शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

अनुदानाच्या प्रतीक्षेतच गेली अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी; खरीप हंगाम हातचा गेल्याने निराशा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 19:34 IST

अनुदानाच्या प्रतीक्षेतच गेली ८२ हजार शेतकऱ्यांची दिवाळी, सिल्लोड तालुक्यातील स्थिती;

- श्यामकुमार पुरेसिल्लोड : सप्टेंबर महिन्यात झालेल्या ढगफुटी व अतिवृष्टीमुळे सिल्लोड तालुक्यातील ८२ हजार २३५ शेतकऱ्यांच्या १ लाख हेक्टर पेरणीयोग्य क्षेत्रापैकी ८१ हजार २४ हेक्टरवरील मका, कापूस, सोयाबीन पिकांचे नुकसान झाल्यानंतर तहसील प्रशासनाने ६९ कोटी २५ लाख ४२ हजार २५० रुपयांच्या मदत निधीची मागणी राज्य शासनाकडे करूनही अद्याप एक छदामही शेतकऱ्यांना मिळालेला नाही. मदती निधीची प्रतीक्षा करून दिवाळी सरली तरीही पैसे मिळत नसल्याने राज्य शासनाच्या भूमिकेविषयी शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीत शेतकऱ्यांच्या ८० टक्के पिकांचे नुकसान झाले होते. उर्वरित २० टक्के पिके हाती येतील, या आशेवर बसलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा पावसाने दगा दिला. २१ ऑक्टोबर रोजी दिवाळीच्या पूर्व संध्येला पुन्हा पावसाने हजेरी लावली. त्यानंतर सलग ८ दिवसांत उरले सुरले २० टक्के पीकही पाण्यात बुडाले. २९ ऑक्टोबर रोजी पुन्हा आमठाणा, तळणी, शिंदेफळ सर्कलमध्ये ढगफुटी झाली, म्हणजे शेतकऱ्यांची संपूर्ण १०० टक्के पिके ही नष्ट झाली आहेत. हेक्टरी शेतकऱ्यांचे जवळपास एक लाखांचे नुकसान झाले आहे; मात्र शासनाने हेक्टरी केवळ १० हजार रुपये मदत देण्याचे आश्वासन दिले होते; परंतु या आश्वासनाचाही शासनाला विसर पडल्याचे दिसत आहे. दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई देऊ अशी घोषणा केली होती; मात्र अजून एकही शेतकऱ्याच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली नाही.

लवकरच मदत मिळेलसिल्लोड तालुक्यात झालेल्या पीक नुकसानीच्या निधीची मागणी शासनाकडे केली आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर नुकसानभरपाई जमा केली जाणार आहे.- सतीश सोनी, तहसीलदार सिल्लोड.

जीव गेल्यावर मदत देणार का...?अतिवृष्टीत पिके वाहून गेली, घरांची पडझड झाली, दिवाळीत आम्हाला दिवा पेटवता आला नाही. डोक्यावर कर्जाचे डोंगर आहे. आता आम्ही शासनाकडून मिळणाऱ्या तोकड्या मदतीत घर चालवायचे की कर्जाची परत फेड करायची...?- ज्ञानेश्वर गुंजाळ, शेतकरी, पिंपळगाव पेठ.

कधी मिळणार नुकसानभरपाईमाय बाप शासन नुकसानभरपाई कधी देणार? दिवाळी संपून आठ दिवस झाले, अजून आम्हाला दमडी मिळाली नाही. घोषणा हेक्टरी १८ हजारांची; मात्र प्रत्यक्षात १० हजार देण्याचा जीआर शासनाने काढला आहे, ही तर शेतकऱ्यांची थट्टा आहे.- पंकज आमटे, शेतकरी, देऊळगाव बाजार

English
हिंदी सारांश
Web Title : Rain-hit farmers' Diwali bleak, await aid for lost crops.

Web Summary : Sillod farmers await promised aid after September's heavy rains destroyed crops. Despite assurances, no funds have arrived, leaving them in distress.
टॅग्स :Rainपाऊसchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी