शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर काँग्रेस पक्षाला थेट आरोपी बनवता येईल"; नॅशनल हेराल्ड प्रकरणात EDचा न्यायालयात दावा
2
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मोठा धक्का, सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा!
3
"माझ्यासमोरच त्याने तिघांना मारलंय"; वाल्मिक कराडच्या जुन्या सहकाऱ्याचा धक्कादायक दावा; म्हणाले, "त्याला बीडचा..."
4
"लग्न करुन येऊ? घर देणार का मग?", अ‍ॅक्टर असल्यामुळे मिळत नाहीये घर, पूजा कार्तुडे संतापली!
5
...तर अशी भागणार पाकिस्तानची तहान; सिंधू जल करार रद्द केल्यानंतर शहबाज शरीफ मोठं पाऊल उचलणार!
6
“उद्धव ठाकरे ‘मातोश्री’चा एक हिस्सा काढून राज ठाकरेंना देणार का?”; नारायण राणेंचा सवाल
7
ENG vs IND : यशस्वी जैस्वाल इंग्लंडला नडला अन् कॅप्टन बेन स्टोक्सलाही भिडला; नेमकं काय घडलं?
8
५ जुलैच्या ठाकरे बंधूंच्या विजयी सभेत सहभागी होणार का? काँग्रेस नेत्यांचे सूचक विधान, म्हणाले...
9
काँग्रेस मजबूत करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष सपकाळांचा पुढाकार; ८३ तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या
10
KL राहुलला विश्वासच बसेना! क्रिस वोक्सनं अप्रतिम चेंडूवर उडवला त्रिफळा (VIDEO)
11
मुसळधार पावसात AC सुरू ठेवणं योग्य आहे का? बहुतेक लोक करतात 'ही' चूक
12
राहुल आणि सोनिया गांधींनी केलेला २००० कोटी रुपये लाटण्याचा प्रयत्न; ईडीचा मोठा आरोप
13
भयंकर! कुत्रा चावल्यामुळे कबड्डीपटूचा तडफडून मृत्यू; अँटी रेबीज इंजेक्शन न घेणं बेतलं जीवावर
14
लग्नाआधीच अनेकदा तुझ्या रूममध्ये का दिसायची रितिका? भज्जीच्या प्रश्नावर रोहित शर्माचं भन्नाट उत्तर
15
कोलकाता: 'तो' बलात्कार होता तर आरोपीच्या अंगावर 'लव्ह बाईट्स' कसे? वकिलाचा धक्कादायक सवाल
16
काय वाटले असेल...? एनआयटी टॉपरला ४५ लाखांचे पॅकेज मिळाले अन् अचानक नोकरीवरून काढले...
17
Pitru Paksha 2025: यंदा पितृपक्षावर दोन ग्रहणांचे सावट; श्राद्धविधीत होणार अडचण? 
18
३ कोटी २० लाख सरकारी निधी हडपण्याचा डाव उघड; आमदार प्रसाद लाड यांचा खळबळजनक आरोप
19
अवघी दिल्ली एवढी लोकसंख्या, तरीही भारताच्या दृष्टीने 'घाना' देश महत्त्वाचा! कारण तरी काय?
20
सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीची चमकही झाली कमी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवी किंमत

कामचुकार अधिकाऱ्यांमुळे बट्ट्याबोळ !

By admin | Updated: May 6, 2017 00:16 IST

उस्मानाबाद :बिनकामाच्या बुजगावण्या अधिकाऱ्यांमुळे या योजनांचा पुरता बट्ट्याबोळ झाल्याची संतप्त भावना विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी व्यक्त केली

लोकमत न्यूज नेटवर्कउस्मानाबाद : शेतकऱ्यांचा आर्थिकस्तर उंचावला जावा, यासाठी शासन विविध योजना आखत आहे. परंतु, बिनकामाच्या बुजगावण्या अधिकाऱ्यांमुळे या योजनांचा पुरता बट्ट्याबोळ झाल्याची संतप्त भावना विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी व्यक्त केली. रोजगार हमी, जलयुक्त शिवार या लोकहिताच्या योजना तळमळीने राबवायची गरज होती. मात्र अधिकाऱ्यांनी झोपा काढण्यात धन्यता मानली. अशा अधिकाऱ्यांना लाजाही वाटत नाहीत अशा संतप्त शब्दात त्यांनी अधिकाऱ्यांची खरडपट्टी केली. यापुढे अशा अधिकारी, कर्मचाऱ्यांची गय करणार नसल्याचा दमही त्यांनी यावेळी भरला. भापकर यांच्या या रूद्रावतारामुळे अधिकारी, कर्मचारी अक्षरश: घामाघूम झाल्याचे चित्र होते.नगर परिषदेच्या नाट्यगृहामध्ये जिल्ह्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची शुक्रवारी कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर जि.प. अध्यक्ष नेताजी पाटील, जिल्हाधिकारी आर. व्ही. गमे, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते, उपायुक्त विजयकुमार फड, पारस बोथ्रा, पटवारे, कुंभार, अधीक्षक कृषी अधिकारी शिरीष जमदाडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील यादव, प्रभोदय मुळे, अरविंद लाटकर आदी उपस्थित होते. कार्यशाळेच्या सुरूवातीला आयुक्तांनी विविध योजनांचा आढावा घेतला. अधिकाऱ्यांची निराशाजनक कामगिरी पाहून आयुक्तांचा पारा चढला. उस्मानाबाद हा दुष्काळी जिल्हा आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलित आहेत. त्यामुळे शासनाने ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना आणली. परंतु, कृषी यंत्रणेने या योजनेची पुरती वाट लावल्याचे सांगत ‘आपल्या पैकी किती कृषी सहाय्यकांनी १०० शेततळी पूर्ण केली’? असा प्रश्न करीत त्यांनी हात वर करावा, असे सांगितले. परंतु, एकाही सहाय्यकाचा हात वर दिसला नाही. त्यानंतर भापकर यांनी ‘आपल्या पैकी किती जणांनी पन्नास शेततळी पूर्ण केली’? अशी विचारणा केली. यावेळीही एकाही सहाय्यकाचा हात वर झाला नाही. यावर आयुक्तांच्या रागाचा पारा चढला. अन्य एका जिल्ह्यातील महिला कर्मचारी दोनशे शेततळी पूर्ण करते आणि उस्मानाबादमध्ये ५० शेततळी पूर्ण करणारा एकही कर्मचारी नाही. ही बाब लाजिरवाणी असल्याचे सांगत ‘आपण झोपा काढता काय? हे पाप कोणाचे? अशा शब्दात अधिकारी, कर्मचाऱ्यांची त्यांनी कानउघाडणी केली. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून अकरा कलमी कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. परंतु, या योजनेची गतीही फारशी समाधानकारक नाही. विहिरींची कामे ठप्प झाली आहेत. फळझाडे लागवडीच्या कामातही जिल्हा पिछाडीवर आहे. त्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांना जिल्ह्याबाबत आत्मीयता आहे की नाही, असा सवाल उपस्थित करीत यापुढे हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही. जे अधिकारी, कर्मचारी झोपेचे सोंग घेऊन वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करतील, त्यांच्याविरूद्ध थेट कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. जिल्ह्यातील ९० पेक्षा अधिक ग्रामपंचायतींमध्ये रोजगार हमी योजनेचा खर्च शून्य टक्के आहे. या ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांविरूद्ध थेट कारवाईचे संकेत त्यांनी यावेळी दिले. शासकीय कामावर येणाऱ्या मजुरांना श्रमाचा मोबदला सहा-सहा महिने मिळत नसेल तर ते कामावर येतील कशासाठी, असा सवाल करीत मजुरांच्या श्रमाचा सन्मान करायला शिका. मजुरांना मजूर म्हणून नका तर लाभार्थी संबोधा, असा सल्लाही त्यांनी दिला.पहिल्याच बैठकीत आयुक्त भापकर यांचा रूद्रावतार पाहून कामचुकार अधिकारी, कर्मचाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. बैठकीच्या प्रारंभी जिल्हाधिकारी गमे यांनी प्रास्ताविक केले. तर अपर जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी उपस्थितांचे आभार मानले.