शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

व्हॉटस् अ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून साधला गावचा विकास 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 19:50 IST

सिल्लोड तालुक्यातील केऱ्हाळा येथील ‘आम्ही केऱ्हाळेकर’ या व्हॉटस् ग्रुपने गावाचा सर्वांगीण विकास साधला आहे.

- कैलास पांढरे 

औरंगाबाद : सिल्लोड तालुक्यातील केऱ्हाळा येथील ‘आम्ही केऱ्हाळेकर’ या व्हॉटस् ग्रुपने गावाचा सर्वांगीण विकास साधला आहे. या ग्रुपमुळे गावातील खड्डेमय रस्ते, व त्यावर वाहणारे नालीचे पाणी आदी कामांचे योग्य नियोजन करुन गावातील नागरिकांची मने जिंकली. यानंतर सर्वांनी सहभाग नोंदवून गावात विकास गंगा आणण्याचे काम सुरु केले आहे. सध्या याच विषयाची चर्चा तालुक्यात सुरु आहे.  

केऱ्हाळा गावचे रहिवासी असलेल्यांनी हा ग्रुप तयार केला असून त्याद्वारे गावातील हालचालींचा आढावा घेतला जातो. मनोरंजन म्हणून या ग्रुपचा वापर न करता गावात काय नवीन करता येईल, यावर चर्चा केली जाते. या ग्रुपमध्ये गावातील २१५ सदस्यांचा समावेश आहे. यात आजी-माजी सैनिक, पत्रकार, पुढारी, शिक्षक, व्यापारी, प्रगतशील शेतकरी, शेतमजूर, डॉक्टर यासारखे अनेक मान्यवर आहेत. या ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी अजून अनेक जण ‘प्रतिक्षेत’ आहेत.  

गावात चार वर्षांपासून रस्त्याचे काम रेंगाळले होते. यासाठी कुणी लक्ष देत नसल्याने या ग्रुपमधील सदस्यांनी एकत्र येऊन मदतीचा हात पुढे केला. त्यामुळे चार वर्षांपासून रेंगाळलेल्या या रस्त्याचे काम काही मिनिटातच नियोजन करुन सुरु केले व लगेच पूर्णही करुन टाकले. ग्रुपच्या माध्यमातून चांगले काम झाल्याने गावातील नागरिकांनी या सदस्यांचे आभार मानले.

या रस्त्याचे उद्घाटन केऱ्हाळा येथील ह.भ.प. सुधाकर महाराज पांढरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सूर्यभान बन्सोड, संजय राजपूत, विलास शेळके व आजिनाथ भिंगारे, राहुल सुरडकर, सदस्य सागर पाटील, दत्ता पांढरे, राजीव पांढरे, दत्ता लोखंडे, रमेश गंगावणे, राजू लोखंडे, गजानन कुमावत, मधुकर परचुरे, राजू बोराडे, कृष्णा पांढरे, प्रवीण सुरडकर, सुदाम बन्सोड, कैलास शेळके, भरत दारुंटे, शिवाजी बांबर्डे, राजू कळम, भाऊसाहेब मैंद, आजिनाथ परचुरे, सखाराम मिसाळ, शिवाजी पवार, राम जोशी, श्याम जोशी, दिगंबर बोराडे, अवचित शेंडे, महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.

‘स्मार्ट व्हिलेज’चा मानससोशल मिडियाचा मनोरंजन, गप्पाटप्पासाठी वापर न करता सकारात्मक, विकासात्मक कामासाठी उपयोग झाला पाहिजे, विज्ञानाच्या या वरदानाचा आम्ही गावाच्या हितासाठी वापर करत आहोत, असे या ग्रुपने आवाहन केले आहे. भविष्यात याच ग्रुपच्या माध्यमातून ‘स्मार्ट व्हिलेज’कडे वाटचाल करण्याचा या सदस्यांचा मानस आहे. 

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपAurangabadऔरंगाबादonlineऑनलाइन