शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
2
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
3
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
4
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
5
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
6
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
7
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
8
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
9
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
10
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
11
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
12
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
13
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
14
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
15
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
16
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
17
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला
18
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
19
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
20
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर

खासदार जलील यांच्या अभिनंदन प्रस्तावावरून महापालिकेच्या सभेत गोंधळ; एमआयएमचे ५ नगरसेवक निलंबित 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 12:45 IST

सिद्धार्थ उद्यानातील चार बछद्यांच्या नामकरण सोहळा प्रकरणावरून एमआयएम नगसेवक आक्रमक होती

औरंगाबाद : खासदार इम्तियाज जलील यांच्या अभिनंदन प्रस्तावाकडे महापौरांनी दुर्लक्ष केल्याने एमआयएमच्या नगरसेवकांनी आज महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गदारोळ घातला. यावेळी राजदंड पळविण्याच्या प्रयत्न झाला, गदारोळ वाढत गेल्याने महापौरांनी एमआयएमची सहा नगरसेवकांचे सदस्यत्व एका दिवसासाठी रद्द केले. 

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महापालिकेत पहिलीच सभा होत आहे.महापालिकेतील सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी, उपायुक्तांना शासनाकडे परत पाठविणे, सव्वाशे कोटी रस्त्यांच्या यादीचा वाद, शहराचा पाणी प्रश्न आणि बछड्यांच्या नामकरण सोहळ्यात एमआयएम खासदारांना डावलल्यावरून आज होणारी महापालिकेची सर्वसाधारण सभा वादग्रस्त होण्याची चिन्हे होती. 

सिद्धार्थ उद्यानातील चार बछद्यांच्या नामकरण सोहळा मागच्या आठवड्यात पार पडला. याच्या निमंत्रण पत्रिकेवर खासदार इम्प्तीयाज जलील यांचे नाव नव्हते. यावरून एमआयएम नगरसेवक महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आक्रमक होती. सभा सुरु होताच भाजप नगरसेवकांनी शहरातील पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. तर एमआयएम नगसेवकांनी खा. जलील यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. महापौरांनी अभिनंदन प्रस्तावाकडे दुर्लक्ष केले. यामुळे एमआयएम नगरसेवक आक्रमक झाली, त्यांनी महापौरांच्या समोरील जागेत धाव घेतली. यातच यातच भाजप नगरसेवकांनी पाणी प्रश्नावर घोषणाबाजी सुरु केली. यामुळे दोन्ही पक्षाची नगरसवेक समोरासमोर आली. 

गोंधळ वाढत जात असतानाच एमआयएम नगरसेवकांनी राजदंड पळविण्याच्या प्रयत्न केला. यावरून महापौरांनी एमआयएमच्या सहा नगरसेवकांचे सदस्यत्व एका दिवसासाठी रद्द केले. यानंतर सभा तहकूब करण्यात आली आहे.मात्र एमआयएम नगरसेवक अभिनंदन प्रस्तावावरून सभागृहात बसून आहेत. विशेष म्हणजे या गोंधळात शिवसेना नगरसेवक कुठेच नव्हते. शिवसेनेचे महापौर यावेळी एकाकी पडल्याचे चित्र होते. 

सर्वसाधारण सभेत हे मुद्दे पण आहेत चर्चेत अधिकाऱ्यांच्या मुद्यांवरून सभेत वादग्रस्त चर्चा होण्याची शक्यता आहे. सेवानिवृत्त उपायुक्त अय्युबखान आणि लेखाधिकारी एन.जी. दुर्राणी यांच्या विभागीय चौकशीच्या प्रस्तावावरून वादळी चर्चा होणे शक्य आहे, तर वर्षभरापूर्वी शासनाकडून प्रतिनियुक्तीने उपायुक्तपदी आलेल्या मंजूषा मुथा यांच्याविषयी पदाधिकारी व नगरसेवकांमध्ये नाराजी वाढली असून, त्यांना पुन्हा शासनाकडे पाठविण्याची मागणी सभेत नगरसेवकांकडून होण्याची शक्यता आहे. उपायुक्त मुथा या कोणत्याही संचिकेवर निर्णय घेत नाहीत, अशा नगरसेवकांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे सर्वसाधारण सभेत त्यांना परत पाठविण्याचा प्रस्ताव नगरसेवकांकडून मांडला जाईल, असे सूत्रांनी सांगितले.  दोन महिन्यांपासून शहरात पाणी प्रश्न पेटलेला आहे. शहराला तीन दिवसांआड समान पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन मनपाने दिले. ते आश्वासन हवेत विरले आहे. पालिका नियमित पाणीपुरवठा करण्यात असक्षम ठरते आहे. त्यामुळे सभेत नगरसेवक पाणी प्रश्नावरून आक्रमक झाली. 

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनBJPभाजपा