शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
4
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
5
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
6
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
7
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
8
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
9
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
10
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
11
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
12
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
13
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
14
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
15
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
16
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
17
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
18
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
19
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
20
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन

जायकवाडीसाठी सोडले ६; पण पोहोचले केवळ ३.८ टीएमसी पाणी

By सुधीर महाजन | Updated: November 16, 2018 12:42 IST

दोन टीएमसी पाणी येतानाच नदीपात्रामध्ये जिरणार, असे गृहीतक मांडून ७ टीएमसी पाणी जायकवाडीत पोहोचणार, असे नियोजन करून ते सोडण्यात आले होते

- सुधीर महाजन

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांतील धरणांमधून ९ टीएमसी पाणी जायकवाडीत सोडले जाणार होते. यापैकी दोन टीएमसी पाणी येतानाच नदीपात्रामध्ये जिरणार, असे गृहीतक मांडून ७ टीएमसी पाणी जायकवाडीत पोहोचणार, असे नियोजन करून ते सोडण्यात आले; परंतु आतापर्यंत केवळ ३.८ टीएमसीच पाणी जायकवाडीत पोहोचले आहे. नाशिकमधून येणारे पाणी बंद झाले. अहमदनगरच्या निळवंडे धरणातून २ हजार क्युसेक्स, तर ओझरमधून १,४०० क्युसेक्स पाणी सोडण्यात येत आहे. यापैकी ओझरमधील ८०० क्युसेक्स हे डाव्या कालव्यातूनच वाहत असल्याने जायकवाडीत पोहोचले नाही. म्हणजे वरून ६ टीएमसी पाणी सोडले; पण जायकवाडीत केवळ ३.८ टीएमसीच पोहोचले. जायकवाडीसाठी सोडलेले पाणी कुठे ‘जिरले’ हा नवाच प्रश्न निर्माण झाला आहे. आता वरून पाणी सुटणार नाही.

सर्वोच्च न्यायालयाने आदेश देऊनही जायकवाडीत पाणी सुटणार नाही, हे आता स्पष्ट झाले. ‘जिसकी लाठी उसकी भैंस’ या न्यायाने पाण्याच्या प्रश्नाकडे पाहिले जाते हेच या प्रकरणात आजवर स्पष्ट झाले आहे. जायकवाडीसाठी पाणी सोडले जाते; पण ते कालव्याद्वारे वरच्या भागात फिरविले जाते, ही गोष्ट लपून राहिलेली नाही. शिवाय या प्रश्नातील राजकीय दंडेली ही मराठवाड्याच्या न्याय्य हक्कावर गदा आणते. जायकवाडीसंदर्भात तर हा अन्याय पावला-पावलावर दिसतो. उदाहरण द्यायचे झाले, तर जायकवाडीच्या मूळ नियोजनानुसार १९६ टीएमसी पाणी उपलब्ध असायला हवे. याचे वाटपही त्या आराखड्यात निश्चित केले होते. १९६ पैकी ११५ टीएमसी पाणी अहमदनगर आणि नाशिकसाठी जायकवाडीत प्रवाहित होणारे ९४.४ टीएमसी. जायकवाडीतून माजलगाव धरणामध्ये १२.४ टीएमसी, प्रवासी सिंचनासाठी ४९ टीएमसी, अशी तरतूद आहे.

यातून पिण्यासाठी व उद्योगासाठीच्या पाण्याचा कोठेही उल्लेख नाही. हे नियोजन असले तरी वास्तव वेगळेच आहे. वास्तवात जायकवाडीपर्यंतच्या गोदावरी खोऱ्यात १५६ टीएमसी पाणी उपलब्ध आहे. ४० टीएमसी पाण्याची तूट पडली. कारण सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करून मोजल्यामुळे हा फरक पडला; पण हा फरक केवळ जायकवाडीत पडतो. याच खोऱ्यातील नगर, नाशिकच्या धरणांतील अंदाजित उपलब्ध पाण्यात तो पडत नाही, हे एक कोडेच आहे. म्हणजे जायकवाडीपर्यंत पोहोचणारे ४० टीएमसी पाण्याचे क्षणात बाष्पीभवन होते का? आज मराठवाड्यासाठी पाणी सोडताना ते पूर्ण खाली येऊ देण्याऐवजी वरच्या कालव्यांमधून लाभक्षेत्रात फिरविले जाते. मराठवाड्यात पिण्याच्या पाण्याचा भीषण प्रश्न असताना वरच्या भागात मात्र ऊस डोलताना दिसतो.

मराठवाड्यातून आंध्र प्रदेशात गोदावरी प्रवेश करते त्या नांदेड जिल्ह्यात बाभळी बंधारा आहे. येथेही वरचे आणि खालचे, असा वाद निर्माण झाला. जी भूमिका नगर, नाशिकची तीच येथे मराठवाड्याकडे आली; पण सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार १ जुलै ते २८ आॅक्टोबरपर्यंत बंधाऱ्याचे दरवाजे उघडे राहतील. ९ आॅक्टोबर ते ३० जून या काळात बंधाऱ्यातून २.७४ टीएमसीपेक्षा जास्त पाणी वापर होणार नाही. दरवर्षी १ मार्च रोजी ०.६ टीएमसी पाणी मराठवाड्यातून आंध्र प्रदेशात सोडण्यात येईल. या अटींची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी केंद्रीय जल आयोग, महाराष्ट्र व आंध्र प्रदेश यांचे प्रतिनिधी, अशी त्रिसदस्यीय समिती नेमण्याची शिफारसही केली आहे. जायकवाडीच्या बाबतीत असलेल्या आदेशाची तर पायमल्ली होताना दिसते. असे असतानाही लोकप्रतिनिधी बघ्याची भूमिका घेतात, हे लपून राहत नाही. आज या पाण्याविषयी एकही लोकप्रतिनिधी आवाज उठवत नाही, ही मराठवाड्याची शोकांतिका आहे.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणAurangabadऔरंगाबादWaterपाणीMarathwadaमराठवाडा