शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
3
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
4
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
5
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
6
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
7
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
8
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
9
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
10
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
11
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
12
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
13
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
14
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
15
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
16
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
17
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
18
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
19
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी
20
सोने आणखी किती भाव खाणार? २०११ सारखीच वाढ, कशाचे संकेत...

हताश होऊ नका, सावकाराच्या जबरदस्तीला लगाम; बळकावलेली शेती मिळते परत !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2022 13:15 IST

ही जमीन परत मिळू शकते. मात्र यासाठी पुरावे आवश्यक असतात.

- स. सो. खंडाळकरऔरंगाबाद : सावकाराने शेतकऱ्याची जमीन बळकावली असेल आणि संबंधित शेतकऱ्याने पंधरा वर्षांच्या आत तशी तक्रार जिल्हा निबंधकांकडे केली, तर ही जमीन परत मिळू शकते. मात्र यासाठी पुरावे आवश्यक असतात.

१) पंधरा वर्षांच्या आत करा अर्जतक्रार देतानाच्या आधी पंधरा वर्षांत व्यवहार व्हायला हवा. यासंदर्भात २०१४ साली कायद्यात संशोधन झाले.

२) २०१४ पासून ४२ लोकांना जमिनी परत केल्या २०१४ पासून औरंगाबाद जिल्ह्यात ४२ शेतकऱ्यांना जमिनी परत करण्यात आल्या. अर्थात यात अपील करण्याचीही सोय आहे.

३) तक्रार कोठे व कशी करायची?जिल्हा उपनिबंधकांच्या कार्यालयात, सहाय्यक निबंधकांच्या कार्यालयात तक्रार करता येते. गोपनीय स्वरूपात स्वत: तक्रारदाराने तक्रार करायला हवी. विशेषत: यात पुरावे देणे गरजेचे आहे.

४) जिल्ह्यात नोंदणीकृत ११५ सावकार मार्च २०२२ अखेर औरंगाबाद जिल्ह्यात ११५ नोंदणीकृत सावकार आहेत. अनेक तालुक्यांमध्ये नोंदणीकृत सावकार नाहीत.

५) किती टक्क्याने सावकारी करण्याचा परवाना?तारण कर्जाला प्रतिवर्षी ९ टक्के व्याजदर आहे, तर विनातारण कर्जाला प्रतिवर्षी १२ टक्के व्याजदर आकारून सावकारी करता येते. शेतकऱ्यांव्यतिरिक्त कुणीही कर्ज घेतले असेल तर तारण कर्जाला १५ टक्के व विनातारण कर्जाला १८ टक्के व्याजदर आकारण्याची अट आहे.

अर्ज करतानाच्या आधीच्या पंधरा वर्षांपूर्वी सावकाराने जमीन बळकावली असेल, तर तक्रारदार शेतकऱ्याला त्याची शेती परत करता येऊ शकते. अर्थात स्वत: शेतकऱ्याने पुराव्यानिशी तक्रार द्यायला हवी. यासंदर्भात जागरुकतेची आवश्यकता आहे.- अनिलकुमार दाबशेडे, जिल्हा उपनिबंधक, औरंगाबाद

टॅग्स :AurangabadऔरंगाबादRevenue Departmentमहसूल विभाग