शहरं
Join us  
Trending Stories
1
हाँगकाँगमध्ये UAE चे कार्गो प्लेन रनवेवरून समुद्रात घसरले; विमानातील कर्मचारी वाचले, पण दोन ग्राउंड स्टाफचा मृत्यू
2
दिवाळी सुरु नाही झाली तोच दिल्लीची हवा अतिविषारी बनली; आनंद विहारमध्ये गुणवत्ता ४१७ वर...
3
ट्रम्पविरोधात अमेरिकन पेटून उठले, ‘नो किंग्ज’ म्हणत रस्त्यावर उतरले! सरकारी हुकुमशाहीचा विरोध
4
आजचे राशीभविष्य : सोमवार २० ऑक्टोबर २०२५; आजचा दिवस व्यापार-व्यवसायासाठी लाभदायी, जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठीही अनुकूल
5
महाराष्ट्राला केंद्राकडून १,५६६ कोटी मदत; अमित शाह यांची घोषणा, CM फडणवीसांनी मानले आभार
6
परकीयांनी आधी विध्वंस करून लुटले, तर नंतर आलेल्यांनी बुद्धीला लुटले: सरसंघचालक मोहन भागवत
7
राज्यात ९६ लाख खोटे मतदार; राज ठाकरेंचा आरोप, निवडणुका शांततेत हव्या तर मतदार याद्या स्वच्छ करा
8
नितीशकुमारच एनडीएचे सर्वसहमतीचे नेते असतील; अमित शाह यांच्या वक्तव्यानंतर जदयूचा दावा
9
काय सांगता! १८६ कार खरेदी, तब्बल २१ कोटींचा डिस्काऊंट दिला; ऑडी, BMW, मर्सिडिज घेतल्या
10
झामुमोने दिला ‘एकला चलो’चा नारा; महाआघाडी आता फुटीच्या उंबरठ्यावर, जागावाटपावरून मतभेद
11
बिहार निवडणूक २०२५: निवडणूक आयोगाची ‘आर्थिक गुप्तचर समिती’ ६ वर्षांनी पुन्हा सक्रिय
12
आरोपीच्या वकिलाने ५०० पानी अर्ज केला, न्यायालयाने जामीन फेटाळला; नेमके प्रकरण काय?
13
चांदी स्थिरावणार, सोने भाव खाणार; चांदीचा प्रीमियम उतरला २५ हजारांवरून शून्यावर
14
पॅरिसच्या लूव्र म्युझियममध्ये ४ मिनिटांत नेपोलियन तिसरा याच्या ९ मौल्यवान वस्तू लांबवल्या
15
पाकिस्तान-अफगाण शस्त्रसंधीसाठी राजी; संघर्ष थांबणार, दोहा येथे वाटाघाटी
16
सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला
17
India Still Qualify For Semifinals : टीम इंडियासाठी कसं आहे सेमीचं समीकरण? जाणून घ्या सविस्तर
18
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
19
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल

खासदार जलील यांच्या अभिनंदन प्रस्तावावरून महापालिकेच्या सभेत गोंधळ; एमआयएमचे ५ नगरसेवक निलंबित 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 12:45 IST

सिद्धार्थ उद्यानातील चार बछद्यांच्या नामकरण सोहळा प्रकरणावरून एमआयएम नगसेवक आक्रमक होती

औरंगाबाद : खासदार इम्तियाज जलील यांच्या अभिनंदन प्रस्तावाकडे महापौरांनी दुर्लक्ष केल्याने एमआयएमच्या नगरसेवकांनी आज महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गदारोळ घातला. यावेळी राजदंड पळविण्याच्या प्रयत्न झाला, गदारोळ वाढत गेल्याने महापौरांनी एमआयएमची सहा नगरसेवकांचे सदस्यत्व एका दिवसासाठी रद्द केले. 

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महापालिकेत पहिलीच सभा होत आहे.महापालिकेतील सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी, उपायुक्तांना शासनाकडे परत पाठविणे, सव्वाशे कोटी रस्त्यांच्या यादीचा वाद, शहराचा पाणी प्रश्न आणि बछड्यांच्या नामकरण सोहळ्यात एमआयएम खासदारांना डावलल्यावरून आज होणारी महापालिकेची सर्वसाधारण सभा वादग्रस्त होण्याची चिन्हे होती. 

सिद्धार्थ उद्यानातील चार बछद्यांच्या नामकरण सोहळा मागच्या आठवड्यात पार पडला. याच्या निमंत्रण पत्रिकेवर खासदार इम्प्तीयाज जलील यांचे नाव नव्हते. यावरून एमआयएम नगरसेवक महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आक्रमक होती. सभा सुरु होताच भाजप नगरसेवकांनी शहरातील पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. तर एमआयएम नगसेवकांनी खा. जलील यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. महापौरांनी अभिनंदन प्रस्तावाकडे दुर्लक्ष केले. यामुळे एमआयएम नगरसेवक आक्रमक झाली, त्यांनी महापौरांच्या समोरील जागेत धाव घेतली. यातच यातच भाजप नगरसेवकांनी पाणी प्रश्नावर घोषणाबाजी सुरु केली. यामुळे दोन्ही पक्षाची नगरसवेक समोरासमोर आली. 

गोंधळ वाढत जात असतानाच एमआयएम नगरसेवकांनी राजदंड पळविण्याच्या प्रयत्न केला. यावरून महापौरांनी एमआयएमच्या सहा नगरसेवकांचे सदस्यत्व एका दिवसासाठी रद्द केले. यानंतर सभा तहकूब करण्यात आली आहे.मात्र एमआयएम नगरसेवक अभिनंदन प्रस्तावावरून सभागृहात बसून आहेत. विशेष म्हणजे या गोंधळात शिवसेना नगरसेवक कुठेच नव्हते. शिवसेनेचे महापौर यावेळी एकाकी पडल्याचे चित्र होते. 

सर्वसाधारण सभेत हे मुद्दे पण आहेत चर्चेत अधिकाऱ्यांच्या मुद्यांवरून सभेत वादग्रस्त चर्चा होण्याची शक्यता आहे. सेवानिवृत्त उपायुक्त अय्युबखान आणि लेखाधिकारी एन.जी. दुर्राणी यांच्या विभागीय चौकशीच्या प्रस्तावावरून वादळी चर्चा होणे शक्य आहे, तर वर्षभरापूर्वी शासनाकडून प्रतिनियुक्तीने उपायुक्तपदी आलेल्या मंजूषा मुथा यांच्याविषयी पदाधिकारी व नगरसेवकांमध्ये नाराजी वाढली असून, त्यांना पुन्हा शासनाकडे पाठविण्याची मागणी सभेत नगरसेवकांकडून होण्याची शक्यता आहे. उपायुक्त मुथा या कोणत्याही संचिकेवर निर्णय घेत नाहीत, अशा नगरसेवकांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे सर्वसाधारण सभेत त्यांना परत पाठविण्याचा प्रस्ताव नगरसेवकांकडून मांडला जाईल, असे सूत्रांनी सांगितले.  दोन महिन्यांपासून शहरात पाणी प्रश्न पेटलेला आहे. शहराला तीन दिवसांआड समान पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन मनपाने दिले. ते आश्वासन हवेत विरले आहे. पालिका नियमित पाणीपुरवठा करण्यात असक्षम ठरते आहे. त्यामुळे सभेत नगरसेवक पाणी प्रश्नावरून आक्रमक झाली. 

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनBJPभाजपा