शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Drought In Marathwada : म्हसणात आणलेला मुर्दा अन् बाजारात नेलेले जनावर घरी नाही नेता येत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 19:36 IST

दुष्काळवाडा : दुभत्या म्हशी बाजारात उभ्या करून गिऱ्हाईकाची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या तोंडून निघालेले हे बोल दुष्काळाची भीषणता पटवून देत होते.

ठळक मुद्देजनावरांच्या बाजारातील करुण कहाण्या

- भागवत हिरेकर

औरंगाबाद : सगळी मदार पावसावर. जुळवाजुळव करून पेरण्या करायच्या अन् पाऊस बेपत्ता होतो, पण मग खचून चालत नाही. देणीघेणी वाढून बसलेली असतात. त्या टाळता येत नाहीत. जिथे माणसांचेच हाल तिथे जनावरे कशी सांभाळायची? त्यांना बाजार दाखवावा लागतो. जशी किंमत मिळेल तशी ती द्यावी लागतात. म्हसणात आणलेला मुर्दा फुकावाच लागतो. विकायला आणलेला शेतमाल आणि जनावराचेही तेच आहे. दुभत्या म्हशी बाजारात उभ्या करून गिऱ्हाईकाची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या तोंडून निघालेले हे बोल दुष्काळाची भीषणता पटवून देत होते.

औरंगाबाद शहरातील छावणीत दर गुरुवारी आठवडी बाजार भरतो. बाजूलाच जनावरांचाही बाजार असतो. या बाजारात म्हशी आणि शेळ्याच विकायला येतात. विशेषत: म्हशी विकायला आणणाऱ्यांत व्यापाऱ्यांचे प्रमाण जास्तच; पण या गर्दीतून फेरफटका मारल्यानंतर गोठ्यातील जनावरे घेऊन उभे असलेले शेतकरी लगेच उमटून पडले. औरंगाबादच्या उंबरठ्यावरील गावांबरोबरच अगदी चाळीसगावहून आलेले शेतकरीही होते. बाजारात गर्दीत एका टोकाला म्हैस सिमेंटच्या खांबाला बांधून उभे असलेले तुकाराम शिंदे दिसले. शून्यात बघत कुठल्या तरी विचारात गढून गेलेले. त्यांना बोलते केले. गिऱ्हाईकाकडे नजर ठेवून ते बोलत होते. पाणी नाही. पीक कसे येणार? पेरणीसाठी, घरासाठी देणीघेणी केलेली. शेतातून काहीच आले नाही. कडब्याचेही हाल. मग जनावराला बाजार दाखविण्याशिवाय मार्ग उरत नाही, असे हताशपणे सांगत त्यांनी बोलणेच थांबवले. 

आजूबाजूला प्रत्येक जण आलेल्या गिऱ्हाईकाला म्हस फिरवून दाखवत होता. कुणी बळेच शेतकऱ्यांच्या हातात शंभर, पन्नास रुपयांची नोट दाबून सौदा फिक्स करण्याचा अट्टहास करीत होता. या गोंधळात एका शेतकऱ्याने मोबाईल दिला. घर नावाने नंबर आहे, तो लावून द्या, म्हणाला. मोेबाईलच्या डायल लिस्टमध्ये बघितले, तर पहिलेच नाव सावकार होते. चाळीसगावहून हा शेतकरी दोन म्हशी घेऊन आला होता. त्याचे हे बोलणे बराच वेळ सुरू होते.ही सगळी आजबाजूला चर्चेची गुऱ्हाळं सुरू असताना दुभती म्हैस खुंट्याला बांधून एका उंचवट्यावर बसलेले फुलंब्रीचे किशोर चव्हाण दिसले. हाताच्या कवेत पाय घेऊन बसलेले चव्हाण मध्येच शेजाऱ्याशी बोलायचे. मध्येच शांत होऊन म्हशीकडे बघत बसायचे. त्यांच्याकडे पीक-पाण्याचा विषय निघाला. त्यांनीही पावसाचीच गोष्ट सांगितली. इतके तितके पिकते त्याला नीट दाम मिळत नाही. खर्च निघत नाही. मग हात-पाय हलवावेच लागतात. जेव्हा पर्यायच उरत नाही, तेव्हा जनावरे अशी बाजारात उभी करावी लागतात. दुष्काळात सापडलेल्या प्रत्येक शेतकऱ्याची हीच गत आहे, असे किशोर चव्हाण म्हणाले. त्यांच्या आजूबाजूला असलेली गर्दी, खरेदी- विक्रीची चर्चा अखंडितपणे सुरूच होती. या गर्दीत शेतकऱ्यांचा आवाज क्षीण झालेलाच दिसला. 

भावाचे गणितच कळत नाहीयाच बाजारात चौक्याहून शंकर वाघ मित्राची म्हैस घेऊन आलेले. व्यापारी मेळ लागू देत नाही म्हणूून त्यांनी हाताशी एजंट धरला होता. वर्षभरापूर्वी छावणीच्याच बाजारातून त्यांनी ९० हजारांत ही म्हैस घेतली होती. दीड हजार भाडे देऊन सकाळी बाजार गाठला. व्यापारी आले त्यांनी पाडून मागितली. शेवटी एका शेतकऱ्यालाच ७५ हजारांत त्यांनी विकली. इतकी कमी कशी विकली? असे म्हणताच ते म्हणाले, आर्थिक चणचण असते. लोकांची देणी असतात. आता आणायचे दीड हजार घेतले. गिºहाईक नाही भेटल्यावर घरी न्यायचे म्हणजे पुन्हा हजारेक रुपये भाडे द्यावे लागणार. पुन्हा पुढच्या बाजारात हेच झाले तर? मुर्दा म्हसणात आणला की फुकावाच लागतो. परत घरी नाही नेता येत. हीच गत शेतमालाबरोबर जनावरांचीही आहे. शेतातला माल बाजारात आला की, भाव पडतो. माल संपला की, पुन्हा वाढतो. बाजारात आणलेला माल परतही नेता येत नाही. चोहीकडूनच कोंडी होते. भावाचे हे गणितच कळत नाही, शेतकरी तरी काय करणार? 

टॅग्स :droughtदुष्काळagricultureशेतीFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र