शहरं
Join us  
Trending Stories
1
७/११तील दोषींची निर्दोष मुक्तता, उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने...”
2
नवी मुंबईत भाजपा आमदारानं मनसेला डिवचलं; मराठी भाषेत लावलेली पाटी काढून गुजरातीत लावली
3
“शिवसेनेतून फुटलेले ४ तरुण खासदार हनी ट्रॅपमुळे पळाले”; संजय राऊतांचा दावा, सरकारवर टीका
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये लष्कराने लक्ष्य साध्य केले, जगाने भारताची ताकद पाहिली'; अधिवेशनाआधी पीएम मोदी म्हणाले...
5
Mumbai Bomb Blast 2006: शंका... १०० दिवस... बॉम्बचा प्रकार! उच्च न्यायालयाने 'हे' तीन तर्क लावत 7/11 मुंबई स्फोटाच्या दोषींना ठरवलं निर्दोष
6
रेअर अर्थ मॅग्नेट्सवर चीनची 'धक्कादायक' खेळी! जगभरातील कारखान्यांचा जीव भांड्यात, नेमकं काय केलं?
7
मोठी बातमी! मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोटातील १२ दोषींची निर्दोष मुक्तता, राज्य सरकारला दणका
8
Anthem Biosciences Ltd IPO: जबरदस्त लिस्टिंग! पहिल्याच दिवशी प्रत्येक शेअरवर ₹१५३ चा फायदा; ₹७४० पार पोहोचला भाव, गुंतवणूकदार मालामाल
9
छावा संघटना मारहाण: राष्ट्रवादीचे युवा शाखेचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण फरार; ११ जणांवर गुन्हा दाखल
10
राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाण यांच्यासह ११ जणांवर गुन्हा दाखल; छावा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण प्रकरणी कारवाई
11
हा हल्ला पूर्वनियोजित, सुनील तटकरेंच्या सांगण्यावरून...; विजय घाडगे पाटलांचा मोठा दावा
12
भयानक PHOTO's! ११ जुलै २००६ चा मुंबई लोकल बॉम्बस्फोट; आरोपी निर्दोष सुटले पण... जखमा आजही कायम...
13
छावा संघटनेच्या कार्यकर्त्याला मारहाण प्रकरणी सूरज चव्हाण यांनी मागितली माफी, म्हणाले...
14
Vi युझर्ससाठी महत्त्वाची बातमी, स्वस्त रिचार्ज प्लान्समध्ये केले बदल; Airtel आणि Jio काय करणार?
15
IndiGo : विमान ४० मिनिटे हवेत फिरत राहिले, तिरुपतीहून हैदराबादला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग
16
Stock Market Today: किरकोळ तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; Bank Nifty सुस्साट, 'या' शेअर्समध्ये तेजी
17
जडीबुटी विकणाऱ्या दोन साधूंना मुले चोरणारे समजून मारहाण; थोडक्यात टळली पालघर घटनेची पुनरावृत्ती
18
ना साईड बिझनेस, ना शेअर बाजाराच्या टीप्स; ४५ व्या वर्षी ₹४.७ कोटींसोबत होऊ शकता रिटायर, काय आहे ‘सिक्रेट प्लान’
19
तयार रहा...! पेट्रोल, डिझेलच्या किंमती ८-१० रुपयांनी वाढण्याची शक्यता; भारत ट्रम्प यांच्या डोळ्यात खुपतोय...
20
सोनिया गांधींना भेटण्यासाठी जात होतात त्याचे काय? योगेश कदम यांचा उद्धव ठाकरेंना टोला

Drought In Marathwada : पाण्याचे हाल; मजुरीवरच पुढचा काळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 12:28 IST

गोदाकाठचा पट्टा आणि कापसाचे आगर म्हणून प्रसिद्ध असलेल्या गेवराई तालुक्यावर यंदा दुष्काळछाया गडद झाली आहे.

- सखाराम शिंदे, खळेगाव, ता. गेवराई, जि. बीड. 

गोदाकाठचा पट्टा आणि कापसाचे आगर म्हणून प्रसिद्ध असलेल्या गेवराई तालुक्यावर यंदा दुष्काळछाया गडद झाली आहे. पावसाळ्याचे चार महिने झाले तरी समाधानकारक पाऊस झालेला नाही. आणेवारी जाहीर झाल्यानंतर ‘लोकमत’ प्रतिनिधीने गेवराईपासून २० कि.मी. अंतरावर असलेल्या खळेगाव परिसराची पाहणी केली तेव्हा अतिशय विदारक स्थिती समोर आली. पिके कोमेजली, पाण्याची भीषण स्थिती आणि चाऱ्याच्या टंचाईमुळे येत्या काळात पशुधन कसे जगवायचे? असा इथल्या शेतकऱ्यांचा प्रश्न. 

एक तर शहरात मजुरी करावी लागेल, नाही तर ऊसतोडीला जावे लागेल, असे स्वत:समोर दोनच पर्याय असल्याचे हे ग्रामस्थ सांगतात.फेब्रुवारीत खळेगाव परिसरात गारपिटीमुळे  हरभरा, ज्वारी, बाजरीचे मोठे नुकसान झाले होते. घरांची पडझड आणि झाडे पडली होती.  यातून सावरत जून-जुलैमध्ये खरिपाच्या पेरण्या केल्या; पण पदरी निराशाच पडली. जवळपास ६ हजार लोकसंख्येच्या या गावालगत अमृता नदी आहे. नदीसह गावाच्या वरील भागातील दोन बंधारे असले तरी ते कोरडेच आहेत. नदीचे खोलीकरण व रुंदीकरण झाले. शेतकरी  चार महिन्यांपासून पावसाच्या प्रतीक्षेत आहे.

प्रामुख्याने कापूस आणि बाजरीचे पीक येथील शेतकरी घेतात. यावर्षी खळेगावात २१७ मि. मी. पाऊस झाला. सरासरीच्या तुलनेत तो ४० टक्के बरसला. यावर्षी खरीप हंगामात कापूस, तूर, मूग, बाजरी, सोयाबीनची पेरणी केली; मात्र पावसाअभावी हातातोंडाशी येणारा थोडाफार घासही निसर्गाने हिरावला आहे. विहिरींनी तळ गाठला असून, पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न बिकट बनला आहे. 

सर्वाधिक पेरा ऊस, कापसाचा गेवराई तालुक्यातील पेरणीलायक क्षेत्र १ लाख ३४  हजार हेक्टर असून, या खरीप हंगामात ९८  हजार १११ हेक्टरवर पेरा झाला.  यात २० हजार ५००  हेक्टरवर ऊस, तर ७४ हजार ५००  हेक्टरवर कापसाची लागवड झाली. उर्वरित क्षेत्रात तूर, मूग, बाजरीची पेरणी झाली.

स्थलांतर  वाढणार खळेगाव येथून दरवर्षी ऊसतोड मजुरांच्या ३० टोळ्या (जवळपास ६०० व्यक्ती) ऊसतोडीसाठी बाहेरच्या जिल्ह्यात स्थलांतर करतात. यावर्षी पाऊस नसल्यामुळे स्थलांतर  करणाऱ्यांचा आकडा दुप्पट होण्याची शक्यता आहे. 

नुकसान भरून निघणार नाहीतालुक्यात यावर्षी ४४ टक्के पाऊस झाल्याने दुष्काळजन्य परिस्थिती असून, शेतीचे झालेले मोठे नुकसान भरून निघणार नाही.  शासनाकडून आदेश मिळताच तालुक्यातील दुष्काळी भागाची पाहणी करून पंचनामे करण्यासाठी कृषी विभाग सज्ज आहे. - संदीप स्वामी, तालुका कृषी अधिकारी, गेवराई. 

बळीराजा काय म्हणतो?- पाऊस कमी झाल्याने शेतात पेरलेली तूर, कपाशी, सोयाबीन आदी पिके करपली. मूग तर पावसाअभावी वाया गेला. पैशाची चणचण आहे. पाणीटंचाई भासत आहे. शासनाने जनावरांसाठी चारा-पाण्याची सोय, तसेच चारा छावणी सुरू केली पाहिजे. - मच्छिंद्र गावडे  

- आॅक्टोबरमध्येच पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासत आहे. परतीचा पाऊस पडला नाही तर आम्हाला ऊसतोडीला गेल्याशिवाय पर्याय नाही. -  मनोज शेंबडे

- पावसाअभावी पिके करपून गेली. खर्चदेखील निघणे मुश्कील झाले आहे. खरीप तर गेले, आता पाऊस झाला तरच पाण्याची सोय होईल. - राजेंद्र डाके 

- २०१२ पासून या भागातील शेतकरी आर्थिक संकटात आहेत. गावालगतची नदी कोरडी असून, विहिरींची पाणी पातळी घटली आहे.  परतीचा पाऊस पडला, तर रबीची पेरणी करता येईल. सध्याची परिस्थिती अवघड आहे. - उमेश शिंदे 

टॅग्स :droughtदुष्काळMarathwadaमराठवाडाFarmerशेतकरीagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रRainपाऊस