शहरं
Join us  
Trending Stories
1
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
2
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
3
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
4
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
5
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
6
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
7
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
8
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
9
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
10
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
11
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
12
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
13
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
14
जातगणना : मॅजिक की मंडल?
15
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
16
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
17
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
18
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
19
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
20
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...

मराठवाड्यात यंदा उन्हाळ्यातही चांगली जलसंपदा, तरीही पाण्यासह इतर टंचाईचा सामना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2022 19:23 IST

मराठवाड्यातील ११ मोठ्या प्रकल्पांत सध्या मोठ्या प्रमाणात जिवंत साठा आहे.

औरंगाबाद : मराठवाड्यात यंदाच्या उन्हाळ्यात जलसंपदा चांगल्या प्रमाणात उपलब्ध आहे. असे असतानाही पाण्यासह इतर टंचाईचा सामना विभागातील आठही जिल्ह्यातील ग्रामीण आणि काही प्रमाणात शहरी भागात करावा लागणार आहे. विभागातील सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद सीईओंकडून आलेल्या टंचाई अहवालाचा एकत्रित प्रस्ताव विभागीय प्रशासनाने शासनाकडे सादर केला असून, १४१ कोटींच्या आसपास हा प्रस्ताव असल्याची माहिती सूत्रांनी दिली. लघु, मध्यम आणि मोठ्या प्रकल्पांत जिवंत जलसाठ्यांचे प्रमाण बऱ्यापैकी आहे.

एप्रिल २०२२ ते जून २०२२ या तीन महिन्यांसाठी नवीन विहीर घेणे, नळ योजना दुरुस्त करणे, तात्पुरती पूरक योजना राबविणे, विंधन विहिरींची विशेष दुरुस्ती करणे, खासगी विहीर अधिग्रहण करणे, ज्या गावांपर्यंत रस्ता नाही, तेथे बैलगाडीने पाणीपुरवठा करणे, विहिरीतील गाळ उपसणे, नदीपात्रात बुडकी घेणे आदी उपाययोजना टंचाईच्या अनुषंगाने विभागात कराव्या लागणार आहेत. प्रत्येक जिल्ह्याने यासाठी ग्रामीण आणि शहरी भागातील उपाययोजनांचा वेगवेगळा प्रस्ताव पाठविला आहे. तसेच मागील वर्षांतील काही अनुदान शासनाकडे थकीत असून, त्याची देखील मागणी सर्व स्तरातून करण्यात आली आहे.

१४१ कोटींचा आठ जिल्ह्यांतून प्रस्तावऔरंगाबाद जिल्ह्यात अंदाजे ८ कोटी, जालना ७ कोटी, परभणी ८ कोटी, हिंगोली ३१ कोटी, नांदेड ४३ कोटी, बीड ३४ कोटी, उस्मानाबाद ४ तर लातूर ६ कोटी असे सर्व मिळून सुमारे १४१ कोटींचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. जिल्हानिहाय प्रस्तावांचे सोमवारी वर्गीकरण सुरू होते; पंरतु महसूल कर्मचारी संपावर गेल्यामुळे कोणत्या जिल्ह्यात किती रुपये उपाययोजनांसाठी लागणार आहेत, याची अंतिम माहिती समोर आली नाही.

विभागात जल प्रकल्पात किती पाणीमराठवाड्यातील ११ मोठ्या प्रकल्पांत सध्या मोठ्या प्रमाणात जिवंत साठा आहे. यात जायकवाडी ६४ टक्के, मांजरा ७४ टक्के, सिध्देश्वर ४२, येलदरी ७२, विष्णुपुरी ७३, माजलगाव ६१, इसापूर ६९, मनार ५७, निम्न तेरणा ७७, सिना कोळेगाव ६९ तर निम्न दुधना प्रकल्पात ७६ टक्के जलसाठा सध्या आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादJayakwadi Damजायकवाडी धरणMarathwadaमराठवाडा