शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कामचुकार अधिकाऱ्यांमुळे बट्ट्याबोळ !

By admin | Updated: May 6, 2017 00:16 IST

उस्मानाबाद :बिनकामाच्या बुजगावण्या अधिकाऱ्यांमुळे या योजनांचा पुरता बट्ट्याबोळ झाल्याची संतप्त भावना विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी व्यक्त केली

लोकमत न्यूज नेटवर्कउस्मानाबाद : शेतकऱ्यांचा आर्थिकस्तर उंचावला जावा, यासाठी शासन विविध योजना आखत आहे. परंतु, बिनकामाच्या बुजगावण्या अधिकाऱ्यांमुळे या योजनांचा पुरता बट्ट्याबोळ झाल्याची संतप्त भावना विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी व्यक्त केली. रोजगार हमी, जलयुक्त शिवार या लोकहिताच्या योजना तळमळीने राबवायची गरज होती. मात्र अधिकाऱ्यांनी झोपा काढण्यात धन्यता मानली. अशा अधिकाऱ्यांना लाजाही वाटत नाहीत अशा संतप्त शब्दात त्यांनी अधिकाऱ्यांची खरडपट्टी केली. यापुढे अशा अधिकारी, कर्मचाऱ्यांची गय करणार नसल्याचा दमही त्यांनी यावेळी भरला. भापकर यांच्या या रूद्रावतारामुळे अधिकारी, कर्मचारी अक्षरश: घामाघूम झाल्याचे चित्र होते.नगर परिषदेच्या नाट्यगृहामध्ये जिल्ह्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची शुक्रवारी कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर जि.प. अध्यक्ष नेताजी पाटील, जिल्हाधिकारी आर. व्ही. गमे, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते, उपायुक्त विजयकुमार फड, पारस बोथ्रा, पटवारे, कुंभार, अधीक्षक कृषी अधिकारी शिरीष जमदाडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील यादव, प्रभोदय मुळे, अरविंद लाटकर आदी उपस्थित होते. कार्यशाळेच्या सुरूवातीला आयुक्तांनी विविध योजनांचा आढावा घेतला. अधिकाऱ्यांची निराशाजनक कामगिरी पाहून आयुक्तांचा पारा चढला. उस्मानाबाद हा दुष्काळी जिल्हा आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलित आहेत. त्यामुळे शासनाने ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना आणली. परंतु, कृषी यंत्रणेने या योजनेची पुरती वाट लावल्याचे सांगत ‘आपल्या पैकी किती कृषी सहाय्यकांनी १०० शेततळी पूर्ण केली’? असा प्रश्न करीत त्यांनी हात वर करावा, असे सांगितले. परंतु, एकाही सहाय्यकाचा हात वर दिसला नाही. त्यानंतर भापकर यांनी ‘आपल्या पैकी किती जणांनी पन्नास शेततळी पूर्ण केली’? अशी विचारणा केली. यावेळीही एकाही सहाय्यकाचा हात वर झाला नाही. यावर आयुक्तांच्या रागाचा पारा चढला. अन्य एका जिल्ह्यातील महिला कर्मचारी दोनशे शेततळी पूर्ण करते आणि उस्मानाबादमध्ये ५० शेततळी पूर्ण करणारा एकही कर्मचारी नाही. ही बाब लाजिरवाणी असल्याचे सांगत ‘आपण झोपा काढता काय? हे पाप कोणाचे? अशा शब्दात अधिकारी, कर्मचाऱ्यांची त्यांनी कानउघाडणी केली. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून अकरा कलमी कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. परंतु, या योजनेची गतीही फारशी समाधानकारक नाही. विहिरींची कामे ठप्प झाली आहेत. फळझाडे लागवडीच्या कामातही जिल्हा पिछाडीवर आहे. त्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांना जिल्ह्याबाबत आत्मीयता आहे की नाही, असा सवाल उपस्थित करीत यापुढे हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही. जे अधिकारी, कर्मचारी झोपेचे सोंग घेऊन वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करतील, त्यांच्याविरूद्ध थेट कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. जिल्ह्यातील ९० पेक्षा अधिक ग्रामपंचायतींमध्ये रोजगार हमी योजनेचा खर्च शून्य टक्के आहे. या ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांविरूद्ध थेट कारवाईचे संकेत त्यांनी यावेळी दिले. शासकीय कामावर येणाऱ्या मजुरांना श्रमाचा मोबदला सहा-सहा महिने मिळत नसेल तर ते कामावर येतील कशासाठी, असा सवाल करीत मजुरांच्या श्रमाचा सन्मान करायला शिका. मजुरांना मजूर म्हणून नका तर लाभार्थी संबोधा, असा सल्लाही त्यांनी दिला.पहिल्याच बैठकीत आयुक्त भापकर यांचा रूद्रावतार पाहून कामचुकार अधिकारी, कर्मचाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. बैठकीच्या प्रारंभी जिल्हाधिकारी गमे यांनी प्रास्ताविक केले. तर अपर जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी उपस्थितांचे आभार मानले.