शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

गर्दीमुळे एअर इंडियाच्या मोठ्या विमानाचे औरंगाबादेतून उड्डाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 16:10 IST

१२२ ऐवजी १६२ आसनी विमानामुळे प्रवाशांना दिलासा

औरंगाबाद : मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी आणि मागणी वाढल्याने गुरुवारी नेहमीपेक्षा ४० आसन अधिक असलेल्या एअर इंडियाच्या विमानाने उड्डाण केले. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला, तर दुसरीकडे जेट एअरवेजच्या विमानसेवेसाठी प्रवाशांना आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.

जेट एअरवेजने सायंकाळपाठोपाठ २३ मार्चपासून सकाळचे मुंबई-औरंगाबाद-मुंबई विमान रद्द केले आहे. त्यामुळे मुंबईला जाण्यासाठी प्रवाशांना केवळ एअर इंडियाच्या विमानाचाच पर्याय उरला आहे. परिणामी प्रवाशांची गर्दी अधिक आणि विमानातील आसनक्षमता कमी, अशा परिस्थितीला एअर इंडियाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे मोठे विमान आणण्यासाठी एअर इंडियाकडून प्रयत्न करण्यात आला.

एअर इंडियाचे १२२ प्रवासी क्षमतेचे विमान मुंबई-औरंगाबाद-दिल्ली, दिल्ली-औरंगाबाद-मुंबई मार्गावर आहे. प्रवाशांची मागणी वाढत असल्याने गत आठवड्यात मोठ्या आकाराचे विमान देण्याची मागणी एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी वरिष्ठ कार्यालयाकडे केली. गुरुवारी १२२ ऐवजी १६२ आसनक्षमता असलेले विमान देण्यात आले. या विमानातून १५० प्रवाशांनी मुंबईचा प्रवास केला. प्रवासी कमी असल्याने शुक्रवारी मात्र नेहमीप्रमाणे १२२ प्रवासी क्षमतेच्या विमानाने उड्डाण केल्याची माहिती एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी दिली. जेट एअरवेजच्या सकाळच्या वेळेतील मुंबई-औरंगाबाद-मुंबई विमान ६ एप्रिलपासून सुरू होणार होते; परंतु आता या विमानाचे उड्डाण आणखी काही दिवस पुढे ढकलण्यात आले आहे, अशी माहिती जेट एअरवेजच्या अधिकाऱ्यांनी दिली.

प्रवासी सुविधावरिष्ठ कार्यालयाने मागणी मान्य करीत गुरुवारी मोठे विमान दिले. त्यामुळे नेहमीपेक्षा ४० आसन अधिक असलेल्या विमानाने उड्डाण घेतले. त्यातून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला, अशी माहिती एअर इंडियाचे अजय भोळे यांनी दिली. 

टॅग्स :Aurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळtourismपर्यटनAir Indiaएअर इंडिया