शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

Drought In Marathwada : पाण्याचे हाल; मजुरीवरच पुढचा काळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 12:28 IST

गोदाकाठचा पट्टा आणि कापसाचे आगर म्हणून प्रसिद्ध असलेल्या गेवराई तालुक्यावर यंदा दुष्काळछाया गडद झाली आहे.

- सखाराम शिंदे, खळेगाव, ता. गेवराई, जि. बीड. 

गोदाकाठचा पट्टा आणि कापसाचे आगर म्हणून प्रसिद्ध असलेल्या गेवराई तालुक्यावर यंदा दुष्काळछाया गडद झाली आहे. पावसाळ्याचे चार महिने झाले तरी समाधानकारक पाऊस झालेला नाही. आणेवारी जाहीर झाल्यानंतर ‘लोकमत’ प्रतिनिधीने गेवराईपासून २० कि.मी. अंतरावर असलेल्या खळेगाव परिसराची पाहणी केली तेव्हा अतिशय विदारक स्थिती समोर आली. पिके कोमेजली, पाण्याची भीषण स्थिती आणि चाऱ्याच्या टंचाईमुळे येत्या काळात पशुधन कसे जगवायचे? असा इथल्या शेतकऱ्यांचा प्रश्न. 

एक तर शहरात मजुरी करावी लागेल, नाही तर ऊसतोडीला जावे लागेल, असे स्वत:समोर दोनच पर्याय असल्याचे हे ग्रामस्थ सांगतात.फेब्रुवारीत खळेगाव परिसरात गारपिटीमुळे  हरभरा, ज्वारी, बाजरीचे मोठे नुकसान झाले होते. घरांची पडझड आणि झाडे पडली होती.  यातून सावरत जून-जुलैमध्ये खरिपाच्या पेरण्या केल्या; पण पदरी निराशाच पडली. जवळपास ६ हजार लोकसंख्येच्या या गावालगत अमृता नदी आहे. नदीसह गावाच्या वरील भागातील दोन बंधारे असले तरी ते कोरडेच आहेत. नदीचे खोलीकरण व रुंदीकरण झाले. शेतकरी  चार महिन्यांपासून पावसाच्या प्रतीक्षेत आहे.

प्रामुख्याने कापूस आणि बाजरीचे पीक येथील शेतकरी घेतात. यावर्षी खळेगावात २१७ मि. मी. पाऊस झाला. सरासरीच्या तुलनेत तो ४० टक्के बरसला. यावर्षी खरीप हंगामात कापूस, तूर, मूग, बाजरी, सोयाबीनची पेरणी केली; मात्र पावसाअभावी हातातोंडाशी येणारा थोडाफार घासही निसर्गाने हिरावला आहे. विहिरींनी तळ गाठला असून, पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न बिकट बनला आहे. 

सर्वाधिक पेरा ऊस, कापसाचा गेवराई तालुक्यातील पेरणीलायक क्षेत्र १ लाख ३४  हजार हेक्टर असून, या खरीप हंगामात ९८  हजार १११ हेक्टरवर पेरा झाला.  यात २० हजार ५००  हेक्टरवर ऊस, तर ७४ हजार ५००  हेक्टरवर कापसाची लागवड झाली. उर्वरित क्षेत्रात तूर, मूग, बाजरीची पेरणी झाली.

स्थलांतर  वाढणार खळेगाव येथून दरवर्षी ऊसतोड मजुरांच्या ३० टोळ्या (जवळपास ६०० व्यक्ती) ऊसतोडीसाठी बाहेरच्या जिल्ह्यात स्थलांतर करतात. यावर्षी पाऊस नसल्यामुळे स्थलांतर  करणाऱ्यांचा आकडा दुप्पट होण्याची शक्यता आहे. 

नुकसान भरून निघणार नाहीतालुक्यात यावर्षी ४४ टक्के पाऊस झाल्याने दुष्काळजन्य परिस्थिती असून, शेतीचे झालेले मोठे नुकसान भरून निघणार नाही.  शासनाकडून आदेश मिळताच तालुक्यातील दुष्काळी भागाची पाहणी करून पंचनामे करण्यासाठी कृषी विभाग सज्ज आहे. - संदीप स्वामी, तालुका कृषी अधिकारी, गेवराई. 

बळीराजा काय म्हणतो?- पाऊस कमी झाल्याने शेतात पेरलेली तूर, कपाशी, सोयाबीन आदी पिके करपली. मूग तर पावसाअभावी वाया गेला. पैशाची चणचण आहे. पाणीटंचाई भासत आहे. शासनाने जनावरांसाठी चारा-पाण्याची सोय, तसेच चारा छावणी सुरू केली पाहिजे. - मच्छिंद्र गावडे  

- आॅक्टोबरमध्येच पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासत आहे. परतीचा पाऊस पडला नाही तर आम्हाला ऊसतोडीला गेल्याशिवाय पर्याय नाही. -  मनोज शेंबडे

- पावसाअभावी पिके करपून गेली. खर्चदेखील निघणे मुश्कील झाले आहे. खरीप तर गेले, आता पाऊस झाला तरच पाण्याची सोय होईल. - राजेंद्र डाके 

- २०१२ पासून या भागातील शेतकरी आर्थिक संकटात आहेत. गावालगतची नदी कोरडी असून, विहिरींची पाणी पातळी घटली आहे.  परतीचा पाऊस पडला, तर रबीची पेरणी करता येईल. सध्याची परिस्थिती अवघड आहे. - उमेश शिंदे 

टॅग्स :droughtदुष्काळMarathwadaमराठवाडाFarmerशेतकरीagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रRainपाऊस