शहरं
Join us  
Trending Stories
1
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
2
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
3
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
4
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
5
वादग्रस्त विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज; आ. गोपीचंद पडळकरांना केला फोन, म्हणाले...
6
सर्वच नावं परप्रांतीय कशे? राजुऱ्यातील ६,८५३ मतदारांच्या वोट चोरीच्या आरोपांवर आयोगाकडून थंड प्रतिसाद
7
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
8
IPO असावा तर असा! ७४% प्रीमिअमवर बंपर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल
9
सर्वपित्री अमावास्या २०२५: सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण; त्यादिवशी श्राद्धविधी करावे की नाही?
10
E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी?  
11
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
12
आयफोन १६ खरेदी करण्याची योग्य वेळ; २७ हजारांहून अधिक रुपये वाचतील, कुठे सुरू आहे ऑफर?
13
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
14
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
15
कमाल झाली राव! वजन कमी होईल अन् चेहऱ्यावर ग्लो येईल; रोज 'हे' फळ खाल्ल्याचे 'जादुई' फायदे
16
India vs Oman सामन्याआधीच्या सराव सत्रात ६ खेळाडू गैरहजर? टीम इंडियात नेमकं काय घडतंय...
17
आर्यनची केस लढण्यास मुकुल रोहतगींनी दिलेला नकार, शाहरुख खान थेट त्यांच्या पत्नीशीच बोलला
18
राज ठाकरे यांनी अंबरनाथमध्ये कार्यकर्त्यांना दिला असा कानमंत्र, पितृपक्षाबाबत म्हणाले... 
19
एका क्लिकमध्ये मिळणार PF ची पूर्ण हिस्ट्री; EPFO नं बदलली पासबुक पाहण्याची सुविधा
20
Tanya Mittal : "नवऱ्याला राजासारखं ठेवेन", बेरोजगाराशी लग्न करण्यास तयार आहे तान्या मित्तल, म्हणाली...

ऑनलाईन प्रणालीमुळे रेशनचे १९ हजार टन धान्य वाचल्याचा दावा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 18:36 IST

मार्च ते नोव्हेंबर २०१८ या कालावधीत १९ हजार ३८० मेट्रिक टन धान्याची बचत झाल्याचा दावा जिल्हा पुरवठा विभागाने केला.

ठळक मुद्देजिल्ह्यात ७ लाख ७९ हजार शिधापत्रिकाधारकत्यांना १ हजार ८०१ रेशन दुकानांतून दरमहा धान्याचे वितरण होते.

औरंगाबाद : मार्च ते नोव्हेंबर २०१८ या कालावधीत १९ हजार ३८० मेट्रिक टन धान्याची बचत झाल्याचा दावा जिल्हा पुरवठा विभागाने बुधवारी पत्रकार परिषदेत केला. सोबतच आॅनलाईन प्रणालीमुळे काळ्या-बाजारात धान्य जात नसल्याची हमी पुरवठा विभागाने दिली.

जिल्ह्यातील सर्वच रेशन दुकानांवर मार्च २०१८ पासून ई-पॉस बसविण्यात आले असून, रेशन दुकानातील धान्य वाटपात पारदर्शकता असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. भारत कदम यांनी ठणकावून सांगितले.ई-पॉसद्वारे धान्याचे वाटप करण्याचा शासन आदेश असून, जिल्ह्यात मार्च २०१८ पासून त्याची अंमलबजावणी सुरू आहे. जिल्ह्यातील १ हजार ८०१ रेशन दुकानांवर ई-पॉस बसविण्यात आले आहेत. त्या आधारेच धान्य वितरण करण्याचे आदेश पुरवठा विभागाने दुकानादारांना दिले आहेत.

जिल्ह्याला मार्च ते नोव्हेंबर २०१८ या कालावधीत १ लाख ३७ हजार ८३५ मेट्रिक टन गहू आणि तांदळाचे नियतन मंजूर होते. तहसीलदारांच्या मागणीनुसार यापैकी एक लाख १८ हजार ४५३ मेट्रिक टन धान्याचे वितरण जिल्ह्यातील रेशन दुकानादारांना करण्यात आले. ई-पॉसआधारे दरमहा धान्य वाटप झाल्याने तब्बल १३ हजार ३८६ मेट्रिक टन गहू, तर ५ हजार ९९४ मेट्रिक टन तांदळाची बचत झाल्याचा दावा पुरवठा विभाग करीत आहे. शिधापत्रिका असताना धान्य न घेणाऱ्या शहरातील ३०, ग्रामीण भागातील ४० हजार नागरिकांना पुरवठा विभागाकडून नोटीस बजाविण्यात आल्याचे डॉ. कदम यांनी सांगितले.

जिल्ह्यात ७ लाख ७९ हजार शिधापत्रिकाधारकजिल्ह्यात एकूण ७ लाख ७९ हजार ११८ कौटुंबिक शिधापत्रिकाधारक आहेत. त्यांना १ हजार ८०१ रेशन दुकानांतून दरमहा धान्याचे वितरण होते. त्यात अंत्योदय योजनेचे ७० हजार ४७३ शिधापत्रिका आहेत. त्यापैकी ६० हजार ४९१ पत्रिका आधार कार्डशी संलग्न आहेत. यासह प्राधान्य कुटुंब योजनेत २ लाख २ हजार ८१९ पैकी एक लाख ८१ हजार ५६, तर ए.पी.एल. शेतकरी योजनेत ४ लाख १८ हजार ८२५ पैकी ३ लाख २३ हजार २८५ शिधापत्रिकांचे आधार सीडिंग झाल्याने योग्य लाभार्थ्यांपर्यंत धान्य जात असल्याचे पुरवठा विभागाचे मत आहे. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबादonlineऑनलाइन