शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याच्या विसर्गावर लाभक्षेत्र विकास प्राधिकरण ठेवणार ‘वॉच’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 18:25 IST

जायकवाडी धरणात ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यातील धरण समूहातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गावर लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचा (कडा) ‘वॉच’ राहणार आहे.

ठळक मुद्दे संनियंत्रण यंत्रणेची तयारी  ‘त्या’वरच्या धरणांवर जाणार पथक 

औरंगाबाद : जायकवाडी धरणात ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यातील धरण समूहातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गावर लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचा (कडा) ‘वॉच’ राहणार आहे. जायकवाडीत ज्या- ज्या धरणांतून पाणी सोडले जाणार आहे, तेथे सोडण्यात येणाऱ्या पाण्याची नोंद ठेवण्यासाठी पथक पाठविण्यासाठी संनियंत्रण यंत्रणेने तयारी केली आहे.

कडा भवन येथे बुधवारी अधीक्षक अभियंता संजय भर्गोदेव यांच्या कक्षात बैठक झाली. यावेळी पैठण येथील कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांच्यासह अधिकारी-कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. जायकवाडीत नगर, नाशिक जिल्ह्यांतील धरणातून ९ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वरच्या धरणांतून पाणी सुटल्यानंतर कराव्या लागणाऱ्या प्रक्रियेच्या दृष्टीने बैठकीत चर्चा करण्यात आली. मुळा, प्रवरा, गोदावरी दारणा, पालखेड या धरणातून पाणी सोडण्याचे आदेश आहेत. पाणी विसर्ग सुरू झाल्यानंतर या समूहातील प्रत्येक धरणावर चार जणांचे पथक देखरेख करण्याचे काम करील. 

नदीकाठच्या गावांची यादीपाणी सोडण्याचे आदेश आल्याने नदीकाठच्या गावांना सतर्क करण्याचे काम केले जात आहे. त्यादृष्टीने गावांची यादी घेण्यात येत आहे. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाने यंत्रणेची तयारी पूर्ण केली आहे. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादJayakwadi Damजायकवाडी धरणWaterपाणीNashikनाशिकAhmednagarअहमदनगर