शहरं
Join us  
Trending Stories
1
बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
2
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
3
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
4
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
5
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
6
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
7
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
8
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!
9
पहलगाम हल्ल्यातील मास्टरमाईंडचा खात्मा, एन्काऊंटरचे फोटो समोर, मिळाली धक्कादायक माहिती
10
सेल्फी अन् रीलचा नाद लय बेक्कार! काही सेकंदांचं वेड करतंय जीवाशी खेळ; फुकट जातोय वेळ...
11
नवीन कर प्रणालीतही टॅक्स वाचवता येतो! NPS, EPF पासून ते 'या' खास पर्यायांपर्यंत, बचत करण्याचे ७ प्रभावी मार्ग!
12
ऐकावं ते नवलच! नाव डॉग बाबू, वडील कुत्ता बाबू अन् आई कुटिया देवी; कुत्र्यासाठी बनवले रहिवासी प्रमाणपत्र
13
गुंतवणुकीसाठी बेस्ट आहे 'ही' सरकारी स्कीम; एकदा गुंतवणूक करा आणि दरवर्षी मिळवा २ लाखांचं फिक्स व्याज
14
दक्षिण कोरियाने मैत्रीचा हात पुढे केला, किम जोंग यांची बहिण म्हणाली, "कोणताही रस नाही..."
15
दहशतवादी पहलगाममध्ये घुसलेच कसे? PoK का घेतले नाही? काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल
16
ऑपरेशन सिंदूरदरम्यान नेमकं काय घडलं, किती दहशतवादी मारले गेले? राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिली माहिती, म्हणाले...
17
VIDEO: जाडेजा-स्टोक्समध्ये हात मिळवण्यावरून राडा, सामना संपल्यावर 'शेक-हँड' नाकारलं?
18
Operation Mahadev: सैन्याला मोठे यश! पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी मुसा मारला गेल्याची शक्यता, तीन दहशतवादी ठार
19
‘डान्सबारमध्ये नाचणाऱ्या मुली लाडक्या बहिणी नाहीत का? मुली नाचवणाऱ्यांना वाचवणे कोणत्या हिंदुत्वात बसते?’, काँग्रेसचा सवाल   
20
Thailand Shooting: थायलंडमध्ये भर बाजारात बेछूट गोळीबार, सहा जणांचा मृत्यू, हल्लेखोराने स्वत:वरही झाडली गोळी  

मराठवाड्यासाठी पाणी सोडण्यावरून जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांत मतभेद

By बापू सोळुंके | Updated: October 28, 2023 14:04 IST

हक्काच्या पाण्यासाठी मराठवाड्याला करावी लागत आहे प्रतीक्षा

छत्रपती संभाजीनगर : अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील समूह धरणांतून मराठवाड्याच्या हक्काचे पाणी सोडावे, यासाठी विविध सामाजिक संघटना आंदोलन करीत आहेत. मात्र मराठवाड्यासाठी गोदापात्रात किती पाणी सोडावे, यावरून नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर येथील जलसंपदाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये आकडेवारीवरून मतभेद असल्याने पाणी सोडण्यास विलंब होत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.

मराठवाड्यातील सर्वात मोठ्या जायकवाडी प्रकल्पात केवळ ४६ टक्के जलसाठा आहे. समन्यायी पाणी वाटप तत्त्वानुसात्दि. १५ ऑक्टोबर रोजी मराठवाड्यासाठी जायकवाडी प्रकल्पाच्या उर्ध्वभागातील नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील धरणांमधून दि. ३१ ऑक्टोबरपूर्वी पाणी सोडणे बंधनकारक आहे. गोदावरी पात्रात पाणी सोडण्याचा निर्णय घेण्याचे अधिकार गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळाच्या कार्यकारी संचालकांना आहेत. यामुळे याविषयी तत्काळ निर्णय होेणे अपेक्षित होते. मात्र आजपर्यंत पाणी सोडण्याचे आदेश कार्यकारी संचालकांकडून काढण्यात आले नाही. याविषयी सूत्रांनी सांगितले की, मराठवाड्यासाठी किती पाणी सोडावे यावरून जलसंपदा विभागाच्या नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरच्या वरिष्ठ अभियंत्यांच्या आकडेवारीमध्ये मोठी तफावत आहे.

अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांतील समूह धरणांतून गाेदापात्रात पाणी सोडल्यापासून जायकवाडी प्रकल्पात पाणी पाेहोचेपर्यंत सुमारे ३० टक्के पाण्याचा लॉस होतो असे गृहित धरण्यात येते. यानुसार जायकवाडी प्रकल्पात साडेनऊ टीएमसी पाणी यावे, यासाठी साडेबारा टीएमसी पाणी नगर आणि नाशिक जिल्ह्यांतील विविध धरणातून गोदावरी नदीपात्रात सोडण्याचे नियोजन करावे, असा प्रस्ताव छत्रपती संभाजीनगरच्या अभियंत्यांनी दिला, तर या प्रकल्पात साडेसात टीएमसी पाणी पोहोचावे, याकरिता ११ टीएमसी पाणी जायकवाडीच्या उर्ध्व भागातील धरणातून सोडावे, असा प्रस्ताव नाशिक विभागातील अभियंत्यांचा असल्याचे सूत्रांनी सांगितले. नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर येथील जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या आकडेवारीवर एकमत होत नसल्याने पाणी सोडण्यास विलंब होत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

पाणी हक्क परिषदेचा सवालमराठवाडा पाणी हक्क परिषदेने आज दि. २७ ऑक्टोबर रोजी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळाचे कार्यकारी संचालकांना निवेदन देऊन आजपर्यंत पाणी सोडण्याचा निर्णय न झाल्याने समन्यायी पाणी वाटप तत्त्वाची अंमलबजावणी कशी होईल? असा सवाल केला. या निवेदनावर जलसंपदाचे निवृत्त कार्यकारी संचालक डॉ. शंकर नागरे, जयसिंह हिरे, डॉ. सजेराव ठोंबरे, नरहरी शिवपुरे आणि मनोहर सरोदे यांची नावे आहेत.

सेामवारी कालवा सल्लागार समितीची बैठकपालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या अध्यक्षतेखाली कालवा सल्लागार समितीची बैठक सोमवारी होत आहे. या बैठकीत जायकवाडी प्रकल्पात पाणी सोडण्यासंदर्भात निर्णय होण्याची अपेक्षा आहे.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणAurangabadऔरंगाबादNashikनाशिकRainपाऊसMarathwadaमराठवाडा