शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
5
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
6
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
7
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
8
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
9
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
10
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
11
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
12
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
13
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
14
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
15
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
16
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
17
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
18
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
19
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

Drought In Marathwada : मराठवाड्यातील १६ लाख नागरिकांची तहान टँकरच्या पाण्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 7:40 PM

७०५ टँकर पाच जिल्ह्यांत सध्या सुरू असून, भविष्यात ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. 

औरंगाबाद : मराठवाड्यातील दुष्काळ गंभीर वळणावर पोहोचू लागला आहे. पिण्याच्या पाण्याचे मोठे संकट सध्या विभागासमोर असून, १६ लाख २२ हजार २७६ नागरिकांची तहान टँकरच्या पाण्यावर भागविली जात आहे. ७०५ टँकर पाच जिल्ह्यांत सध्या सुरू असून, भविष्यात ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील ३६४ गावांतील ७ लाख १०० नागरिक, जालन्यातील ६३ गावांतील १ लाख ५८ हजार ७०६ नागरिक, नांदेडमधील १ गावातील १२६०० नागरिक, बीड जिल्ह्यातील १३४ गावांतील ६ लाख ९९ हजार ११८ नागरिक, तर उस्मानाबाद जिल्ह्यातील ६ गावांत राहणाऱ्या ११ हजार ७५२ नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्याच्या तुलनेत ३७ गावांची वाढ झाली आहे. तसेच ५ लाख नागरिकांपर्यंत टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो आहे. ५६८ गावे आणि ६७ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत असून, आगामी काळात ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. पाणीपुरवठ्यासाठी विभागातील ५७८ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. 

कोणत्या जिल्ह्यात किती टँकर :जिल्हा                  लोकसंख्या           गावे    टँकर संख्या औरंगाबाद         ७ लाख ४० हजार     ३६४    ४६३जालना              १ लाख ५८ हजार    ६३    ९५नांदेड                     १२ हजार ६००    ०१    ०२बीड                    ६ लाख ९९ हजार    १३४    १३९उस्मानाबाद            ११ हजार ७५२    ०६    ०६एकूण                १६ लाख २२ हजार     ५६८    ७०५

टॅग्स :droughtदुष्काळMarathwadaमराठवाडाWaterपाणी