शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

गर्दीमुळे एअर इंडियाच्या मोठ्या विमानाचे औरंगाबादेतून उड्डाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 16:10 IST

१२२ ऐवजी १६२ आसनी विमानामुळे प्रवाशांना दिलासा

औरंगाबाद : मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी आणि मागणी वाढल्याने गुरुवारी नेहमीपेक्षा ४० आसन अधिक असलेल्या एअर इंडियाच्या विमानाने उड्डाण केले. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला, तर दुसरीकडे जेट एअरवेजच्या विमानसेवेसाठी प्रवाशांना आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.

जेट एअरवेजने सायंकाळपाठोपाठ २३ मार्चपासून सकाळचे मुंबई-औरंगाबाद-मुंबई विमान रद्द केले आहे. त्यामुळे मुंबईला जाण्यासाठी प्रवाशांना केवळ एअर इंडियाच्या विमानाचाच पर्याय उरला आहे. परिणामी प्रवाशांची गर्दी अधिक आणि विमानातील आसनक्षमता कमी, अशा परिस्थितीला एअर इंडियाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे मोठे विमान आणण्यासाठी एअर इंडियाकडून प्रयत्न करण्यात आला.

एअर इंडियाचे १२२ प्रवासी क्षमतेचे विमान मुंबई-औरंगाबाद-दिल्ली, दिल्ली-औरंगाबाद-मुंबई मार्गावर आहे. प्रवाशांची मागणी वाढत असल्याने गत आठवड्यात मोठ्या आकाराचे विमान देण्याची मागणी एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी वरिष्ठ कार्यालयाकडे केली. गुरुवारी १२२ ऐवजी १६२ आसनक्षमता असलेले विमान देण्यात आले. या विमानातून १५० प्रवाशांनी मुंबईचा प्रवास केला. प्रवासी कमी असल्याने शुक्रवारी मात्र नेहमीप्रमाणे १२२ प्रवासी क्षमतेच्या विमानाने उड्डाण केल्याची माहिती एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी दिली. जेट एअरवेजच्या सकाळच्या वेळेतील मुंबई-औरंगाबाद-मुंबई विमान ६ एप्रिलपासून सुरू होणार होते; परंतु आता या विमानाचे उड्डाण आणखी काही दिवस पुढे ढकलण्यात आले आहे, अशी माहिती जेट एअरवेजच्या अधिकाऱ्यांनी दिली.

प्रवासी सुविधावरिष्ठ कार्यालयाने मागणी मान्य करीत गुरुवारी मोठे विमान दिले. त्यामुळे नेहमीपेक्षा ४० आसन अधिक असलेल्या विमानाने उड्डाण घेतले. त्यातून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला, अशी माहिती एअर इंडियाचे अजय भोळे यांनी दिली. 

टॅग्स :Aurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळtourismपर्यटनAir Indiaएअर इंडिया