शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे मराठवाड्यातील रेल्वे प्रश्न ‘जैसे थे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 15:05 IST

जालन्याचे खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री राहिले गैरहजर

ठळक मुद्दे रेल्वे बैठकीत फक्त चर्चेचे गुऱ्हाळ हे रेल्वे प्रश्न कधी सुटणार?

- संतोष हिरेमठ 

औरंगाबाद : मराठवाड्यातील वर्षानुवर्षे रेंगाळलेले रेल्वे प्रश्न सुटण्याच्या दृष्टीने नांदेड येथील दक्षिण मध्य रेल्वे आणि खासदारांच्या या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, या बैठकीतून काहीही निष्पन्न झाले नाही. शिवाय केंद्रीय राज्यमंत्री असलेले खा. रावसाहेब दानवे बैठकीला गैरहजर राहिले. रेल्वे प्रशासनासह लोकप्रतिनिधीही रेल्वेप्रश्नी अशी उदासीनता दाखविणार असतील, तर मग मराठवाड्यातील रेल्वे प्रश्न कधी सुटणार, असा सवाल सर्वसामान्यांकडून उपस्थित होत आहे.

दक्षिण मध्य रेल्वेकडून नांदेड विभागाला कायम सापत्न वागणूक दिली जात असल्याची ओरड होते. मराठवाड्यातील रेल्वे प्रश्नांकडे, मागण्यांकडे सतत कानाडोळा करण्यात आला. मराठवाड्याच्या तोंडाला कायम पानेच पुसण्यात आली. त्यामुळेच नांदेड विभाग हा मध्य रेल्वेशी जोडण्याच्या मागणीने मध्यंतरी जोर धरला होता. परंतु मागणी मागे पडली आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागांतर्गत येणाºया खासदारांची १३ नोव्हेंबरला नांदेड येथे विभागीय रेल्वे कार्यालयात बैठक झाली. मराठवाड्यातील रेल्वे विकास वर्षानुवर्षे खुंटला आहे. नव्या रेल्वेगाड्या, दुहेरीकरण, पीटलाईनसह अनेक गोष्टींसाठी केवळ प्रतीक्षा करावी लागत आहे. या बैठकीतून काही तरी पदरी पडेल, अशी अपेक्षा होती. रेल्वे बोर्डाने मनमाड-औरंगाबाद-परभणी-नांदेड-मुदखेड रेल्वे विद्युतीकरणासाठी मागील अर्थसंकल्पात मंजुरी दिली होती. मात्र, हाती घेण्यात आलेल्या विद्युतीकरणाच्या कामात या मार्गाला पूर्णपणे डावलले. बैठकीच्या माध्यमातून औरंगाबादला पीटलाईन, परभणी-मनमाड रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण, विद्युतीकरण, दौलताबाद-चाळीसगाव रेल्वे मार्ग, औरंगाबादच्या मॉडेल रेल्वेस्टेशनचा दुसरा टप्पा, पीटलाईन, मुकुंदवाडी रेल्वेस्टेशनवर एक्स्प्रेसला थांबा आदी प्रश्न मार्गी लागण्याची अपेक्षा होती. 

रेल्वेकडून दरवर्षी बैठक घेतली जाते. परंतु त्यातून रेल्वे प्रश्न सुटले, असे कधी झाले नाही. किमान ही बैठक तरी त्याला अपवाद ठरेल. किमान विभाग, संपूर्ण झोनच्या अंतर्गत आणि अधिकारातील समस्या निकाली निघतील, अशी रेल्वे संघटनांना आशा होती. त्यामुळेच गतवर्षीच्या बैठकीतील कोणते प्रश्न मार्गी लागले, असा सवालही उपस्थित करून खासदारांनी के ला.  मात्र, दरवर्षीप्रमाणे ही बैठकीही फक्त चर्चेचे गुºहाळ करणारी ठरली. खासदारांनी मांडलेले प्रश्न सोडविण्यासाठी दमरे प्रयत्नशील राहील, असे उत्तर देऊन रेल्वे अधिकारी मोकळे झाले. त्यामुळे मराठवाड्यातील प्रवाशांना त्यातून काहीही मिळाले नाही. 

परभणी-मनमाड रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण, मुंबईसाठी नवीन रेल्वे यासह अनेक प्रश्न रेल्वे बोर्डाकडे अडकले आहेत. हे प्रश्न सुटण्याच्या दृष्टीने केंद्र सरकार, रेल्वे बोर्ड आणि रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा आणि हे प्रश्न मार्गी लागावे, यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे मराठवाड्यातील जनता आशाळभूत नजरेने पाहते आहे. मात्र, नांदेड येथील बैठकीला ते गैरहजर राहिले. त्यामुळे मराठवाडा किंवा जालना येथे रेल्वेचे कोणतेही प्रश्न नाहीत का, जे बैठकीत मांडणे गरजेचे होते, असा प्रश्न उपस्थित होत आहे. रेल्वेच्या बैठकीला ते गैरहजर राहिले. औरंगाबादेत हर्सूल येथील एका अनाथ दत्तक क न्येच्या विवाह समारंभाला त्यांची उपस्थिती होती. सामाजिकदृष्ट्या हा विवाह समारंभ महत्त्वपूर्ण आहे. परंतु रेल्वेच्या अपुºया सुविधांनी त्रस्त असलेल्या मराठवाड्यातील जनतेसाठी रेल्वेची बैठक महत्त्वाची होती. 

हे रेल्वे प्रश्न कधी सुटणार?मनमाड ते परभणी विद्युतीकरणासह दुहेरीकरणाचे काम सुरू करणे.रोटेगाव-कोपरगाव हा ३५ कि. मी. चा नवीन रेल्वे मार्ग बनविणे.औरंगाबाद - दौलताबाद - चाळीसगाव या  ८८ कि.मी.च्या नव्या मार्गाचे काम लवकर सुरू होणे.औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर पीटलाईन बनविण्यात यावी.मुंबईसाठी नवीन रेल्वे, राज्यराणी एक्स्प्रेसचा विस्तार.औरंगाबादच्या मॉडेल रेल्वेस्टेशनच्या दुसºया टप्प्याचे काम.

टॅग्स :Marathwadaमराठवाडाrailwayरेल्वेAurangabadऔरंगाबादNandedनांदेडparabhaniपरभणी