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
12
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
13
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
14
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
15
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
16
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
17
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
18
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
19
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
20
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...

गतवर्षी कमी पाऊस झाल्याने उन्हाळी पिकाचे क्षेत्रही निम्म्यावर

By बापू सोळुंके | Updated: March 28, 2024 17:47 IST

यंदा जायकवाडी प्रकल्पातून उन्हाळी पिकांसाठी पाणी न देण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला. यामुळे सुमारे ४५ टक्के शेतकऱ्यांनीही उन्हाळी पिकांसाठी पेरणी न करण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येते.

छत्रपती संभाजीनगर : गतवर्षी अत्यल्प पाऊस झाल्याचा परिणाम आता स्पष्टपणे दिसू लागला आहे. धरणे आणि विहिरी आटल्याने मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांतील उन्हाळी पिकांची सरासरी पेरणी निम्म्यावर आली आहे.

विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयांतर्गत असलेल्या छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड या जिल्ह्यांत दरवर्षी उन्हाळ्यात सर्वसाधारणपणे ३२ हजार ६५८ हेक्टर क्षेत्रावर उन्हाळ्यात ज्वारी, मका, बाजरी, भुईमूग, सोयाबीन आणि सूर्यफूल या पिकांची पेरणी केली जाते. दरवर्षी जलसंपदा विभागाकडून त्यांच्या आधिपत्याखालील धरणांमधून उन्हाळी पिकांसाठी पाटाचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पुरविले जाते. मात्र, गतवर्षी मुसळधार पाऊस न झाल्याने नदी, नाले भरले नव्हते. परिणामी लहान, मोठ्या धरणांमध्ये पाणी न साचल्याने शिल्लक पाण्याचा वापर केवळ पिण्यासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला.

यंदा जायकवाडी प्रकल्पातून उन्हाळी पिकांसाठी पाणी न देण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला. यामुळे सुमारे ४५ टक्के शेतकऱ्यांनीही उन्हाळी पिकांसाठी पेरणी न करण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सरासरी १४ हजार हेक्टरवर उन्हाळी पिकांची पेरणी होते. यावर्षी केवळ ८ हजार ९०० हेक्टरवर उन्हाळी पिकांची पेरणी झाली. जालना जिल्ह्यात सरासरी १० हजार हेक्टर उन्हाळी पिकाचे क्षेत्र आहे. प्रत्यक्षात या जिल्ह्यात केवळ १,५४२ हेक्टरवर आतापर्यंत पेरणी झाली. बीड जिल्ह्यात सरासरी ७ हजार ४५५ हेक्टर उन्हाळी पिकाचे क्षेत्र आहे. बीड जिल्ह्यात १०२ टक्के क्षेत्रावर पेरणी झाल्याचे कृषी विभागाच्या आकडेवारीवरून दिसून येते.

‘असे’ शेतकरीच उन्हाळी पिके घेतातज्या शेतकऱ्यांकडे शेततलाव पाण्याने भरलेले आहेत, ज्यांच्या विहिरींना बाराही महिने उत्तम असा जलस्रोत आहे, असे शेतकरीच उन्हाळी पिके घेतात, असे कृषी सहसंचालक डॉ. तुकाराम मोटे यांनी सांगितले. गतवर्षी पाऊस कमी झाला होता, यामुळे उन्हाळी पिकाचे क्षेत्रही घटले आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रWaterपाणी