चाराटंचाईमुळे दुग्धव्यवसायावर परिणाम

By Admin | Updated: May 26, 2014 00:56 IST2014-05-26T00:37:56+5:302014-05-26T00:56:48+5:30

हिंगोली : रबी हंगामातील अवकाळी पावसाचा फटका आता पशुपालकांना बसला आहे. कितीही पैसे मोजण्याची तयारी दर्शविली तरी जनावरांसाठी कडबा मिळणे दुरापास्त झाले आहे.

Due to the scarcity of crops, the result of dairy farming | चाराटंचाईमुळे दुग्धव्यवसायावर परिणाम

चाराटंचाईमुळे दुग्धव्यवसायावर परिणाम

हिंगोली : रबी हंगामातील अवकाळी पावसाचा फटका आता पशुपालकांना बसला आहे. कितीही पैसे मोजण्याची तयारी दर्शविली तरी जनावरांसाठी कडबा मिळणे दुरापास्त झाले आहे. परिणामी हिंगोली शहरातील जनावरांच्या बाजारात कवडीमोल दरात शेतकरी जनावरे विकत आहेत. दुसरीकडे शेकडा दीड हजार रूपये मोजून कडबा विकत घेवून टाकणे शक्य नसल्याने दुग्ध व्यवसायावर चाराटंचाईचा परिणाम झाला आहे. कृषिप्रधान देशात जनावरे सांभाळणे अवघड झाले आहे. दिवसेंदिवस पशुपालकांवर येत असलेल्या संकटांमुळे जनावरांचे गोठे गावातून गायब झाले आहेत. प्रतिवर्षी हमखास येणार्‍या चाराटंचाईमुळे दुग्धव्यवसाय संकटात सापडला आहे. यंदाही मागील वर्षीप्रमाणे जिल्ह्यात चाराटंचाई निर्माण झाली आहे. रबी हंगामात अधिक पाऊस पडूनही उत्पादकांना कडब्याचा शोध घ्यावा लागत आहे; परंतु सर्वत्रच चाराटंचाई निर्माण झाल्याने उत्पादकांची डोकेदुखी वाढली आहे. बाहेरच्या जिल्ह्यातही चारा मिळत नसल्याने जनावरे विकण्यावाचून पर्याय उरलेला नाही. त्यातही बाजारात घेवाल नसल्याने जनावरे कवडीमोल दरात विकली जात आहेत. औताव्यतिरिक्त असलेली जनावरे उत्पादकांनी विक्रीस काढली आहेत. पावसाळा जरी तोंडावर आला असला तरी आतापासून चार महिन्यापर्यंत जनावरांना चारा टाकावा लागतो. जोपर्यंत नवीन चारा निर्माण होणार नाही, तोपर्यंत उत्पादकांना चारा विकत घ्यावा लागणार आहे. खत आणि बियाण्यांच्या खरेदीसाठी तडजोड केली असताना कडबा विकत घेवून टाकणे शक्य होणार नाही. त्यामुळे औताव्यतिरिक्त जनावरे विकून शेतकरी मोकळा झाला आहे. दुसरीकडे दुग्धव्यवसायिकांवर मोठे संकट ओढवले आहे. दुधावर जीवनमान अवलंबून असलेल्या व्यावसायिकांना दुधाचे पैसे चारा विकत घेण्यासाठी खर्च करावे लागत आहेत. अद्याप मान्सूनचा पाऊस पडला नसताना ज्वारीचा कडबा शेकडा १ हजार २०० ते १ हजार ४०० रूपयांप्रमाणे विकला जात आहे. महिन्याला दोन बैलास २५० ते ३०० पेंढ्या चारा लागतो. दुधाळ जनावरांना हिरवा चारा टाकावा लागतो. कडबाच मिळणे दुर्मिळ झाले असताना हिरव्या चार्‍याची गोष्ट लांबचीच आहे. त्यामुळे हिंगोलीत दुग्धव्यवसायिकांची संख्या घटली आहे. आहे त्या व्यावसायिकांनी दूध देणारी जनावरे ठेवली असून उर्वरित जनावरे विकून टाकली आहेत. (प्रतिनिधी)हिंगोली शहरात दूधविक्रेत्यांची संख्या हाताच्या बोटावर मोजता येईल एवढीच राहिली आहे. प्रतिवर्षीच्या चाराटंचाईमुळे दुग्धव्यवसाय मोडीत काढल्याने हॉटेल्सला तसेच घरोघरी जावून दूध विकणार्‍यांकडून २ हजार लिटरचा पुरवठा होतो; पण शहरात प्रत्येक दिवशी २० हजार लिटरची आवश्यकता पॅकेटच्या दुधावर भागविली जाते. त्यातही शहरात येणारे सर्व पॅकेटचे दूध पश्चिम महाराष्ट्रातील आहे पाऊस पडला नसताना ज्वारीचा कडबा शेकडा १ हजार २०० ते १ हजार ४०० रूपयांप्रमाणे विकला जात आहे. महिन्याला दोन बैलास २५० ते ३०० पेंढ्या चारा लागतो रबी हंगामात अधिक पाऊस पडूनही यंदाही मागील वर्षीप्रमाणे जिल्ह्यात चाराटंचाई निर्माण झाली असून उत्पादकांना घ्यावा लागत आहे कडब्याचा शोध दिवसेंदिवस पशुपालकांवर येत असलेल्या संकटांमुळे जनावरांचे गोठे गावातून गायब झाले आहेत

Web Title: Due to the scarcity of crops, the result of dairy farming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.