शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

उमेदवारी न मिळाल्याने अब्दुल सत्तार यांचा काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2019 16:27 IST

औरंगाबाद येथून सुभाष झांबड यांना काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली मात्र औरंगाबाद लोकसभा मतदारसंघासाठी आग्रही असलेले काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी बंड पुकारले आहे

औरंगाबाद - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने महाराष्ट्रातील तिसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये 5 नावांची घोषणा करण्यात आली आहे. औरंगाबाद येथून सुभाष झांबड यांना काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली मात्र औरंगाबाद लोकसभा मतदारसंघासाठी आग्रही असलेले काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी बंड पुकारले आहे. सत्तार यांनी काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन औरंगाबादमधून अपक्ष निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले आहे.

लोकसभा निवडणुसाठी मागील अनेक महिन्यांपासून मी तयारी करत होतो. काँग्रेस पक्ष वाढविण्यासाठी गावोगावी फिरलो तर एल्गार यात्रा काढली, कार्यकर्त्यांचे मेळावे घेतले इतके करुनही पक्षाने मला डावलले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणूक कोणत्याही परिस्थितीत मी लढवणार असल्याचे अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केले. 

त्याचसोबत आरक्षणाच्या मुद्द्यावरून मी याआधीच विधानसभेच्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. तसेच लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच मी औरंगाबाद काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. कार्यकर्त्यांवर माझा विश्वास आहे त्यामुळे कार्यकर्त्यांच्या बळावर मी निवडणुकीला उभा राहणार असल्याचे अब्दुल सत्तार यांनी सांगितले. 

रावसाहेब दानवेंच्या विरोधात अर्जुन खोतकर यांनी काँग्रेसमधून लढावं यासाठी अब्दुल सत्तार प्रयत्नशील होते. तसेच औरंगाबादमधून चंद्रकांत खैरे यांच्याविरुद्ध दानवेंचे जावई हर्षवर्धन जाधव यांना काँग्रेसमधून आणून तिकीट द्यावी यासाठी सत्तार यांनी काँग्रेसच्या वरिष्ठांकडे आग्रह धरला होता. मात्र अब्दुल सत्तार यांच्या प्रयत्नांना यश न मिळाल्याने वैफल्यग्रस्त भावनेतून अब्दुल सत्तार निवडणूक लढण्याची भाषा करत आहेत अशीही चर्चा स्थानिक राजकीय वर्तुळात सुरु आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Abdul Sattarअब्दुल सत्तारcongressकाँग्रेसAurangabadऔरंगाबादElectionनिवडणूकSubhash Zambadसुभाष झांबड