शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यात पावसाचा दुष्काळ अन् राजकीय सभांचा सुकाळ; नेते, मंत्र्यांचे दररोज दौरे

By विकास राऊत | Updated: August 28, 2023 12:54 IST

सततच्या प्रोटोकॉलमुळे प्रशासकीय यंत्रणाही हतबल

छत्रपती संभाजीनगर : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्यातील सर्वच पक्ष आणि गटांनी मराठवाड्यावर लक्ष केंद्रित केले आहे. विभागातील सहा जिल्ह्यांत पावसाचा दुष्काळ असला तरी राजकीय सभांचा सुकाळ आहे. दररोजच्या मंत्री, नेत्यांच्या दौऱ्यांमुळे प्रशासकीय यंत्रणा मात्र हतबल आहे. अस्मानी संकटावर कुणीही जास्त बोलत नसून गद्दारी, गटबाजीवरून एकमेकांवर आरोपांचा पाऊस सभेतून पडत असल्याचे दिसते.

दुष्काळ मोजण्यासाठी जशी पहिली, दुसरी, तिसरी कळ असते, तशी राजकारण्यांच्या एक मागोमाग एक कळांचा पाऊस सध्या मराठवाड्यात सुरू आहे. गेल्या आठवड्यात शरद पवार यांची सभा बीडमध्ये झाली. पवार दोन दिवस मराठवाड्यात होते. त्यानंतर २७ ऑगस्ट रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही बीड कुणाचे, हे आजमावून पाहण्यासाठी सभा घेतली. हिंगोलीत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २७ रोजीच सभा घेतली. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी शासन आपल्या दारी कार्यक्रम रविवारीच परभणीत घेतला. राष्ट्रवादीतील अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी २६ ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये कार्यकर्ता मेळावा घेत पक्षाची ताकद आजमावली. तर महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी २७ रोजी एन-३ मधील महाविद्यालयात मेळावा घेतला. अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी २६ ऑगस्टला वैजापूरमध्ये एका धार्मिक कार्यक्रमाला हजेरी लावली. २५ ऑगस्ट रोजी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी एका बैठकीच्या निमित्ताने बीडच्या सभेसाठी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या. २ सप्टेंबर रोजी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर येत आहेत.

मराठवाड्याची परिस्थितीमराठवाड्यातील सहा जिल्ह्यांतील खरीप हंगाम संपुष्टात आला आहे. टँकरने पाणीपुरवठा करण्यास सुरुवात झाली आहे. वार्षिक सरासरीच्या तुलनेत ५० टक्केच पाऊस झाला आहे. सहा जिल्ह्यांतील सुमारे ४० लाख शेतकऱ्यांसमोर येणाऱ्या काळात मोठे संकट आहे. बँका, सावकारांकडून कर्ज घेत खरिपात केलेल्या पेरण्या हातून जाण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत निर्धार सभा, स्वाभिमान सभा, उत्तर सभा, कार्यकर्ते मेळाव्यांचा पाऊस मात्र विभागात जोरदार बरसतो आहे. मराठवाड्यात दुष्काळी स्थितीत राजकीय वातावरण ढवळून निघण्यापलीकडे दुसरे काहीही सध्या दिसत नाही.

टॅग्स :MarathwadaमराठवाडाRainपाऊसdroughtदुष्काळAurangabadऔरंगाबाद