शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

जिल्हा परिषदेत ‘बांधकाम’ च्या निधीवरून वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 17:52 IST

बांधकाम विभागात कोट्यवधी रुपयांच्या कामांबाबत गोपनीयता बाळगण्यात आली. ८ कोटी रुपयांच्या कामांच्या प्रशासकीय मान्यता काढण्यात आल्या. त्यासंबंधी अध्यक्ष- उपाध्यक्षांना अंधारात ठेवण्यात आले.

औरंगाबाद : बांधकाम विभागात कोट्यवधी रुपयांच्या कामांबाबत गोपनीयता बाळगण्यात आली. ८ कोटी रुपयांच्या कामांच्या प्रशासकीय मान्यता काढण्यात आल्या. त्यासंबंधी अध्यक्ष- उपाध्यक्षांना अंधारात ठेवण्यात आले. जिल्हा परिषदेत या पद्धतीनेच कारभार चालत असेल, तर आम्हाला सत्तेत राहण्याविषयी विचार करावा लागेल, अशी उद्विग्न भावना उपाध्यक्ष केशव तायडे यांनी स्थायी समितीच्या सभागृहात बोलून दाखविली.

जि.प. अध्यक्षा देवयानी पाटील डोणगावकर यांच्या अध्यक्षतेखाली  बुधवारी स्थायी समितीची बैठक झाली. बैठकीत सुरुवातीला मागील सभेच्या अनुपालनावर चर्चा सुरू झाली. ती खंडित करून सदस्य मधुकर वालतुरे यांनी निधीपासून वंचित सदस्यांचा मुद्दा उपस्थित केला. १४ मार्च रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत याच मुद्यावर भाजप सदस्यांनी सभागृहाला धारेवर धरले होते. तेव्हा ३१ मार्चपूर्वी वंचित सदस्यांच्या सर्कलमध्ये कामे देण्याचे लेखी आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाचे काय झाले, त्यावर अगोदर चर्चा व्हावी, असा आग्रह वालतुरे यांनी धरला. तेवढ्यात उपाध्यक्ष तायडे यांनी अध्यक्षांच्या वतीने बोलतो, असे म्हणत बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांवर प्रशासकीय मान्यता न दाखवल्याचा आरोप करीत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी लावून धरली. 

अध्यक्षा डोणगावकर यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले की, सहा सदस्यांच्या सर्कलमध्ये एक रुपयाचेही काम मिळालेले नव्हते, त्यांना कामांसाठी निधी देण्याचे आम्ही आश्वासन दिले होते. त्यापैकी ४ सदस्यांना सिंचनाची, तर २ सदस्यांना बांधकाम विभागातील कामे दिलेली आहेत. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सिरसे म्हणाले की, निधीच्या नियोजनाबाबत जेव्हा प्रस्ताव आमच्यासमोर येतो तेव्हा प्रस्तावामध्ये सदस्यांच्या नावांचा उल्लेख नसतो.  उपकरातील निधीच्या खर्चाबाबत शासनाच्या कोणत्याही मार्गदर्शक सूचना नाहीत. नियोजनाचा अधिकार बांधकाम विषय समितीला आहे.

कार्यकारी अभियंत्याला घेरलेयाच मुद्यावर सदस्य अविनाश गलांडे, किशोर बलांडे, मधुकर वालतुरे, केशव तायडे आदींनी बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यावर प्रश्नांची सरबती करीत घेरले.विषय समितीचे तुम्ही पदसिद्ध सचिव आहात. मत मांडण्याचा तुम्हाला अधिकार आहे. चुकीच्या नियोजनाबाबत तुम्ही विषय समितीमध्ये बोलले पाहिजे. तेव्हा कार्यकारी अभियंत्यांनी यापुढे बोलण्याची ग्वाही सभागृहाला दिली.

टॅग्स :zpजिल्हा परिषदAurangabadऔरंगाबादMONEYपैसा