शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
3
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
4
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
5
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
6
मुकेश अंबानींचा पगार किती? आकडा वाचून विश्वास बसणार नाही, ५ वर्षांपासून एकदाही बदल नाही!
7
बापरे! आई-वडिलांच्या एका छोट्याशा चुकीचा मुलांना त्रास, चेहऱ्यावर पडतात पांढरे डाग
8
Video: २५ हजार कमावतो, १० तर भाडेच भरतो...; सैयाराच्या गाण्याचे कार्पोरेट व्हर्जन लोकांच्या काळजाला भिडले...
9
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
10
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
11
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
12
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली
13
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले
14
मुंबई-गोवा ‘वंदे भारत’ २० कोचची होणार? कधीपासून सेवा सुरू करणार? प्रवाशांचा तुफान प्रतिसाद
15
ट्रम्पचा 'टॅरिफ बॉम्ब' थांबता थांबेना! आता थेट चिप्सवर १००% शुल्क, तुमच्या खिशाला किती फटका बसेल?
16
Shravan Purnima 2025: श्रावण पौर्णिमेला कोळीबांधव का करतात रामाची पूजा? जाणून घ्या कारण!
17
मॉर्फ कमी होते म्हणून की काय Elon Musk आता खालच्या पातळीवर उतरले; ग्रोक एआय देणार आता नग्न फोटो 
18
मुलीची पाठवणी करताना वधूपिता गहिवरला, डबडबल्या डोळ्यांनी जावईबापूंना म्हणाला- माझी लेक... (VIDEO)
19
कोरोना काळात एका गोळीसाठी अमेरिका तडफडत होता, भारताने एका कॉलवर ५० लाख टॅब्लेट पाठवल्या आणि आता...
20
५०० रुपयांच्या SIP चा हप्ता चुकला अन् बँकने लावला ५९० रुपये दंड, तुही तर ही चूक करत नाही ना?

बायोमेट्रिक्स हजेरीसाठी शिक्षण विभाग हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 22:24 IST

राज्य सरकारने विज्ञान शाखेतील कनिष्ठ महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना बायोमेट्रिक्स हजेरी अनिवार्य केली आहे.

ठळक मुद्देजिल्हानिहाय बैठका घेणार : १ हजार ४९ महाविद्यालयांपैकी १८८ अहवाल प्राप्त

औरंगाबाद : राज्य सरकारने विज्ञान शाखेतील कनिष्ठ महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना बायोमेट्रिक्स हजेरी अनिवार्य केली आहे. शिक्षण विभागाने वारंवार सूचना देत बायोमेट्रिक्स यंत्रणा बसवून अहवाल सादर करण्याचे आदेश महाविद्यालयांना दिले आहेत. औरंगाबाद विभागातील १ हजार ४९ महाविद्यालयांपैकी अवघ्या १८८ महाविद्यालयांनीच बायोमेट्रिक्स यंत्रणा बसवली. यामुळे आता शिक्षण विभागाने यासाठी जिल्हानिहाय बैठका घेण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्य सरकारने वाढत्या खासगी शिकवणींचे प्रस्थ कमी करण्यासाठी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक्स हजेरी बंधनकारक केली आहे. एकदा अकरावीला प्रवेश घेतला की, विद्यार्थी थेट बारावीच्या परीक्षेलाच दिसतात. आतापर्यंत हीच स्थिती प्रत्येक महाविद्यालयात पाहावयास मिळाली आहे. अगदी विज्ञान शाखेचे विद्यार्थीदेखील महाविद्यालयात नियमित येत नाहीत, तर विद्यार्थी टिकावेत, म्हणून महाविद्यालयांनीदेखील शिकवणी वर्गांसोबत करार करीत प्रात्यक्षिकासही उपस्थित न राहण्यास विद्यार्थ्यांना मुभा दिली.

या प्रकारांना आळा बसावा, सर्व विद्यार्थी नियमित महाविद्यालयात यावेत यासाठी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांची हजेरी बायोमेट्रिक्सपद्धतीने नोंदवावी, असा शासन निर्णयच शिक्षण विभागाने काढला. सुरुवातीला ३० जुलै आणि त्यानंतर आॅगस्ट अखेरपर्यंत महाविद्यालयांना बायोमेट्रिक्स मशीन बसवून हजेरी घेण्याच्या सूचना केल्या होत्या. औरंगाबाद विभागात एकूण १,०४९ महाविद्यालये आहेत. मात्र, त्यापैकी केवळ १८८ महाविद्यालयांनीच बायोमेट्रिक्सची माहिती शिक्षण विभागाला कळविल्याचे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. याविषयी अधिक जागरूकता निर्माण करण्यासाठी आता जिल्हानिहाय महाविद्यालयांचा बैठका घेण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाने म्हटले आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादStudentविद्यार्थीGovernmentसरकारcollegeमहाविद्यालयEducationशिक्षण