शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

 दुष्काळी स्थितीवर जिल्हा परिषद सादर करणार ‘ग्राऊंड रिपोर्ट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 19:22 IST

उपायोजनासनबंधीचा ‘ग्राऊंड रिपोर्ट’ स्वतंत्रपणे शासनाला सादर करण्यात येणार असून हा जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करण्यात यावा, अशी मागणी करण्यात येणार आहे. 

ठळक मुद्देयासंदर्भात जि.प. अध्यक्षा डोणगावकर यांनी सांगितले की, जिल्ह्यातील परिस्थिती अतिशय गंभीर आहे. जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करण्यात यावा, या आशयाचा ग्राऊंड रिपोर्ट शासनाला सादर करण्यात येणार आहे. 

औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्ह्यातील दुष्काळ सदृष्य स्थितीचे वास्तवचित्र अर्थात तातडिने कराव्या लागणाऱ्या उपायोजनासनबंधीचा ‘ग्राऊंड रिपोर्ट’ स्वतंत्रपणे शासनाला सादर करण्यात येणार असून हा जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करण्यात यावा, अशी मागणी करण्यात येणार आहे. 

मागील दहा दिवसांपासून जि.प. अध्यक्षा देवयानी पाटील डोणगावकर यांनी सर्व तालुक्यांतील कमी पर्जमान असलेल्या गावांना भेटी दिल्या. तेथील पिक परिस्थिती, वाडी- तांड्यावरील पिण्याच्या पाण्याची टंचाई आदींची पाहणी करुन शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. त्यानंतर शासनामार्फत जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यात आली. त्यानंतर पुढील आठवड्यात जिल्हा परिषदेचे अधिकारी- पदाधिकारी पुन्हा एकदा जिल्ह्यातील परिस्थितीची पाहणी करणार आहेत. 

यासंदर्भात जि.प. अध्यक्षा डोणगावकर यांनी सांगितले की, जिल्ह्यातील परिस्थिती अतिशय गंभीर आहे. गंगापूर, खुलताबाद, कन्नड, पैठण, सिल्लोड तालुक्यांमध्ये यंदा अत्यंत कमी पाऊस झाला. तब्बल ५० ते ६० दिवसांचा पावसाचा खंड आहे.  १६ आॅगस्टपासून तर जिल्ह्यात पाऊसच झालेला नाही. त्यामुळे जलसाठे कोरडे पडले आहेत. भूजल पातळी खोल गेली आहे. हातातोंडाला आलेली खरीपाची पिके वाया गेली आहेत. मक्याच्या कणसात दाणा भरण्याच्या काळातच पावसाचा मोठा खंड पडल्यामुळे कणसात दाणे भरलेच नाहीत. कपासी, मका, सोयाबीन, बाजरी आदी खरीपाची सर्वच पिके वाया गेली आहेत. अनेक गावांमध्ये पाणी टंचाई जाणवत आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचे सर्व साठे आरक्षित करुन खाजगी पाणी उपस्यावर निर्बंध घालणे गरजेचे आहे. लघू व मध्यम प्रकल्पांच्या संपादीत क्षेत्रातील खाजगी विहिरी अधिगृहित करण्यात याव्यात, कुपनलिका, विंधन विहिरी खोलवर घेण्यास बंदी घालण्यात यावी. एकंदरीत जिल्ह्याची परिस्थिती लक्षात घेता हा जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करण्यात यावा, या आशयाचा ग्राऊंड रिपोर्ट शासनाला सादर करण्यात येणार आहे. 

चारा छावण्यासाठी परवानगी द्यावीयासंदर्भात जि.प. अध्यक्षा देवयानी पाटील डोणगावकर यांनी सांगितले की, चार दिवसांपूर्वी परिवहन मंत्री दिवाकर रावते हे शासनाच्या वतीने जिल्ह्यात पाहणी दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनाही जिल्ह्यातील विद्यमान परिस्थितीबाबत अहवाल सादर करण्यात आला आहे. जिल्ह्यातील चारा व पाण्याची टंचाई लक्षात घेता जिल्हा परिषदेमार्फत चारा छावण्या सुरू करण्यासाठी शासनाने परवानगी द्यावी व त्यासाठी आवश्यक तो निधी द्यावा, या आशची मागणीही करण्यात आली आहे. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदdroughtदुष्काळ