शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

डाॅक्टर, १० दिवस झाले तरी खोकला जाईना; तापमानात चढ-उताराने बालकांना आजारांचा विळखा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2023 19:37 IST

विशेषत: रोगप्रतिकारशक्ती कमी असलेली लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला यांना या वातावरणाचा त्रास जाणवत आहे.

औरंगाबाद : सकाळी आणि रात्री थंडी, दुपारी ऊन... कधी तापमान वाढते, तर कधी घसरते, असा अनुभव गेल्या काही दिवसांपासून येत आहे. वातावरणातील अशा बदलाने बालकांना सर्दी, खोकल्याचा विळखा पडत आहे. बाह्य रुग्ण विभागात येणाऱ्या १० पैकी ८ बालके सर्दी, खोकल्याची असल्याचे निरीक्षण बालरोगतज्ज्ञांनी नोंदविले आहे. यातही सर्दी, खोकला आला की साधारण चार ते पाच दिवसांत कमी होतो, असाच आजवरचा अनुभव आहे. मात्र, १० दिवस झाले, १५ दिवस झाले तरी चिमुकल्याचा खोकला काही जात नाही, अशा तक्रारी पालकांकडून वाढत आहेत.

बदलत्या वातावरणामुळे तापमान कमी-अधिक होत आहे. दुपारी ऊन, तर सकाळी आणि सायंकाळी गारवा जाणवतो. अशा परिस्थितीत आजार बळावत आहेत. विशेषत: रोगप्रतिकारशक्ती कमी असलेली लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला यांना या वातावरणाचा त्रास जाणवत आहे. शासकीय रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांत ओपीडीमध्ये सर्दी, खोकला आणि तापाच्या आजारांच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे. बालकांमध्ये न्यूमोनियाची कोणतीही लक्षणे दिसल्यास गांभीर्याने घेतले पाहिजे. बालकाचे आजारपण अंगावर काढता कामा नये, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला.

सर्वसाधारण खोकला चार दिवसांत बरासर्वसाधारण सर्दी, खोकला हा तीन ते चार दिवसांत बरा होतो. जास्त दिवस खोकला राहत असेल तर त्याची वेगवेगळी कारणे असतात. न्यूमोनिया, ॲलर्जी, बालदमा अशा परिस्थितीत अधिक दिवस खोकला राहतो.- डाॅ. प्रभा खैरे, बालरोग विभागप्रमुख, घाटी

सर्दी, खोकल्याचे अधिक बालरुग्णसध्या सर्दी, खोकल्याने त्रस्त बालरुग्णांची संख्या अधिक आहे. बाह्यरुग्ण विभागात येणाऱ्या दहापैकी आठ बालके ही सर्दी, खोकल्याची आहेत. ताप, सर्दी चार ते पाच दिवसांत बरी होते. परंतु, खोकला जात नसल्याचे सध्या दिसत आहे.- डाॅ. अभय जैन, बालरोगतज्ज्ञ

टॅग्स :Healthआरोग्यAurangabadऔरंगाबाद