शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

सात कोटी रुपये खर्चून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ६१ धरणांतील गाळ काढण्यास सुरूवात

By बापू सोळुंके | Updated: May 9, 2024 12:58 IST

या योजनेंतर्गत धरणांतील गाळ काढण्यासाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी, या धरणांतील गाळ शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात पसरावा, यासाठी शासनाकडून अनुदानही देण्यात येते.

छत्रपती संभाजीनगर : गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार या योजनेंतर्गत धरणांतील गाळ काढून शेतकऱ्यांच्या शेतात नेऊन टाकण्यासाठी शासनाकडून एनजीओंची मदत घेतली आहे. जलसंधारण विभाग आणि जि. प.चा लघु पाटबंधारे विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील ६१ तलावांतील गाळ काढण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामावर सुमारे ७ कोटी रुपये खर्चाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

जलसंधारण विभागाने जिल्ह्यात लहान-मोठे सुमारे १७०० पाझर तलाव, साठवण तलाव बांधलेले आहेत. आता जिल्ह्यात नवीन तलाव बांधण्यासाठी साइट उपलब्ध नाही. जुन्या तलावांना ४० वर्षांपेक्षा अधिक कालावधी उलटला आहे. सर्वाधिक पाझर तलाव हे ८० च्या दशकात झालेले आहेत. या तलावांत आता मोठ्या प्रमाणात गाळ साचलेला आहे. परिणामी, या तलावांची पाणी साठवण क्षमता घटल्याचे दिसून येते. यामुळे या तलावांत संकल्पित जलसाठा होत नाही. ही बाब निदर्शनास आल्यानंतर शासनाने गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार ही योजना आणली.

या योजनेंतर्गत धरणांतील गाळ काढण्यासाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी, या धरणांतील गाळ शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात पसरावा, यासाठी शासनाकडून अनुदानही देण्यात येते. शिवाय शेतकऱ्यांना वाहतूक खर्चही दिला जातो. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जलसंधारण अधिकाऱ्यांनी ५३ तलावांतील गाळ काढण्यास मंजुरी दिली. या धरणांत ६,२२,१८१ घनमीटर गाळ आहे. यापैकी आतापर्यंत ३,२६,८५९ घनमीटर गाळ उचलण्यात आला असल्याचे जिल्हा जलसंधारण अधिकारी कोठवळे यांनी सांगितले. चार एनजीओंची नियुक्ती करण्यात आली आहे. या कामासाठी ६ कोटी २ लाख २२ हजार रुपये खर्चाला प्रशासकीय मंजुरी मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हा परिषदही काढणार धरणांतील गाळजिल्हा परिषदेच्या अधिपत्याखालील ८ धरणांतील गाळ काढण्यास मान्यता मिळाली आहे. यात खुलताबाद तालुक्यातील चार तर कन्नड, फुलंब्री तालुक्यातील प्रत्येकी एक आणि वैजापूर तालुक्यातील दोन धरणांचा समावेश आहे. या कामावर १ कोटी १० लाख १३ हजार रुपये खर्च केले जाणार आहेत.

तालुक्याचे नाव --- धरणांची संख्या ---- साचलेला गाळ (घनमीटरमध्ये)छत्रपती संभाजीनगर --- १० ---- १६४६२५कन्नड --- १२ ---- ८९९०५खुलताबाद --- १० ---- ९६९७१फुलंब्री --- ०६ ---- ९५६७०सिल्लोड --- ४ ---- ४०२७१पैठण --- ५ --- ९९०३५वैजापूर -- ६ --- ३५७०४

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रAurangabadऔरंगाबादDamधरण