स्थानिक प्रकल्पातील पाणी संकलन घटले
By Admin | Updated: April 25, 2016 23:33 IST2016-04-25T23:17:31+5:302016-04-25T23:33:11+5:30
लातूर : रेल्वेने दररोज २५ लाख लिटर पाणी येत असल्याने स्थानिक स्त्रोतातून होणारे संकलन कमी झाले आहे़ रेल्वेच्या १० वॅगन येत असताना

स्थानिक प्रकल्पातील पाणी संकलन घटले
लातूर : रेल्वेने दररोज २५ लाख लिटर पाणी येत असल्याने स्थानिक स्त्रोतातून होणारे संकलन कमी झाले आहे़ रेल्वेच्या १० वॅगन येत असताना ५५ ते ६० लाख लिटर पाणी संकलित केले जात होते़ आता ५० वॅगन सुरु झाल्यानंतर ३३ लाख लिटर पर्यंतच स्थानिक स्त्रोतातून पाणी उचलले जात आहे़ दरम्यान, रेल्वेचे पाणी मिळत असल्यामुळे नव्हे तर स्थानिक स्त्रोतातील पाणी कमी झाल्यामुळे संकलन कमी झाले असल्याचे मनपा प्रशासनाकडून सांगण्यात आले़
रेल्वेच्या १० वॅगन सुरु असताना डोंगरगाव, साई, धनेगाव, निम्न तेरणा, भंडारवाडी येथून पाणी उचलले जात होते़ या सर्व स्त्रोतातून ५५ ते ६० लाख लिटर दररोज पाणी संकलित केले जात होते़ मात्र गेल्या काही दिवसांपासून भंडारवाडी, धनेगाव येथील प्रकल्पातील पाणी उचलणे बंद झाले आहे़ साई ट्रेंस येथूनही एक दिवसाआड पाणी उचलले जात आहे़ सोमवारी डोंगरगाव येथील प्रकल्पातून १२ टँकरद्वारे ३ लाख लिटर पाणी उचलण्यात आले़ तर माळकोंडजी येथे १११ टँकरद्वारे २७ लाख ७५ हजार लिटर तर साई ट्रेंच येथून ३ लाख लिटर पाणी उचलण्यात आले आहे़ जवळपास ३३ लाख ७५ हजार लिटर पाणी संकलित करण्यात आले़ रेल्वेचे वगळून ३३ लाख ७५ हजार लिटर पाणी संकलित करण्यात आले आहे़ ८ दिवसांपूर्वी रेल्वेच्या १० वॅगन येत असताना ५५ ते ६० लाख लिटर पाणी दररोज संकलित केले जात होते़ आता मात्र ३३ लाख लिटर पाणी स्थानिक स्त्रोतातून संकलित केले जात आहे़ डोंगरगाव आणि भंडारवाडीतून १२ लाख लिटरच्या पुढे पाणी घेण्यात येत होते़ परंतू भंडारवाडी प्रकल्पातून पाणी उचलणे बंद झाले असून, डोंगरगावमधूनही कमी प्रमाणात पाणी उचलले जात आहे़ स्थानिक स्त्रोतातील मोठा स्त्रोत आता निम्न तेरणा माळकोंडजी पॉर्इंट असून, या पॉर्इंटवरून दररोज २५ लाख लिटरच्या पुढे पाणी घेण्यात येत आहे़ मंगळवारी माळकोंडजी पॉर्इंटवरून २५ हजार लिटरच्या १११ टँकर फेऱ्या करून २७ लाख ७५ हजार लिटर पाणी संकलित करण्यात आले़