शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोणत्याही देशाच्या दबावाखाली व्यापार करार करणार नाही", पीयूष गोयल यांचे अमेरिकेला खडेबोल
2
धडाकेबाज PSI 'बदने'वर बलात्काराचा आरोप! तस्करांना पकडणारा अधिकारी महिला डॉक्टरच्या मृत्यूनंतर फरार
3
'All is not well with the UN', संयुक्त राष्ट्र संघाबाबत जयशंकर यांचे मोठे वक्तव्य...
4
Asia Cup Trophy Hidden Place In Abu Dhabi : पाकची नवी नौटंकी! आशिया कप ट्रॉफी अबुधाबीत लपवली?
5
आशियाई हवाई हद्दीत अचानक उडताना दिसली रशियाची आण्विक फायटर जेट्स, नेमकं प्रकरण काय?
6
काही सेकंदात होतात जळून खाक, खाजगी बसला आग लागल्यावर प्रवाशांचं वाचणं का होतं कठीण?
7
अरे बापरे! कर्मचाऱ्याच्या प्रेमात वेडी झाली मालकीण; लग्नानंतर 'त्याने'च लावला कोट्यवधींचा चुना
8
मॅडॉक फिल्म्सच्या 'चामुंडा'मध्ये आलिया भटची एन्ट्री कन्फर्म? दिग्दर्शक अमर कौशिक म्हणाले...
9
इराणमध्ये महागाईचा कहर! हप्त्यांवर कबरीच्या दगडांची खरेदी; कारण जाणून घ्या
10
VIDEO: विराट कोहलीचा 'माईंड गेम'! आधी ट्रेव्हिस हेडशी गप्पा अन् मग पुढच्याच चेंडूवर विकेट
11
भारतानंतर आणखी एक देश पाकिस्तानचे पाणी अडवणार, कुनार नदीवर धरण बांधण्याची तयारी सुरू
12
Honda vs Suzuki: होन्डा अ‍ॅक्टिव्हा आणि सुझुकी अ‍ॅक्सेसमध्ये चुरस; कोण आहे 'स्मार्ट फीचर्स'चा खरा किंग? वाचा
13
खळबळजनक दावा! सत्ताधारी २१ आमदारांना 'दिवाळी गिफ्ट'; एकाच ठेकेदारानं दिल्या आलिशान डिफेंडर कार?
14
बुध गुरु युती २०२५: बुध-गुरुचा शक्तिशाली नवपंचम राजयोग; 'या' ७ राशींचा सुखाचा काळ होणार सुरु
15
चंद्रशेखर बावनकुळेंची भाजपा कार्यकर्त्यांना तंबी; "सर्वांचे व्हॉट्सअप ग्रुप सर्व्हेलन्सवर..."
16
मुलगा की मुलगी? नवजात अर्भकांच्या अदलाबदलीवरून दोन कुटुंबांमध्ये हॉस्पिटलमध्येच वाद
17
हेअर फॉलचा वैताग! लसूण की कांद्याचा रस... काळ्याभोर लांब, जाड केसांसाठी सर्वात बेस्ट काय?
18
भारतीय नौदल चीन, पाकिस्तान, तुर्कीला धक्का देणार! तीन पावले उचलली
19
लग्नानंतर तापसी पन्नूने सोडला देश? डेन्मार्कला शिफ्ट झाल्याच्या चर्चांवर अभिनेत्रीचं स्पष्टीकरण
20
Numerology: ५, १४, २३ तारखेला जन्मलेल्या मुलींवर असतो बुधाचा प्रभाव; अत्यंत बुद्धिमान असतो स्वभाव!

मुंबई मराठा समाजाची नाही का? शिवसेना नेते अंबादास दानवे यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 20:08 IST

मराठी बांधवांनीच हुतात्म्य दिल्यामुळे मुंबई आज महाराष्ट्रात आहे.

छत्रपती संभाजीनगर: मुंबईत दाखल आंदोलक मराठा बांधवांचा त्रास होत असल्याच्या तक्रारी मुंबईकर करीत आहेत. मुंबई मराठा समाजाची नाही का असा सवाल विधान परिषदेतील माजी विरोधी पक्षनेते तथा उद्धवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी सोमवारी येथे पत्रकारांशी बोलताना केला. मराठी बांधवांनीच हुतात्म्य दिल्यामुळे मुंबई आज महाराष्ट्रात आहे. आंदोलकांचा त्रास होत असेल तर मराठा समाजाच्या मागण्या मान्य करण्यासाठी सरकारवर मुंबईकरांनी दबाव आणावा, असेही त्यांनी सांगितले.

उद्धवसेनेचे नेते दानवे म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलन करण्याची माहिती चार महिने आधीच सरकारला दिली होती. मात्र सरकारने खबरदारी घेणे आवश्यक होते. या आंदोलनामुळे मुंबईतील व्यवस्थेवर ताण पडला असू शकतो. मात्र यास सरकारच जबाबदार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्यावर पाण्याची बाटली फेकण्याच्या घटनेकडे लक्ष वेधले असता दानवे म्हणाले की, आंदोलनस्थळी भेट देण्यासाठी नेते जात असतात तेव्हा आंदोलकांनी सयंमाने व्यवस्थित वागावे ,असे आपले मत आहे. 

ओबीसी महासंघ एरव्ही झोपलेलामराठा आरक्षणाबाबत भूमिका जाहिर करा,असे सत्ताधारी म्हणत असतात, याविषयी विचारले असता दानवे म्हणाले की, तुमच्याकडे बहुमत असताना चार, सहा खासदार , १०आमदार असलेल्या शरद पवार यांचे मत कशाला हवं असा सवाल त्यांनी केला. राज्यसरकार केवळ राज्यात द्वेष आणि अशांतता निर्माण करीत असल्याचा थेट आरोपही दानवे यांनी केला. जरांगे यांच्या आंदोलनविरोधात ओबीसी महासंघाची आज पुण्यात बैठक झाली याकडे लक्ष वेधले असता दानवे म्हणाले की, जरांगे यांनी आंदोलन सुरू केले तरच यांना जाग येते. एरव्ही ते लोक झोपलेले असतात.

मराठा समाजाला न्याय द्यावामनोज जरांगे यांनी मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करण्याची केलेली मागणी योग्यच आहे. विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाज कुणबीच आहे. सरकारने जरांगे यांची मागणी मान्य करून मराठा समाजाला न्याय द्यावा,असेही दानवे यांनी नमूद केले.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरAmbadas Danweyअंबादास दानवेMaratha Reservationमराठा आरक्षण