शहरं
Join us  
Trending Stories
1
टेस्लामध्ये मोठा पेच! पॅकेजवरून वाद, एलन मस्क कंपनी सोडण्याची शक्यता; अध्यक्षांचा गंभीर इशारा...
2
एकनाथ खडसेंच्या जळगावातील बंगल्यात चोरी; किती मुद्देमाल चोरून नेला?
3
UPSC कँडिडेट हत्येप्रकरणी मोठा खुलासा; घरातील हार्ड ड्राइव्हमध्ये १५ महिलांचे अश्लील फोटो
4
मोठी अपडेट: श्रेयस अय्यर ड्रेसिंग रुममध्येच बेशुद्ध पडलेला; वैद्यकीय पथकाने लागलीच धोका ओळखला, नाहीतर...
5
ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर काळाच्या पडद्याआड! वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
6
"तेच रडणे, तीच मळमळ, त्याच उलट्या, त्याच फुशारक्या...", भाजपाने उद्धव ठाकरेंना डिवचलं
7
कॉफीसाठी जगभरात प्रसिद्ध असलेला 'हा' देश मोठ्या संकटात! यावर्षीच्या सगळ्यात भयंकर विनाशाला सामोरा जाणार
8
पेटीएम, जीपे, फोनपेवरील ऑटो पे कसे बंद कराल? आपोआप जातायत सबस्क्रीप्शन, पेमेंटचे पैसे... 
9
CCTV फुटेजमध्ये भलत्याच ठिकाणी दिसला आरोपी अन्...; अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात ट्विस्टवर ट्विस्ट
10
Aadhaar Card New Rules 1st Nov: महत्त्वाची बातमी! १ नोव्हेंबरपासून बदलणार आधार कार्डाशी निगडीत ३ मोठे नियम, जाणून घ्या
11
शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स ८४,८८० च्या पार; निफ्टीही वधारला, 'या' प्रमुख स्टॉक्समध्ये तेजी
12
वनप्लस १५ येतोय...! पण १४ क्रमांक का वगळला? चिनी संस्कृतीत असे काय आहे...
13
शंकर महाराज प्रकट दिन: म्हणा अकरा कवनांचे स्तोत्र, विजयी होईल सर्वत्र; कामना होतील पूर्ण
14
Bank Holidays November 2025: नोव्हेंबरमध्ये किती दिवस बँका राहणार बंद? पाहा RBI ची हॉलिडे लिस्ट, पटापट आटपा काम
15
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
16
१०० वर्षांनी महालक्ष्मीसह ४ राजयोग: ७ राशींना सुबत्ता, कल्याण; बक्कळ लाभ, यशाचा मंगलमय काळ!
17
Tulasi Vivah 2025: विष्णू हे लक्ष्मीपती असूनही दरवर्षी तुळशीशी का लावला जातो विवाह?
18
LIC ची ‘ही’ स्कीम गुंतवणूकदारांना बनवेल कोट्यधीश!; ४ वर्षापर्यंत भरा प्रीमिअम, मिळतील १ कोटी
19
"मी तुला कच्च खाऊन टाकेन"; बायकोने नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडलं, चपलेने धू-धू धुतलं
20
चिनी हँडलर, टेलिग्राम ट्रॅप, लाखोंची लूट... ४७ लाखांच्या फसवणुकीचा पर्दाफाश, तिघांना अटक

औरंगाबादेत आवक घटल्याने धान्य अडत व्यवहार ठप्प होण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 16:46 IST

मक्याचे यंदा दुष्काळामुळे उत्पादन घटले व आवक तीन महिने आधीच संपुष्टात आली आहे.

ठळक मुद्दे मक्याची आवक तीन महिने आधीच संपली तूरची झाली तुरळक आवक 

औरंगाबाद : जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील धान्याचा अडत बाजार ज्या मक्यावर आधारित आहे. त्या मक्याचे यंदा दुष्काळामुळे उत्पादन घटले व आवक तीन महिने आधीच संपुष्टात आली आहे. नवीन तूर किती येईल, याची शाश्वती नाही आणि गहू, ज्वारीचा पेराही कमी आहे. परिणामी, पुढील १० महिने अडत बाजारासाठी कठीण जाणार आहे. यापुढे परपेठेतील शेतमालावरच अवलंबून राहावे लागणार आहे. 

औरंगाबाद जिल्हा मक्याच्या उत्पादनात देशात आघाडीवर आहे. येथील मक्याला देश व विदेशातील विविध स्टार्च फॅक्टरीमधून मागणी असते. जाधववाडीतील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील धान्याचा अडत बाजारातील ७० टक्के वार्षिक व्यवहार एकट्या मक्यावर अवलंबून आहे. मात्र, यंदा ऐनवेळेवर पाऊस पडला नाही. मक्यात दाणेच भरले नाही. यामुळे मक्याचे उत्पादन ६० ते ७० टक्क्यांपर्यंत घटले आहे. परिणामी, धान्याच्या अडत बाजारात मक्याची नवीन आवक आॅक्टोबरपासून सुरू होते आणि फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आवक संपुष्टात येते. मात्र, यंदा केवळ महिनाभरच हंगाम राहिला. महिनाभरात केवळ २१३२९ क्विंटल मक्याची आवक झाली.

मागील वर्षी या काळात २४४४३ क्विंटल मका विक्रीसाठी आला होता. एकूण आवकपैकी केवळ १० टक्के मका अडतमध्ये विक्रीला आला.  मर्चंटस् असोसिएशनचे अध्यक्ष कन्हैयालाल जैस्वाल यांनी सांगितले की, यंदा  दरवर्षीपेक्षा मुगाची आवक केवळ १५ टक्के राहिली. उडीदही ५ टक्केच विक्रीला आला आहे. आतापर्यंत नवीन तुरी बाजारात येत असतात; पण अजून आवक सुरू झाली नाही. ग्रामीण भागात पाहणी केली असता १५ टक्केसुद्धा तूर विक्रीसाठी येणार नाही, अशी शक्यता आहे. रबीत गहू, ज्वारीचा पेराही कमी आहे. यामुळे आता रबीचे पीकही हाती लागणार नाही. यामुळे पुढील वर्षीच्या सप्टेंबरपर्यंत अडत व्यवहार ठप्प राहणार, असे दिसते. व्यापाऱ्यांना आता परराज्यातून धान्य आणून येथे विकावे लागणार आहे. 

यंदा मूग, उडीद, बाजरीही कमीकृउबाचे सचिव विजय शिरसाठ यांनी सांगितले की, मक्याच्या व्यवहारावरच येथील अडत बाजार टिकून आहे; मात्र दुष्काळामुळे महिनाभरातच मक्याची आवक कमी झाली, तसेच यंदा मूग, उडीद, बाजरीही विक्रीला कमी आली. याचा मार्केट फीवर मोठा परिणाम झाला आहे. महिनाअखेरीस याची आकडेवारी उपलब्ध होईल. 

अडत्यासोबत हमालांच्या रोजगारावरही परिणाम स्थानिक शेतकऱ्यांकडून येणारी धान्य, कडधान्याची आवक ७० ते ८० टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे. यामुळे आता जे स्थानिक शेतीमालावर अवलंबून आहेत असा अडत व्यवहार पुढील १० महिने ठप्पच राहील. त्यासाठी आता परपेठेतून माल मागवून तो विक्री करावा लागेल. येथे ७५ अडत व्यापारी आहेत, तर १०० च्या जवळपास हमाल काम करीत आहेत, तसेच ५० पेक्षा अधिक लोडिंगरिक्षावालेही येथील व्यवहारावर अवलंबून आहेत. त्यांनी दुसरीकडे काम केले नाही तर त्यांच्यावर उपासमारीची वेळ येईल. - देवीदास कीर्तिशाही, हमाल प्रतिनिधी

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMarketबाजारFarmerशेतकरीdroughtदुष्काळAgriculture Sectorशेती क्षेत्र