शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

शहरात विकासकामांचा खोळंबा; महापालिकेची प्रत्येक काम अर्धवट सोडून देण्याची प्रवृत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 13:10 IST

गाजावाजा करून एखाद्या कामाचा श्रीगणेशा करायचा आणि नंतर ते काम अर्धवट सोडून देण्याची प्रवृत्ती अलीकडे मनपात वाढली आहे.

- मुजीब देवणीकर 

औरंगाबाद : महापालिका दिवाळखोरीत निघाली आहे, ही वस्तुस्थिती आहे. तिजोरीत निधी नसल्याने विकासकामांचा खोळंबा झाला आहे. ज्या कामांसाठी शासन निधी प्राप्त आहे, ती कामेही मनपाकडून वर्षानुवर्षे होत नाहीत. गाजावाजा करून एखाद्या कामाचा श्रीगणेशा करायचा आणि नंतर ते काम अर्धवट सोडून देण्याची प्रवृत्ती अलीकडे मनपात वाढली आहे. सत्ताधारीही पन्नास विकासकामांची यादी घेऊन बसतात, त्यामुळे एकही काम पूर्ण होत नाही.

वल्लभभाई पटेल यांचा पुतळा

शहागंज चमन येथे सरदार वल्लभभाई पटेल यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या कामाचा शुभारंभ मागील वर्षी करण्यात आला. दोन महिन्यांत चबुतरा आणि सुशोभीकरणाचे काम पूर्ण करून १ जानेवारी २०१९ रोजी पुतळ्याचे लोकार्पण होेणार असल्याची घोषणा केली होती. १ जानेवारी २०२० उजाडण्यास अवघे ३७ दिवस शिल्लक आहेत. अद्याप पुतळ्याचे लोकार्पण, सुशोभीकरण मनपाला करता आले नाही. पटेल यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी २०१० मध्ये तत्कालीन नगरसेवक जगदीश सिद्ध यांनी ठराव ठेवून मनपाकडून २० लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतला होता. यासाठी तत्कालीन खा. चंद्रकांत खैरे यांनीही ४० लाख रुपयांचा निधी दिला आहे. 

लक्ष्मण चावडी ते एमजीएम रस्ता जालना रोडला पर्यायी रस्ता व्हावा, अशी ओरड दहा वर्षांपासून सुरू आहे. महापालिकेने मोठी आर्थिक जुळवाजुळव करून लक्ष्मण चावडी ते एमजीएम रस्त्याचे काम मे २०१८ मध्ये सुरू केले. दीड वर्षामध्ये मनपाला हे काम पूर्ण करता आले नाही. तब्बल १४ कोटी रुपये या रस्त्याच्या कामावर खर्च करण्यात येणार आहेत. हा निधी मनपाच्या तिजोरीत पडून असतानाही प्रशासनाला काम पूर्ण करून घेण्यासाठी वेळ नाही. 

टी.व्ही. सेंटर शॉपिंग कॉम्प्लेक्सटी.व्ही. सेंटर येथील व्यापारी संकुलाचे काम दोन वर्षांपूर्वी मनपाने पूर्ण केले. येथील ५० गाळे लिलाव पद्धतीने विकण्यात आले. महापालिकेच्या तिजोरीत तब्बल १२ कोटींचा निधी जमा झाला. ४६ गाळ्यांचे बांधकाम पूर्ण केले. त्यासाठी ३ कोटी ७७ लाख ४४ हजार रुपये खर्च करण्यात आले. आजपर्यंत गाळेधारकांना महापालिकेने ताबा दिलेला नाही. लिलावात ज्या व्यापाऱ्यांनी दुकाने घेतली त्यांच्याकडून उर्वरित निधीही मनपाने जमा करून घेतला नाही. सध्या शॉपिंग कॉम्प्लेक्स शोभेची वास्तू बनली आहे. 

महिला नगरसेविकांचा कार्यकाळ संपत आला...शहरात वेगवेगळ्या भागात दहा महिला शौचालय उभारण्यासाठी विद्यमान महिला नगरसेविकांनी चंगच बांधला होता. पाच वर्षांचा कार्यकाळ संपत आला तरी महापालिका प्रशासनाला औरंगपुरा वगळता एकाही ठिकाणी महिला शौचालय बांधता आले नाही. ३१ आॅक्टोबर २०१८ ची डेडलाईन महिला नगरसेविकांनी प्रशासनाला दिली होती. ३१ आॅक्टोबर २०१९ संपले तरी काम झाले नाही, हे विशेष.  

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAurangabadऔरंगाबादMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबादShiv SenaशिवसेनाBJPभाजपा