वीज गेल्यामुळे आज निर्जळी
By Admin | Updated: May 23, 2014 01:09 IST2014-05-23T00:57:53+5:302014-05-23T01:09:52+5:30
औरंगाबाद : जायकवाडी आणि फारोळा जलशुद्धीकरण केंद्रावर २२ मे रोजी दुपारनंतर सुरू झालेल्या विजेच्या लपंडावामुळे शहराला २३ मे रोजी निर्जळीला सामोरे जावे लागणार आहे.

वीज गेल्यामुळे आज निर्जळी
औरंगाबाद : जायकवाडी आणि फारोळा जलशुद्धीकरण केंद्रावर २२ मे रोजी दुपारनंतर सुरू झालेल्या विजेच्या लपंडावामुळे शहराला २३ मे रोजी निर्जळीला सामोरे जावे लागणार आहे. दोन महिन्यांपासून शहराला पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. कधी मनपाच्या वितरण यंत्रणेतील दोषामुळे, तर कधी महावितरणकडून होणार्या खंडित वीजपुरवठ्यामुळे. वैशाखाचे ऊन तापत असून, अंगाची लाही लाही होत असून, या उकाड्यात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ट्रीपिंगमुळे वीजपुरवठा खंडित झाल्याने १४०० मि. मी. व्यासाच्या जलवाहिनीतून दुपारी १ तासभर पाणी उपसणे बंद होते. त्यानंतर सायंकाळी फारोळा येथील वीजपुरवठा खंडित झाला. तसेच ७०० मि. मी. व्यासाच्या जलवाहिनीला २ फूट भगदाडही पडले. त्यामुळे मनपाला दुरुस्तीची तयारी करावी लागली. वीज गुल होण्याचे आणि जलवाहिनी फुटण्याचे संकट एकत्रित आल्यामुळे पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडेल. शिवाय शहराला पाणीपुरवठादेखील होणार नाही. फारोळा येथील ७०० मि. मी. जलवाहिनीची दुरुस्ती तातडीने हाती घेण्यात आली. जायकवाडीचा वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे २ पंप बंद झाले. दु.२.४० वा वीजपुरवठा सुरळीत झाला. ५.३० वा. फारोळा येथे वीजपुरवठा खंडित झाला, तसेच जलवाहिनीही फुटली. जलवाहिनी दुरुस्त करण्यासाठी तासभर गेला. यांत्रिकी विभागाचे उपअभियंता यू. जी. शिरसाठ यांनी सांगितले की, जायकवाडीचा वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे शुक्रवारी शहराला पाणीपुरवठा होणार नाही. ‘त्या’ जलवाहिनीची दुरुस्ती गोल्डी सिनेमागृह, रेल्वेस्टेशन रोडवरील जलवाहिनी दुरुस्तीचे काम आज हाती घेण्यात आले. काल २१ रोजी ती जलवाहिनी फुटून लाखो लिटर पाणी वाया गेले. सायंकाळपर्यंत जलवाहिनीतून पाणी वाहत होते. रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे ती जलवाहिनी मागील काही महिन्यांत वारंवार फुटत आहे.