शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळी मराठवाड्यात शेतकरी जनावरांच्या चाऱ्यासाठी अहमदनगरच्या उसावर अवलंबून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 13:46 IST

भाव कडाडले तरी पशुधनासाठी खरेदी

ठळक मुद्देलासूरमध्ये २५० टनाची दररोज विक्री खरेदीसाठी होतेय शेतकऱ्यांची गर्दी

लासूर स्टेशन (औरंगाबाद ) : पावसाळ्याच्या तोंडावर जनावरांच्या वैरणासाठी लागणाऱ्या उसाचे भाव कडाडले असून मंगळवारी लासूर स्टेशन येथे प्रति टन उसासाठी ४४०० रुपये शेतकऱ्यांना मोजावे लागले. 

आधीच दुष्काळात होरपळलेल्या शेतकऱ्यांना यामुळे मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. लासूर स्टेशन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात दररोज २५० टनाहून अधिक उसाची हातोहात विक्री होत आहे. तीव्र दुष्काळी परिस्थितीमुळे यंदा शेतकऱ्यांना शेतमाल तर झालाच नाही. पाठोपाठ वर्षभर पुरेल इतका चाराही झाला नाही. त्यामुळे पशुपालक शेतकऱ्यांपुढे जनावरांना सांभाळण्याचे मोठे संकट उभे ठाकले होते. मोठी कसरत करीत हिवाळ्यापासून आतापर्यंत शेतकऱ्यांनी जनावरांची व्यवस्था केली. परंतु आज रोजी वाढलेल्या चाऱ्याच्या भावामुळे शेतकऱ्याचे कंबरडेच मोडले आहे.

नगर जिल्ह्यातून येतो ऊस       ऊस घेण्यासाठी येथे स्थानिक शेतकऱ्यांसह वैजापूर, देवगाव, कन्नड व खुलताबाद भागातून शेतकरी येत आहेत. त्यामुळे येथे येणारा ऊस खरेदी करण्यासाठी अक्षरश: झुंबड उडत आहे. त्यामुळे सहाजिकच उपलब्ध असलेला ऊस हा चढ्या भावाने विक्री होत आहे. स्वत:कडे चारा उपलब्ध नसल्यामुळे मिळत असलेल्या भावानुसार शेतकऱ्यांना चारा खरेदी करण्याशिवाय पर्याय उरला नाही. अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा, भेंडा, शेवगाव परिसरातून आज आलेला ऊस तब्बल चार हजार चारशे रुपये प्रति टनाने हातोहात विक्री झाला आहे.

पर्याय नसल्याने चढ्या भावाने खरेदी गुरांना खाऊ घालण्यासाठी सध्या आमच्याकडे काहीच शिल्लक नसल्यामुळे मिळत असलेल्या भावात ऊस घेण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही, असे पोटूळ येथील शेतकरी जगन्नाथ कापसे यांनी सांगितले. दुसरा पर्याय उपलब्ध नसल्यामुळे इतक्या मोठ्या भावाने खरेदीसाठी शेतकऱ्यांची झुंबड उडत आहे, असे धामोरी येथील शेतकरी ज्ञानेश्वर कोकरे यांनी सांगितले.

टॅग्स :droughtदुष्काळMarathwadaमराठवाडाFarmerशेतकरी