शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

डाॅक्टर, १० दिवस झाले तरी खोकला जाईना; तापमानात चढ-उताराने बालकांना आजारांचा विळखा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2023 19:37 IST

विशेषत: रोगप्रतिकारशक्ती कमी असलेली लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला यांना या वातावरणाचा त्रास जाणवत आहे.

औरंगाबाद : सकाळी आणि रात्री थंडी, दुपारी ऊन... कधी तापमान वाढते, तर कधी घसरते, असा अनुभव गेल्या काही दिवसांपासून येत आहे. वातावरणातील अशा बदलाने बालकांना सर्दी, खोकल्याचा विळखा पडत आहे. बाह्य रुग्ण विभागात येणाऱ्या १० पैकी ८ बालके सर्दी, खोकल्याची असल्याचे निरीक्षण बालरोगतज्ज्ञांनी नोंदविले आहे. यातही सर्दी, खोकला आला की साधारण चार ते पाच दिवसांत कमी होतो, असाच आजवरचा अनुभव आहे. मात्र, १० दिवस झाले, १५ दिवस झाले तरी चिमुकल्याचा खोकला काही जात नाही, अशा तक्रारी पालकांकडून वाढत आहेत.

बदलत्या वातावरणामुळे तापमान कमी-अधिक होत आहे. दुपारी ऊन, तर सकाळी आणि सायंकाळी गारवा जाणवतो. अशा परिस्थितीत आजार बळावत आहेत. विशेषत: रोगप्रतिकारशक्ती कमी असलेली लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला यांना या वातावरणाचा त्रास जाणवत आहे. शासकीय रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांत ओपीडीमध्ये सर्दी, खोकला आणि तापाच्या आजारांच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे. बालकांमध्ये न्यूमोनियाची कोणतीही लक्षणे दिसल्यास गांभीर्याने घेतले पाहिजे. बालकाचे आजारपण अंगावर काढता कामा नये, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला.

सर्वसाधारण खोकला चार दिवसांत बरासर्वसाधारण सर्दी, खोकला हा तीन ते चार दिवसांत बरा होतो. जास्त दिवस खोकला राहत असेल तर त्याची वेगवेगळी कारणे असतात. न्यूमोनिया, ॲलर्जी, बालदमा अशा परिस्थितीत अधिक दिवस खोकला राहतो.- डाॅ. प्रभा खैरे, बालरोग विभागप्रमुख, घाटी

सर्दी, खोकल्याचे अधिक बालरुग्णसध्या सर्दी, खोकल्याने त्रस्त बालरुग्णांची संख्या अधिक आहे. बाह्यरुग्ण विभागात येणाऱ्या दहापैकी आठ बालके ही सर्दी, खोकल्याची आहेत. ताप, सर्दी चार ते पाच दिवसांत बरी होते. परंतु, खोकला जात नसल्याचे सध्या दिसत आहे.- डाॅ. अभय जैन, बालरोगतज्ज्ञ

टॅग्स :Healthआरोग्यAurangabadऔरंगाबाद