शहरं
Join us  
Trending Stories
1
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
2
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
3
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
4
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
5
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
6
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
7
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
8
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
9
हुंडाबळीच्या खटल्यात पती, सासूला सक्तमजुरी; १५ वर्षांची शिक्षा
10
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
11
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
12
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
13
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
14
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
15
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
16
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
17
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
18
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
19
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
20
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?

मुंबई मराठा समाजाची नाही का? शिवसेना नेते अंबादास दानवे यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 20:08 IST

मराठी बांधवांनीच हुतात्म्य दिल्यामुळे मुंबई आज महाराष्ट्रात आहे.

छत्रपती संभाजीनगर: मुंबईत दाखल आंदोलक मराठा बांधवांचा त्रास होत असल्याच्या तक्रारी मुंबईकर करीत आहेत. मुंबई मराठा समाजाची नाही का असा सवाल विधान परिषदेतील माजी विरोधी पक्षनेते तथा उद्धवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी सोमवारी येथे पत्रकारांशी बोलताना केला. मराठी बांधवांनीच हुतात्म्य दिल्यामुळे मुंबई आज महाराष्ट्रात आहे. आंदोलकांचा त्रास होत असेल तर मराठा समाजाच्या मागण्या मान्य करण्यासाठी सरकारवर मुंबईकरांनी दबाव आणावा, असेही त्यांनी सांगितले.

उद्धवसेनेचे नेते दानवे म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलन करण्याची माहिती चार महिने आधीच सरकारला दिली होती. मात्र सरकारने खबरदारी घेणे आवश्यक होते. या आंदोलनामुळे मुंबईतील व्यवस्थेवर ताण पडला असू शकतो. मात्र यास सरकारच जबाबदार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्यावर पाण्याची बाटली फेकण्याच्या घटनेकडे लक्ष वेधले असता दानवे म्हणाले की, आंदोलनस्थळी भेट देण्यासाठी नेते जात असतात तेव्हा आंदोलकांनी सयंमाने व्यवस्थित वागावे ,असे आपले मत आहे. 

ओबीसी महासंघ एरव्ही झोपलेलामराठा आरक्षणाबाबत भूमिका जाहिर करा,असे सत्ताधारी म्हणत असतात, याविषयी विचारले असता दानवे म्हणाले की, तुमच्याकडे बहुमत असताना चार, सहा खासदार , १०आमदार असलेल्या शरद पवार यांचे मत कशाला हवं असा सवाल त्यांनी केला. राज्यसरकार केवळ राज्यात द्वेष आणि अशांतता निर्माण करीत असल्याचा थेट आरोपही दानवे यांनी केला. जरांगे यांच्या आंदोलनविरोधात ओबीसी महासंघाची आज पुण्यात बैठक झाली याकडे लक्ष वेधले असता दानवे म्हणाले की, जरांगे यांनी आंदोलन सुरू केले तरच यांना जाग येते. एरव्ही ते लोक झोपलेले असतात.

मराठा समाजाला न्याय द्यावामनोज जरांगे यांनी मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करण्याची केलेली मागणी योग्यच आहे. विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाज कुणबीच आहे. सरकारने जरांगे यांची मागणी मान्य करून मराठा समाजाला न्याय द्यावा,असेही दानवे यांनी नमूद केले.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरAmbadas Danweyअंबादास दानवेMaratha Reservationमराठा आरक्षण