शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
‘भाजपा ४०० जागा कदाचित चंद्रावर जिंकेल, भारतात मात्र…’ आदित्य ठाकरेंचा खोचक टोला 
3
....तोपर्यंत तपास यंत्रणा वकिलांना समन्स बजावू शकत नाहीत; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
4
आता उगाच उठून सोशल मीडियावर काहीही बोलता येणार नाही! 'या' देशाने इन्फ्लुएन्सर्सबाबतीत घेतला मोठा निर्णय
5
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
6
१ कोटी रुपयांचं घर घेण्यासाठी तुमची मिनिमम सॅलरी किती असली पाहिजे? पाहा काय म्हणताहेत एक्सपर्ट्स
7
'काँग्रेसमुळे जम्मू-काश्मीरचा एक भाग पाकिस्तानात गेला', पंतप्रधान मोदींचा घणाघात...
8
Swami Samartha: घरातील देवांची मूर्ती, प्रतिमा यातील चैतन्य कसे ओळखावे? उपासना कशी वाढवावी? वाचा
9
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
10
घर घ्यायचंय? फ्लॅट घेताना स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशनचा खर्च किती येतो? कुठे होईल पैशांची बचत
11
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
12
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
13
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
14
World Cup 2025 FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
15
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
16
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
17
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
18
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
19
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
20
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग

गतवर्षी कमी पाऊस झाल्याने उन्हाळी पिकाचे क्षेत्रही निम्म्यावर

By बापू सोळुंके | Updated: March 28, 2024 17:47 IST

यंदा जायकवाडी प्रकल्पातून उन्हाळी पिकांसाठी पाणी न देण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला. यामुळे सुमारे ४५ टक्के शेतकऱ्यांनीही उन्हाळी पिकांसाठी पेरणी न करण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येते.

छत्रपती संभाजीनगर : गतवर्षी अत्यल्प पाऊस झाल्याचा परिणाम आता स्पष्टपणे दिसू लागला आहे. धरणे आणि विहिरी आटल्याने मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांतील उन्हाळी पिकांची सरासरी पेरणी निम्म्यावर आली आहे.

विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयांतर्गत असलेल्या छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड या जिल्ह्यांत दरवर्षी उन्हाळ्यात सर्वसाधारणपणे ३२ हजार ६५८ हेक्टर क्षेत्रावर उन्हाळ्यात ज्वारी, मका, बाजरी, भुईमूग, सोयाबीन आणि सूर्यफूल या पिकांची पेरणी केली जाते. दरवर्षी जलसंपदा विभागाकडून त्यांच्या आधिपत्याखालील धरणांमधून उन्हाळी पिकांसाठी पाटाचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पुरविले जाते. मात्र, गतवर्षी मुसळधार पाऊस न झाल्याने नदी, नाले भरले नव्हते. परिणामी लहान, मोठ्या धरणांमध्ये पाणी न साचल्याने शिल्लक पाण्याचा वापर केवळ पिण्यासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला.

यंदा जायकवाडी प्रकल्पातून उन्हाळी पिकांसाठी पाणी न देण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला. यामुळे सुमारे ४५ टक्के शेतकऱ्यांनीही उन्हाळी पिकांसाठी पेरणी न करण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सरासरी १४ हजार हेक्टरवर उन्हाळी पिकांची पेरणी होते. यावर्षी केवळ ८ हजार ९०० हेक्टरवर उन्हाळी पिकांची पेरणी झाली. जालना जिल्ह्यात सरासरी १० हजार हेक्टर उन्हाळी पिकाचे क्षेत्र आहे. प्रत्यक्षात या जिल्ह्यात केवळ १,५४२ हेक्टरवर आतापर्यंत पेरणी झाली. बीड जिल्ह्यात सरासरी ७ हजार ४५५ हेक्टर उन्हाळी पिकाचे क्षेत्र आहे. बीड जिल्ह्यात १०२ टक्के क्षेत्रावर पेरणी झाल्याचे कृषी विभागाच्या आकडेवारीवरून दिसून येते.

‘असे’ शेतकरीच उन्हाळी पिके घेतातज्या शेतकऱ्यांकडे शेततलाव पाण्याने भरलेले आहेत, ज्यांच्या विहिरींना बाराही महिने उत्तम असा जलस्रोत आहे, असे शेतकरीच उन्हाळी पिके घेतात, असे कृषी सहसंचालक डॉ. तुकाराम मोटे यांनी सांगितले. गतवर्षी पाऊस कमी झाला होता, यामुळे उन्हाळी पिकाचे क्षेत्रही घटले आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रWaterपाणी