शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

ड्रेनेजच्या चेंबरमधून घुसविली पिण्याच्या पाण्याची लाईन, पाणी कसे मिळणार शुद्ध ?

By साहेबराव हिवराळे | Updated: April 18, 2024 15:54 IST

एक दिवस एक वसाहत: लायन्स क्लब कॉलनी, कासलीवाल पूर्व, दत्तनगर, सद्गुरू सोसायटी, शोभानगर, श्री गणेशा, रॉयल पार्क, विमान नगरात पाण्याचा प्रश्न गंभीर

छत्रपती संभाजीनगर : ड्रेनेज चेंबरमधून पाण्याची लाईन घुसविली असल्याने सुरुवातीची दहा ते पंधरा मिनिटे पाणी वाया जाऊ द्यावे लागते. त्यानंतर पाणी भरावे लागते. जालना रोडलगत असलेला लायन्स क्लब कॉलनी, कासलीवाल पूर्व, दत्तनगर, सद्गुरू सोसायटी, शोभानगर, श्री गणेशा, रॉयल पार्क, विमाननगर परिसर गजबजलेला असला तरी येथे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे.

कुठे रस्ते अपूर्ण तर कुठे पथदिव्यांची कमतरता आहे. परिसर जलदगतीने विस्तारत असून महानगरपालिकेकडे कर अदा करूनही सुविधा देण्याकडे कानाडोळा केला जात आहे. उन्हाळ्यातील पाणीटंचाईला तोंड देण्यासाठी लोकप्रतिनिधीने दिलेले हातपंप किरकोळ दुरुस्तीअभावी बंद आहेत. घंटागाडी चालकाने दांडी मारल्यास प्रवेशद्वारावरच दुर्गंधीचा त्रास स्थानिकांना सहन करावा लागतो. कारण तेथे कचरा जमा केलेला असतो. ड्रेनेेजच्या जुन्याच लाईन असल्याने चोकअप होण्याचे प्रकारही वाढलेले आहेत. जालना रोड ओलांडून जाताना किंवा मॉर्निंग वॉक करणाऱ्यांना धोका असून लोखंडी जाळ्यांमुळे वाहनाचा अंदाज येत नाही, तेव्हा रस्ता ओलांडणे धोकादायक ठरते.

रेशन दुकान हवेरेशन दुकान नसल्याने चिकलठाणा गावात जावे लागते. चिकलठाणा येथे रेशन दुकानात जाऊन शासकीय योजनेचा लाभ घ्यावा लागतो. अनेकदा उशीर झाल्यास तो मिळत नाही. शासनाने या परिसरासाठी नवीन दुकान दिले पाहिजे.- शेख मतीन, रहिवासी

आरोग्याची समस्याघाण पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याची समस्या निर्माण झाली आहे. याविषयी मनपा आयुक्तांकडे अनेकदा तक्रारी करूनही काम मार्गी लागले नाही. त्वरित पाणी व ड्रेनेजलाईन वेगळी करावी. लायन्स क्लब कॉलनी, कासलीवाल पूर्व दत्तनगर, सद्गुरू सोसायटी श्री गणेशा रॉयल पार्क विमाननगरात दूषित पाण्याची समस्या सोडवावी.- सुरेश पवार, रहिवासी

बालवाडी, अंगणवाडी हवीमनपाने बालवाडी, अंगणवाडी व्यवस्था केलेली नाही. सर्वसामान्य नागरिकांना खासगी शाळा परवडत नाही. नाईलाजास्तव कामगार व मध्यमवर्गीयांना मुलांना लांबच्या शाळेत टाकावे लागते. दूरवर ने-आण करणे पालकांसाठी त्रासदायक ठरते.- शेख कलीम, रहिवासी

एकाच खांबावरून जोडण्या किती?शोभानगरातील नागरिकांना प्रशस्त रस्ता म्हाडापासून सुरू असला तरी इतरत्र रस्ता बंद करण्यात आला आहे. विजेचा एकच खांब असून स्थानिक नागरिकांना वीज जोडणी घेताना लाकडी खांबाचा टेकू द्यावा लागतो. सुरळीतपणे वीज मिळावी यासाठी तिन्ही गल्ल्यांत विजेचे खांब टाकून द्यावेत. नाईलाजाने एकाच खांबावरून धोकादायक जोडणी करावी लागते.- संजय दुसाने, रहिवासी

टॅग्स :WaterपाणीAurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका