शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे मराठवाड्यातील रेल्वे प्रश्न ‘जैसे थे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 15:05 IST

जालन्याचे खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री राहिले गैरहजर

ठळक मुद्दे रेल्वे बैठकीत फक्त चर्चेचे गुऱ्हाळ हे रेल्वे प्रश्न कधी सुटणार?

- संतोष हिरेमठ 

औरंगाबाद : मराठवाड्यातील वर्षानुवर्षे रेंगाळलेले रेल्वे प्रश्न सुटण्याच्या दृष्टीने नांदेड येथील दक्षिण मध्य रेल्वे आणि खासदारांच्या या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, या बैठकीतून काहीही निष्पन्न झाले नाही. शिवाय केंद्रीय राज्यमंत्री असलेले खा. रावसाहेब दानवे बैठकीला गैरहजर राहिले. रेल्वे प्रशासनासह लोकप्रतिनिधीही रेल्वेप्रश्नी अशी उदासीनता दाखविणार असतील, तर मग मराठवाड्यातील रेल्वे प्रश्न कधी सुटणार, असा सवाल सर्वसामान्यांकडून उपस्थित होत आहे.

दक्षिण मध्य रेल्वेकडून नांदेड विभागाला कायम सापत्न वागणूक दिली जात असल्याची ओरड होते. मराठवाड्यातील रेल्वे प्रश्नांकडे, मागण्यांकडे सतत कानाडोळा करण्यात आला. मराठवाड्याच्या तोंडाला कायम पानेच पुसण्यात आली. त्यामुळेच नांदेड विभाग हा मध्य रेल्वेशी जोडण्याच्या मागणीने मध्यंतरी जोर धरला होता. परंतु मागणी मागे पडली आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागांतर्गत येणाºया खासदारांची १३ नोव्हेंबरला नांदेड येथे विभागीय रेल्वे कार्यालयात बैठक झाली. मराठवाड्यातील रेल्वे विकास वर्षानुवर्षे खुंटला आहे. नव्या रेल्वेगाड्या, दुहेरीकरण, पीटलाईनसह अनेक गोष्टींसाठी केवळ प्रतीक्षा करावी लागत आहे. या बैठकीतून काही तरी पदरी पडेल, अशी अपेक्षा होती. रेल्वे बोर्डाने मनमाड-औरंगाबाद-परभणी-नांदेड-मुदखेड रेल्वे विद्युतीकरणासाठी मागील अर्थसंकल्पात मंजुरी दिली होती. मात्र, हाती घेण्यात आलेल्या विद्युतीकरणाच्या कामात या मार्गाला पूर्णपणे डावलले. बैठकीच्या माध्यमातून औरंगाबादला पीटलाईन, परभणी-मनमाड रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण, विद्युतीकरण, दौलताबाद-चाळीसगाव रेल्वे मार्ग, औरंगाबादच्या मॉडेल रेल्वेस्टेशनचा दुसरा टप्पा, पीटलाईन, मुकुंदवाडी रेल्वेस्टेशनवर एक्स्प्रेसला थांबा आदी प्रश्न मार्गी लागण्याची अपेक्षा होती. 

रेल्वेकडून दरवर्षी बैठक घेतली जाते. परंतु त्यातून रेल्वे प्रश्न सुटले, असे कधी झाले नाही. किमान ही बैठक तरी त्याला अपवाद ठरेल. किमान विभाग, संपूर्ण झोनच्या अंतर्गत आणि अधिकारातील समस्या निकाली निघतील, अशी रेल्वे संघटनांना आशा होती. त्यामुळेच गतवर्षीच्या बैठकीतील कोणते प्रश्न मार्गी लागले, असा सवालही उपस्थित करून खासदारांनी के ला.  मात्र, दरवर्षीप्रमाणे ही बैठकीही फक्त चर्चेचे गुºहाळ करणारी ठरली. खासदारांनी मांडलेले प्रश्न सोडविण्यासाठी दमरे प्रयत्नशील राहील, असे उत्तर देऊन रेल्वे अधिकारी मोकळे झाले. त्यामुळे मराठवाड्यातील प्रवाशांना त्यातून काहीही मिळाले नाही. 

परभणी-मनमाड रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण, मुंबईसाठी नवीन रेल्वे यासह अनेक प्रश्न रेल्वे बोर्डाकडे अडकले आहेत. हे प्रश्न सुटण्याच्या दृष्टीने केंद्र सरकार, रेल्वे बोर्ड आणि रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा आणि हे प्रश्न मार्गी लागावे, यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे मराठवाड्यातील जनता आशाळभूत नजरेने पाहते आहे. मात्र, नांदेड येथील बैठकीला ते गैरहजर राहिले. त्यामुळे मराठवाडा किंवा जालना येथे रेल्वेचे कोणतेही प्रश्न नाहीत का, जे बैठकीत मांडणे गरजेचे होते, असा प्रश्न उपस्थित होत आहे. रेल्वेच्या बैठकीला ते गैरहजर राहिले. औरंगाबादेत हर्सूल येथील एका अनाथ दत्तक क न्येच्या विवाह समारंभाला त्यांची उपस्थिती होती. सामाजिकदृष्ट्या हा विवाह समारंभ महत्त्वपूर्ण आहे. परंतु रेल्वेच्या अपुºया सुविधांनी त्रस्त असलेल्या मराठवाड्यातील जनतेसाठी रेल्वेची बैठक महत्त्वाची होती. 

हे रेल्वे प्रश्न कधी सुटणार?मनमाड ते परभणी विद्युतीकरणासह दुहेरीकरणाचे काम सुरू करणे.रोटेगाव-कोपरगाव हा ३५ कि. मी. चा नवीन रेल्वे मार्ग बनविणे.औरंगाबाद - दौलताबाद - चाळीसगाव या  ८८ कि.मी.च्या नव्या मार्गाचे काम लवकर सुरू होणे.औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर पीटलाईन बनविण्यात यावी.मुंबईसाठी नवीन रेल्वे, राज्यराणी एक्स्प्रेसचा विस्तार.औरंगाबादच्या मॉडेल रेल्वेस्टेशनच्या दुसºया टप्प्याचे काम.

टॅग्स :Marathwadaमराठवाडाrailwayरेल्वेAurangabadऔरंगाबादNandedनांदेडparabhaniपरभणी