शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

Drought In Marathwada : मराठवाड्यात टँकरविना पर्याय नाही; ४० लाख ग्रामस्थांची तहान टँकरच्या पाण्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 12:08 IST

गावांची तहान वाढली; १७८७ गावांत वणवण  

औरंगाबाद : चैत्र समाप्ती आणि वैशाखाच्या तोंडावर मराठवाड्यातील ग्रामीण भागाची तहान वाढली आहे. दुष्काळ आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई भयावह असल्यामुळे टँकरविना नागरिकांना कुठलाही पर्याय शिल्लक राहिलेला नाही. मराठवाड्यातील सुमारे ४० लाख लोकसंख्येला टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो आहे. या दशकातील सर्वाधिक त्रस्त असा दुष्काळ यावर्षी आहे. 

१७८७ गावे आणि ६२५ वाड्यांमध्ये २ हजार ४७० टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो आहे. वैशाख महिन्यात हे प्रमाण आणखी वाढण्याची शक्यता आहे. टँकरने पाणीपुरवठा करण्यात दर आठवड्याला ७२ टँकर आणि ८३ हजार ९३४ नागरिकांची ३७ गावे आणि १४ वाड्यांची भर पडते आहे. विभागात सर्वाधिक औरंगाबाद जिल्हा दुष्काळात होरपळतो आहे. जिल्ह्यातील सुमारे ५० टक्के लोकसंख्या टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहे. १३७३ पैकी ६६३ गावे आणि २४९ वाड्यांवर ९८० टँकरचे पाणी द्यावे लागते आहे. १५ लाख ६ हजार ९७२   पाणी दिले आहेत. ७४७ टँकर ५४९ गावे आणि २५५ वाड्यांवर सुरू आहेत. त्याखालोखाल जालना जिल्ह्यातील ७ लाख ९९ हजार ७५३ नागरिकांना ४४६ टँकरने पाणीपुरवठा होतो असून, जिल्ह्यातील ३७६ गावे आणि ७८ वाड्या तहानल्या आहेत. 

विभागातील प्रकल्पात ३.७२ टक्केच पाणीविभागातील सर्व मिळून ८७२ प्रकल्पांत ३.७२ टक्के पिण्याचे पाणी शिल्लक आहे. ११ मोठ्या प्रकल्पांत ४ टक्के, ७५ मध्यम प्रकल्पांत ३.१५ टक्के, ७४९ लघु प्रकल्पांत ३.२१ टक्के, तर १३ गोदावरी नदीवरील बंधा-यांत ४.४७ टक्के पाणीसाठा आहे. तेरणा, मांजरा आणि रेणा नदीवरील २४ बंधाºयांत एकही थेंब पाणी नाही. ३०४ दलघमी पाणीसाठा सध्या सर्व प्रकल्पांत आहे. 

जिल्हा        लोकसंख्या    गावे/वाड्या    टँकरऔरंगाबाद    १५०५९७२        ६६३/२४९        ९८०जालना        ७९९७५३        ३७६/७८        ४४६परभणी        ४७४४७        २१/५        ४२हिंगोली    ४२१७६        २०/८        ३४नांदेड        १११९१३        ४३/१८        ७३बीड        १०८५९४५        ५४९/२५५        ७४७लातूर        ८१२४९        २८/७        ३८उस्मानाबाद    २३८९४९        ८७/५        ११०एकूण        ३९१४४०४    १७८७/६२५    २४७० 

टॅग्स :Marathwadaमराठवाडाdroughtदुष्काळWaterपाणी