शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

मराठवाड्यासाठी पाणी सोडण्यावरून जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांत मतभेद

By बापू सोळुंके | Updated: October 28, 2023 14:04 IST

हक्काच्या पाण्यासाठी मराठवाड्याला करावी लागत आहे प्रतीक्षा

छत्रपती संभाजीनगर : अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील समूह धरणांतून मराठवाड्याच्या हक्काचे पाणी सोडावे, यासाठी विविध सामाजिक संघटना आंदोलन करीत आहेत. मात्र मराठवाड्यासाठी गोदापात्रात किती पाणी सोडावे, यावरून नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर येथील जलसंपदाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये आकडेवारीवरून मतभेद असल्याने पाणी सोडण्यास विलंब होत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.

मराठवाड्यातील सर्वात मोठ्या जायकवाडी प्रकल्पात केवळ ४६ टक्के जलसाठा आहे. समन्यायी पाणी वाटप तत्त्वानुसात्दि. १५ ऑक्टोबर रोजी मराठवाड्यासाठी जायकवाडी प्रकल्पाच्या उर्ध्वभागातील नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील धरणांमधून दि. ३१ ऑक्टोबरपूर्वी पाणी सोडणे बंधनकारक आहे. गोदावरी पात्रात पाणी सोडण्याचा निर्णय घेण्याचे अधिकार गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळाच्या कार्यकारी संचालकांना आहेत. यामुळे याविषयी तत्काळ निर्णय होेणे अपेक्षित होते. मात्र आजपर्यंत पाणी सोडण्याचे आदेश कार्यकारी संचालकांकडून काढण्यात आले नाही. याविषयी सूत्रांनी सांगितले की, मराठवाड्यासाठी किती पाणी सोडावे यावरून जलसंपदा विभागाच्या नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरच्या वरिष्ठ अभियंत्यांच्या आकडेवारीमध्ये मोठी तफावत आहे.

अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांतील समूह धरणांतून गाेदापात्रात पाणी सोडल्यापासून जायकवाडी प्रकल्पात पाणी पाेहोचेपर्यंत सुमारे ३० टक्के पाण्याचा लॉस होतो असे गृहित धरण्यात येते. यानुसार जायकवाडी प्रकल्पात साडेनऊ टीएमसी पाणी यावे, यासाठी साडेबारा टीएमसी पाणी नगर आणि नाशिक जिल्ह्यांतील विविध धरणातून गोदावरी नदीपात्रात सोडण्याचे नियोजन करावे, असा प्रस्ताव छत्रपती संभाजीनगरच्या अभियंत्यांनी दिला, तर या प्रकल्पात साडेसात टीएमसी पाणी पोहोचावे, याकरिता ११ टीएमसी पाणी जायकवाडीच्या उर्ध्व भागातील धरणातून सोडावे, असा प्रस्ताव नाशिक विभागातील अभियंत्यांचा असल्याचे सूत्रांनी सांगितले. नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर येथील जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या आकडेवारीवर एकमत होत नसल्याने पाणी सोडण्यास विलंब होत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

पाणी हक्क परिषदेचा सवालमराठवाडा पाणी हक्क परिषदेने आज दि. २७ ऑक्टोबर रोजी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळाचे कार्यकारी संचालकांना निवेदन देऊन आजपर्यंत पाणी सोडण्याचा निर्णय न झाल्याने समन्यायी पाणी वाटप तत्त्वाची अंमलबजावणी कशी होईल? असा सवाल केला. या निवेदनावर जलसंपदाचे निवृत्त कार्यकारी संचालक डॉ. शंकर नागरे, जयसिंह हिरे, डॉ. सजेराव ठोंबरे, नरहरी शिवपुरे आणि मनोहर सरोदे यांची नावे आहेत.

सेामवारी कालवा सल्लागार समितीची बैठकपालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या अध्यक्षतेखाली कालवा सल्लागार समितीची बैठक सोमवारी होत आहे. या बैठकीत जायकवाडी प्रकल्पात पाणी सोडण्यासंदर्भात निर्णय होण्याची अपेक्षा आहे.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणAurangabadऔरंगाबादNashikनाशिकRainपाऊसMarathwadaमराठवाडा