शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया चषक जिंकल्यावर मध्यरात्रीच बीसीसीआयची मोठी घोषणा; खजिना रिता केला..., पाकिस्तानींना काय मिळाले...
2
९ कंपन्यांचे IPO आजपासून झाले खुले, गुंतवणूकीचा विचार करताय का? पाहा GMP सह अन्य डिटेल्स
3
"राहुल गांधींच्या छातीत गोळ्या घालू", भाजप प्रवक्त्याचे टीव्हीवरील चर्चेत विधान, काँग्रेसचे अमित शाहांना पत्र
4
नेपाळचे माजी पंतप्रधान ओली यांना काठमांडू सोडण्यास मनाई, पासपोर्ट निलंबित, देखरेखीखाली ठेवले
5
₹८५७ वर लिस्ट झाला हा आयपीओ; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना तुफान फायदा, झाले मालामाल
6
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
7
धनश्री वर्माने पोटगीसंदर्भात पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर केलं भाष्य; म्हणाली, "लोक जे बोलतात..."
8
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
9
या नालायकांबरोबर युती करणार नाही; शिंदेसेनेच्या आमदाराची अजितदादांच्या राष्ट्रवादीवर बोचरी टीका
10
"वडिलांची जागा मी कधीच घेऊ शकत नाही, पण..."; ठाकरेंच्या आमदाराने घेतले श्वेताचे पालकत्व 
11
Tata Capital IPO: गुंतवणूकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक, टाटा कॅपिटलनं सेट केला प्राईज बँड; GMP पण सुस्साट, पाहा डिटेल्स
12
मुंब्रा अपघात काळ्या बॅगेमुळेच! तीन महिन्यांच्या चौकशी अहवालात कारण स्पष्ट
13
कोण आहेत मोहसिन नकवी? जे टीम इंडियाची ट्रॉफी घेऊन पळून गेले; 'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारताविरोधात...
14
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
15
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
16
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
17
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
18
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
19
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
20
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी

Drought In Marathwada : दुष्काळाची ‘झळ’ एकीकडे; मूल्यमापनाची ‘कळ’ दुसरीकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 20:50 IST

मराठवाड्यात जवळपास सर्वच गावे दुष्काळाच्या खाईत जाण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देअध्यादेशाच्या अधीन राहून दुष्काळ पाहणी  सरकारी यंत्रणा काही तरी गडबड करून ठेवणार 

- विकास राऊत 

औरंगाबाद : मराठवाड्यात जवळपास सर्वच गावे दुष्काळाच्या खाईत जाण्याची शक्यता आहे. असे असताना दुष्काळ मूल्यमापनाची ‘कळ’ (ट्रीगर) एकीकडे असून, दुष्काळाच्या ‘झळा’ मात्र दुसरीकडे असल्याच्या तक्रारी विभागीय प्रशासनापर्यंत येऊ लागल्या आहेत. आॅक्टोबर २०१७ च्या अध्यादेशाच्या अधीन राहून सरकारी यंत्रणा १० टक्के गावांच्या अनुमानावरून दुष्काळ मध्यम किंवा गंभीर असल्याचा अंदाज बांधत आहे. या मूल्यमापनात मोठी गडबड होऊन शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची चिन्हे निर्माण होतील, अशी भीती व्यक्त होत आहे. हे सगळे वेळीच थांबविण्याची मागणी मराठवाड्यातील ग्रामीण भागातून होत आहे. 

दुष्काळ मोजण्यासाठी जी कळ लावली आहे, ती तालुक्याला लावली आहे. तालुक्याच्या विवरणानुसार दुष्काळाचे मूल्यमापन कसे होणार? उदाहरण पाटोदा तालुक्याचे घेतले तर असे दिसते की, तेथे पाण्याखाली १० टक्के किती गावे असतील, उर्वरित ९० टक्के गावे कशी मोजणार, याची अडचण येत आहे. मंडळनिहाय, सजानिहाय गावांची अवस्था पाहिली जात नाही. शितावरून भाताची परीक्षा अशा पद्धतीने दुष्काळाचे मूल्यमापन होत आहे.विभागात खरिपात ६३ टक्के पाऊस पडला आहे. रबीसाठी तर पाऊसच पडलेला नाही. रबीसाठी मातीमध्ये जो ओलावा लागतो, तो निर्माण झालेला नाही.

मराठवाड्यात दुष्काळाची वरवर होत असलेली पाहणी आणि कागदोपत्री अहवाल नुकसानदायक ठरू शकते. पाऊस किती पडला, पिकांची परिस्थिती हा भाग वेगळा; परंतु हंगामनिहाय उत्पादनाचा हिशेब होेणे अवघड आहे. तळागातील शेतकऱ्यांच्या बाबतीत विचार होताना दिसत नाही. रबीतील पेरणी अद्याप सुरू झालेली नाही. तालुक्याच्या ठिकाणी कळ लावून पूर्ण तालुक्याची पाहणी होणे अशक्य आहे. विभागीय प्रशासनातील अधिकाऱ्यांनी कृषी आयुक्त सत्येंद्रसिंह प्रताप यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली; परंतु त्यावर काही परिणाम झाला नाही. 

पावसाची आकडेवारी बेवसाईटवर अपलोड करण्यात येत आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली हा सगळा कार्यक्रम सुरू आहे. निवासी उपजिल्हाधिकारी सचिव आहेत. पैसेवारी किती आली, पाऊस किती पडला, पीक कापणीची आकडेवारी यानुसार कळ लावली जात आहे. पिकांचे उत्पादन, भूजल पातळी याची आकडेवारी गृहीत धरण्यात येत आहे. तालुक्यात बसून पूर्ण गावांचा पाऊस कसा मोजणार, भौगोलिकदृष्ट्या पावसाचा समतोल कसा तपासणार, हा प्रश्न आहे. 

मंडळनिहाय तरी पाहणी व्हावी, अशी मागणी होत आहे. प्रत्येक मंडळात १८ ते २० गावे येतात. ४ ते ५ सजा असतात. त्यानुसार तरी पाहणी व्हावी. म्हणजे मराठवाड्यात नेमके दुष्काळाची अवस्था कशी आहे, याचा अंदाज लागेल. हा सगळा विचित्र कारभार सुरू असल्याचे मत शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे. प्रशासनातील काही अधिकाऱ्यांची तळमळ आहे; परंतु त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. शेतकऱ्यांची चोहोबाजूंनी कोंडी होत आहे. कळ तालुक्याऐवजी मंडळनिहायपर्यंत पोहोचावी. ७६ तालुक्यांत किती पाऊस पडला, यानुसार दुष्काळाचा अंदाज कसा लावला जाणार, याचा विचार होणे गरजेचे आहे. 

मराठवाड्यातील भौगोलिक परिस्थिती अशीएकूण जिल्हे : ८शेतकरी किती : ६२ लाख अंदाजेखरीप व रबी पेरणी : ६० लाख हेक्टरच्या आसपास तालुक्यांची संख्या : ७६गावांची संख्या : ८५३३मंडळांचा आकडा : ४६३आजवर झालेला पाऊस : ६३ टक्के खरीप हंगाम गेलेली गावे : २९५८

टॅग्स :droughtदुष्काळMarathwadaमराठवाडाState Governmentराज्य सरकारRainपाऊस