शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
2
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
3
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
4
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
5
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
6
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
7
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
8
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
9
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
10
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
11
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
12
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
13
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
14
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
15
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
16
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
17
पहलगाम हल्ल्याचा दणका! भारताकडून पाकिस्तानचा ऑलिम्पिक विजेता अर्शद नदीम BLOCK!!
18
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
19
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
20
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!

बायोमेट्रिक्स हजेरीसाठी शिक्षण विभाग हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 22:24 IST

राज्य सरकारने विज्ञान शाखेतील कनिष्ठ महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना बायोमेट्रिक्स हजेरी अनिवार्य केली आहे.

ठळक मुद्देजिल्हानिहाय बैठका घेणार : १ हजार ४९ महाविद्यालयांपैकी १८८ अहवाल प्राप्त

औरंगाबाद : राज्य सरकारने विज्ञान शाखेतील कनिष्ठ महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना बायोमेट्रिक्स हजेरी अनिवार्य केली आहे. शिक्षण विभागाने वारंवार सूचना देत बायोमेट्रिक्स यंत्रणा बसवून अहवाल सादर करण्याचे आदेश महाविद्यालयांना दिले आहेत. औरंगाबाद विभागातील १ हजार ४९ महाविद्यालयांपैकी अवघ्या १८८ महाविद्यालयांनीच बायोमेट्रिक्स यंत्रणा बसवली. यामुळे आता शिक्षण विभागाने यासाठी जिल्हानिहाय बैठका घेण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्य सरकारने वाढत्या खासगी शिकवणींचे प्रस्थ कमी करण्यासाठी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक्स हजेरी बंधनकारक केली आहे. एकदा अकरावीला प्रवेश घेतला की, विद्यार्थी थेट बारावीच्या परीक्षेलाच दिसतात. आतापर्यंत हीच स्थिती प्रत्येक महाविद्यालयात पाहावयास मिळाली आहे. अगदी विज्ञान शाखेचे विद्यार्थीदेखील महाविद्यालयात नियमित येत नाहीत, तर विद्यार्थी टिकावेत, म्हणून महाविद्यालयांनीदेखील शिकवणी वर्गांसोबत करार करीत प्रात्यक्षिकासही उपस्थित न राहण्यास विद्यार्थ्यांना मुभा दिली.

या प्रकारांना आळा बसावा, सर्व विद्यार्थी नियमित महाविद्यालयात यावेत यासाठी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांची हजेरी बायोमेट्रिक्सपद्धतीने नोंदवावी, असा शासन निर्णयच शिक्षण विभागाने काढला. सुरुवातीला ३० जुलै आणि त्यानंतर आॅगस्ट अखेरपर्यंत महाविद्यालयांना बायोमेट्रिक्स मशीन बसवून हजेरी घेण्याच्या सूचना केल्या होत्या. औरंगाबाद विभागात एकूण १,०४९ महाविद्यालये आहेत. मात्र, त्यापैकी केवळ १८८ महाविद्यालयांनीच बायोमेट्रिक्सची माहिती शिक्षण विभागाला कळविल्याचे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. याविषयी अधिक जागरूकता निर्माण करण्यासाठी आता जिल्हानिहाय महाविद्यालयांचा बैठका घेण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाने म्हटले आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादStudentविद्यार्थीGovernmentसरकारcollegeमहाविद्यालयEducationशिक्षण