शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

ऑनलाईन प्रणालीमुळे रेशनचे १९ हजार टन धान्य वाचल्याचा दावा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 18:36 IST

मार्च ते नोव्हेंबर २०१८ या कालावधीत १९ हजार ३८० मेट्रिक टन धान्याची बचत झाल्याचा दावा जिल्हा पुरवठा विभागाने केला.

ठळक मुद्देजिल्ह्यात ७ लाख ७९ हजार शिधापत्रिकाधारकत्यांना १ हजार ८०१ रेशन दुकानांतून दरमहा धान्याचे वितरण होते.

औरंगाबाद : मार्च ते नोव्हेंबर २०१८ या कालावधीत १९ हजार ३८० मेट्रिक टन धान्याची बचत झाल्याचा दावा जिल्हा पुरवठा विभागाने बुधवारी पत्रकार परिषदेत केला. सोबतच आॅनलाईन प्रणालीमुळे काळ्या-बाजारात धान्य जात नसल्याची हमी पुरवठा विभागाने दिली.

जिल्ह्यातील सर्वच रेशन दुकानांवर मार्च २०१८ पासून ई-पॉस बसविण्यात आले असून, रेशन दुकानातील धान्य वाटपात पारदर्शकता असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. भारत कदम यांनी ठणकावून सांगितले.ई-पॉसद्वारे धान्याचे वाटप करण्याचा शासन आदेश असून, जिल्ह्यात मार्च २०१८ पासून त्याची अंमलबजावणी सुरू आहे. जिल्ह्यातील १ हजार ८०१ रेशन दुकानांवर ई-पॉस बसविण्यात आले आहेत. त्या आधारेच धान्य वितरण करण्याचे आदेश पुरवठा विभागाने दुकानादारांना दिले आहेत.

जिल्ह्याला मार्च ते नोव्हेंबर २०१८ या कालावधीत १ लाख ३७ हजार ८३५ मेट्रिक टन गहू आणि तांदळाचे नियतन मंजूर होते. तहसीलदारांच्या मागणीनुसार यापैकी एक लाख १८ हजार ४५३ मेट्रिक टन धान्याचे वितरण जिल्ह्यातील रेशन दुकानादारांना करण्यात आले. ई-पॉसआधारे दरमहा धान्य वाटप झाल्याने तब्बल १३ हजार ३८६ मेट्रिक टन गहू, तर ५ हजार ९९४ मेट्रिक टन तांदळाची बचत झाल्याचा दावा पुरवठा विभाग करीत आहे. शिधापत्रिका असताना धान्य न घेणाऱ्या शहरातील ३०, ग्रामीण भागातील ४० हजार नागरिकांना पुरवठा विभागाकडून नोटीस बजाविण्यात आल्याचे डॉ. कदम यांनी सांगितले.

जिल्ह्यात ७ लाख ७९ हजार शिधापत्रिकाधारकजिल्ह्यात एकूण ७ लाख ७९ हजार ११८ कौटुंबिक शिधापत्रिकाधारक आहेत. त्यांना १ हजार ८०१ रेशन दुकानांतून दरमहा धान्याचे वितरण होते. त्यात अंत्योदय योजनेचे ७० हजार ४७३ शिधापत्रिका आहेत. त्यापैकी ६० हजार ४९१ पत्रिका आधार कार्डशी संलग्न आहेत. यासह प्राधान्य कुटुंब योजनेत २ लाख २ हजार ८१९ पैकी एक लाख ८१ हजार ५६, तर ए.पी.एल. शेतकरी योजनेत ४ लाख १८ हजार ८२५ पैकी ३ लाख २३ हजार २८५ शिधापत्रिकांचे आधार सीडिंग झाल्याने योग्य लाभार्थ्यांपर्यंत धान्य जात असल्याचे पुरवठा विभागाचे मत आहे. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबादonlineऑनलाइन