शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
2
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
3
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
4
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
5
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
6
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
7
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
8
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
9
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
10
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
11
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
12
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
13
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
14
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
15
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
16
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
17
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
18
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
19
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
20
संजय शिरसाटांचा उपमुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप; अजित पवारांनी एका वाक्यात उत्तर दिले...

Video: धुळवडीच्या रंगाचा झाला बेरंग; ट्रक-टेम्पोच्या भीषण अपघातात तीन ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2022 06:54 IST

शिर्डी येथून दर्शन घेऊन परत येत असताना झाला अपघात, मृतांमध्ये दोन अभियंत्याचा समावेश

गंगापूर ( औरंगाबाद): गंगापूर-वैजापूर मार्गावर शहरापासून आठ किमी अंतरावर शुक्रवारी (१८) रोजी रात्री उसाचा ट्रक व टेम्पोचा अपघात होऊन तीन तरुण ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. रोहित अरविंद सुरवसे, आकाश क्षिरसागर दोघे सोलापूर,गणेश पप्पू शिरसाठ रा.आष्टी,बीड असे अपघातात ठार झालेल्या तरुणांची नाव आहे.

जालना मार्गावरील करमाड येथे रेल्वे बोगद्याचे काम चालू असून होळी निमित्ताने सुट्टी असल्याने येथील कामावरील चौघेजण कंपनीचा टेम्पो ( एम.एच.१३ सी.यु.१५०० ) घेऊन शिर्डी येथे गेले होते; दर्शन करुन परत येत असतांना गंगापूर वैजापूर मार्गावर  रात्री दहाच्या सुमारास वैजापूरकडे जाणार्या ऊसाचा ट्रक (एम.एच.१८ ए.ए.२७३७ ) व टेम्पोचा समोररासमोर भीषण अपघात झाला; यात टेम्पोतील गंभीर जखमी चौघांना येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तिघांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले तर जखमी शिवशंकर सांघवी रा. चाकूर यास प्राथमिक उपचारानंतर औरंगाबाद घाटी येथे पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले.

 मृत तिघांपैकी गणेश आणि आकाश अभियंते असून रोहित व शिवशंकर हे साईड सुपरवायझर म्हणून काम करत होते. ट्रक चालक घटना स्थळावरून फरार झाला होता; अपघात एवढा भीषण होता की टेम्पोचा पुढचा भाग पूर्ण चेपला असून उसाचा ट्रक पलटी झाला होता यावेळी रस्त्यावर ऊस पसरल्याने या मार्गावरील दोन्हीकडील वाहतूक एक तास खोळंबळी होती. अधिक तपास गंगापूर पोलीस करीत आहे.

शहरात जाऊन येतो म्हणून सांगितले होते.

होळी निमित्ताने कंपनीचे काम बंद होते त्यामुळे हे चौघेजन औरंगाबाद शहरातून जाऊन येतो असे कंपनीत  सांगून कंपनीची गाडी घेऊन गेले होते; मात्र शहरात न जाता त्यांनी थेट शिर्डी गाठली परत येतांनी काळाने त्यांच्यावर घाला घातला.

दुसरा अपघात कार पुलाच्या खाली पलटी

या मार्गावर वाहतूक खोळंबळी असल्याने वैजापूरहुन नगरकडे जाणारी कार एम.एच.१४ जी.एस.२८१३ समोर उभ्या ट्रकला धडकली मात्र यात कोणतीही जीवितहानी झाली नाही यामुळे पुन्हा वाहतुकिला अडथळा येऊ नये म्हणून जेसीबीच्या सहाय्याने सदरील कार बाजूला घेत असतांना रस्त्याच्या कडेला पुलाच्या खाली पलटी झाली.

पंधरा दिवसांत सहा जनांचा बळी

वैजापूर गंगापूर मार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे; नवीन झालेल्या या चौपदरी मार्गावर रहदारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून गत पंधरा दिवसांत या मार्गावर सहा जणांचा अपघात बळी गेला आहे.

टॅग्स :Deathमृत्यूAurangabadऔरंगाबादAccidentअपघात