शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

Video: धुळवडीच्या रंगाचा झाला बेरंग; ट्रक-टेम्पोच्या भीषण अपघातात तीन ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2022 06:54 IST

शिर्डी येथून दर्शन घेऊन परत येत असताना झाला अपघात, मृतांमध्ये दोन अभियंत्याचा समावेश

गंगापूर ( औरंगाबाद): गंगापूर-वैजापूर मार्गावर शहरापासून आठ किमी अंतरावर शुक्रवारी (१८) रोजी रात्री उसाचा ट्रक व टेम्पोचा अपघात होऊन तीन तरुण ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. रोहित अरविंद सुरवसे, आकाश क्षिरसागर दोघे सोलापूर,गणेश पप्पू शिरसाठ रा.आष्टी,बीड असे अपघातात ठार झालेल्या तरुणांची नाव आहे.

जालना मार्गावरील करमाड येथे रेल्वे बोगद्याचे काम चालू असून होळी निमित्ताने सुट्टी असल्याने येथील कामावरील चौघेजण कंपनीचा टेम्पो ( एम.एच.१३ सी.यु.१५०० ) घेऊन शिर्डी येथे गेले होते; दर्शन करुन परत येत असतांना गंगापूर वैजापूर मार्गावर  रात्री दहाच्या सुमारास वैजापूरकडे जाणार्या ऊसाचा ट्रक (एम.एच.१८ ए.ए.२७३७ ) व टेम्पोचा समोररासमोर भीषण अपघात झाला; यात टेम्पोतील गंभीर जखमी चौघांना येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तिघांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले तर जखमी शिवशंकर सांघवी रा. चाकूर यास प्राथमिक उपचारानंतर औरंगाबाद घाटी येथे पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले.

 मृत तिघांपैकी गणेश आणि आकाश अभियंते असून रोहित व शिवशंकर हे साईड सुपरवायझर म्हणून काम करत होते. ट्रक चालक घटना स्थळावरून फरार झाला होता; अपघात एवढा भीषण होता की टेम्पोचा पुढचा भाग पूर्ण चेपला असून उसाचा ट्रक पलटी झाला होता यावेळी रस्त्यावर ऊस पसरल्याने या मार्गावरील दोन्हीकडील वाहतूक एक तास खोळंबळी होती. अधिक तपास गंगापूर पोलीस करीत आहे.

शहरात जाऊन येतो म्हणून सांगितले होते.

होळी निमित्ताने कंपनीचे काम बंद होते त्यामुळे हे चौघेजन औरंगाबाद शहरातून जाऊन येतो असे कंपनीत  सांगून कंपनीची गाडी घेऊन गेले होते; मात्र शहरात न जाता त्यांनी थेट शिर्डी गाठली परत येतांनी काळाने त्यांच्यावर घाला घातला.

दुसरा अपघात कार पुलाच्या खाली पलटी

या मार्गावर वाहतूक खोळंबळी असल्याने वैजापूरहुन नगरकडे जाणारी कार एम.एच.१४ जी.एस.२८१३ समोर उभ्या ट्रकला धडकली मात्र यात कोणतीही जीवितहानी झाली नाही यामुळे पुन्हा वाहतुकिला अडथळा येऊ नये म्हणून जेसीबीच्या सहाय्याने सदरील कार बाजूला घेत असतांना रस्त्याच्या कडेला पुलाच्या खाली पलटी झाली.

पंधरा दिवसांत सहा जनांचा बळी

वैजापूर गंगापूर मार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे; नवीन झालेल्या या चौपदरी मार्गावर रहदारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून गत पंधरा दिवसांत या मार्गावर सहा जणांचा अपघात बळी गेला आहे.

टॅग्स :Deathमृत्यूAurangabadऔरंगाबादAccidentअपघात