शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

‘पीईएस’ अध्यक्षपदाच्या खुर्चीत बाबासाहेब बसले होते, ती खुर्ची विखुरली जाऊ देऊ नका: ज. वि. पवार

By विजय सरवदे | Updated: April 22, 2023 19:27 IST

बाबासाहेबांच्या या खुर्चीचे पावित्र्य राखण्यासाठी तिचे अनेक तुकड्यात विभागणी होणार नाही, याची दक्षता मिलिंद महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी घ्यावी.

छत्रपती संभाजीनगर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मोठ्या कष्टाने पीपल्स एज्युकेशन सोसायटीची उभारणी केली. मात्र, आज या संस्थेचे अध्यक्षपद अनेक तुकड्यात विखुरले आहे. अध्यक्षपदाच्या ज्या खुर्चीत बाबासाहेब बसले होते, ती खुर्ची विखुरली जाऊ देऊ नका, तिचे पावित्र्य राखा, तेव्हाच मला दिलेल्या आजच्या या पुरस्काराचे चीज होईल, असे भावनिक आवाहन दलित पँथरचे संस्थापक सदस्य ज. वि. पवार यांनी आज येथे केले.मिलिंद कला महाविद्यालयाच्या वतीने शुक्रवारी, २१ एप्रिल रोजी ज. वि. पवार यांना सन २०२२-२३ या वर्षाच्या ‘मिलिंद सामाजिक कृतज्ञता पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ. वैशाली प्रधान होत्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मानपत्राचे वाचन उपप्राचार्य डॉ. संतोष बुरकुल यांनी केले.

सत्काराला उत्तर देताना ज. वि. पवार म्हणाले, बाबासाहेबांनी समाजाला ‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’, हा मूलमंत्र दिला. पीईएसच्या मुंबईतील सिद्धार्थ कॉलेज आणि या शहरातील मिलिंद महाविद्यालयाच्या माध्यमातून समाजासाठी उच्चशिक्षणाची दारे खुली केली. मिलिंद महाविद्यालय आणि मराठवाड्यावर बाबासाहेबांचे विशेष प्रेम होते. समाजातील मुलं शिकली, तर महत्त्वाच्या पदावर विराजमान होऊन समाजाचे भले करतील, अशी त्यांना अपेक्षा होती. मात्र, या प्रदेशातील मुलांनी ‘मिलिंद’चा पाहिजे तेवढा लाभ घेतला नाही. यापुढे समाजातील उच्चशिक्षित असलेला आणि समाजाच्या प्रश्नांसाठी संघटन वाढवून संघर्ष करण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या व्यक्तीला ‘पीईएस’च्या वतीने पुरस्कार देऊन सन्मानित करावे.

बाबासाहेबांची ही संस्था सरकारने ताब्यात द्यावी, यासाठी १९७६ मध्ये काही मंडळींनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले होते. ते आम्ही हाणून पाडले. त्यानंतर अलीकडे पीईएसचे अध्यक्षपद अनेक तुकड्यात विखुरले गेले. मलाही एका तुकड्यावर बसविण्यासाठी विचारणा झाली होती. पण, मी नम्रपणे नकार दिला. बाबासाहेबांच्या या खुर्चीचे पावित्र्य राखण्यासाठी तिचे अनेक तुकड्यात विभागणी होणार नाही, याची दक्षता मिलिंद महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी घ्यावी.

देश दुभंगण्याच्या वाटेवरसंविधानाच्या नावावर देश तोडण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. संविधानाला विरोध आणि समर्थन, असे थेट दोन प्रवाह आहेत. तुम्ही समाजातील ‘क्रीम’ आहात. जास्तीत जास्त लाेकांना संविधानाची बाजू समजून सांगा. लोकांना संविधानाच्या बाजूने उभे करा आणि देश दुभंगणार नाही, याची काळजी घ्या, असे आवाहन ज. वि. पवार यांनी केले.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरNagsen vanनागसेन वनAurangabadऔरंगाबाद