शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
2
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
3
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
4
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
5
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
6
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
7
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल
8
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
9
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
10
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
11
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
12
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
13
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
14
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
१२ अफेयर, २ वर्षात झाला घटस्फोट, आता या अभिनेत्रीला थाटायचाय दुसरा संसार
16
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
17
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
18
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
19
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
20
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक

जायकवाडी धरणातून १९ दिवसांत ४६ टीएमसी विसर्ग; सलग तिसऱ्या वर्षी सोडले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2021 4:10 PM

Jayakwadi dam : जायकवाडी धरणातून यंदा २९ सप्टेंबर रोजी सकाळी विसर्ग करण्यास प्रारंभ करण्यात आला.

ठळक मुद्देस्थानिक पाणलोटक्षेत्रातील पावसावर धरण भरत असल्याने मराठवाड्यासाठी हा मोठा दिलासासुरवातीच्या काळात १९७५ ते १९८१ असे सलग सात वर्ष धरणातून विसर्ग करण्यात आला

पैठण (औरंगाबाद ) : जायकवाडी धरणातून ( Jayakwadi Dam ) गेल्या १९ दिवसात ४६ टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. १००% जलसाठा झालेल्या धरणात मागील पाच दिवसापासून जेवढी आवक ( From Three Consecutive Year Water released from Jayakwadi Dam ) तेवढा विसर्ग करण्यात येत आहे. रविवारी धरणाच्या दहा दरवाजातून ५२४० क्युसेस विसर्ग सुरू होता. धरणाच्या इतिहासात २००६, २०२० व २०२१ या तीन वर्षात सर्वाधिक पाणी सोडण्यात आले आहे. 

जायकवाडी धरणातून यंदा २९ सप्टेंबर रोजी सकाळी विसर्ग करण्यास प्रारंभ करण्यात आला. आजतागायत विसर्ग सुरू आहे. २००६ ला धरणातून धरण पूर्ण क्षमतेने भरेल एवढे पाणी खाली सोडण्यात आले होते. यानंतर २०२० ला ८० टीएमसी पाणी सोडावे लागले होते. यंदा गेल्या १९ दिवसात १३११ दलघमी ४६ टीएमसी  पाणी सोडण्यात आले आहे अशी माहिती धरण अभियंता विजय काकडे यांनी दिली. नाशिक जिल्ह्यातील धरण समूहावर भिस्त असलेल्या जायकवाडी धरणात २००९ ते १६ दरम्यान सलग आठ वर्ष  अपेक्षित जलसाठा न झाल्याने कपात करून पाणी वापरण्याची वेळ मराठवाड्यावर आली होती. परंतू गेल्या दोन वर्षापासून नाशिक पेक्षा स्थानिक पाणलोटक्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढल्याने याच पावसावर जायकवाडी धरण मोठ्या प्रमाणावर भरल्याचे समोर आले आहे. सलगपणे तीन वर्ष  धरणातून पाणी सोडण्याची धरणाच्या इतिहासातील ही तिसरी वेळ आहे. 

स्थानिक पाणलोटक्षेत्रातील पावसावर धरण भरत असल्याने मराठवाड्यासाठी हा मोठा दिलासा असून जायकवाडी आत्मनिर्भर होत असल्याचे हे संकेत आहेत. धरणाच्या ४६ वर्षाच्या इतिहासात  पाणी सोडण्याचे हे २२ वे वर्ष आहे. जायकवाडी धरणाच्या इतिहासात सुरवातीच्या काळात १९७५ ते १९८१ असे सलग सात वर्ष धरणातून विसर्ग करावा लागला. दुसऱ्यांदा सन २००५ ते २००८ असा सलग चार वर्ष  विसर्ग झाला. यानंतर सन २०१९ ते २०२१ असा सलग तीन वर्ष विसर्ग होत आहे.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणAurangabadऔरंगाबादRainपाऊस