शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

औरंगाबाद जिल्ह्यात आता डेंग्यूचे संकट; २४ तासांत १० रुग्णांचे निदान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2022 12:35 IST

ग्रामीण भागातील ६, शहर, जालन्यातील प्रत्येकी २ रुग्ण

औरंगाबाद : कोरोना, स्वाइन फ्लूपाठोपाठ जिल्ह्यात आता डेंग्यूचे संकट अधिक वाढले आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत डेंग्यूच्या १० रुग्णांचे निदान झाले. यात दोन रुग्ण जालना जिल्ह्यातील आहेत. डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याने आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे.

शहरात गेल्या १५ दिवसांपासून दररोज पाऊस पडत आहे. त्यामुळे ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचून डास उत्पत्तीला हातभार लागत आहे. जिल्ह्यात सध्या विषाणूजन्य आजारांसह डेंग्यू आणि डेंग्यूसदृश आजारांनी डोके वर काढले आहे. शासकीय यंत्रणेत नोंद झालेल्या डेंग्यूच्या रुग्णांची संख्या बोटावर मोजता येईल इतकीच आहे, मात्र खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या डेंग्यूसदृश रुग्णांची संख्या अधिक आहे. घराच्या परिसरात पाणी साचू देऊ नये. घरावर रिकामे टायर, भांडी ठेवता कामा नये, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.औरंगाबाद तालुक्यात ३, सोयगाव तालुक्यात एक, खुलताबाद तालुक्यात २ आणि महापालिका हद्दीत ४ रुग्णांचे निदान झाल्याचे जिल्हा हिवताप अधिकारी रवींद्र ढोले यांनी सांगितले.

डेंग्यूची लक्षणेताप, तीव्र डोकेदुखी, अंगदुखी, मळमळ, उलट्या, अंगावर पुरळ आणि तीव्र डेंग्यूच्या प्रकारात रक्तस्राव, बेशुद्धावस्था (डीएसएश) अशी डेंग्यूची लक्षणे असल्याची माहिती जिल्हा हिवताप कार्यालयातर्फे देण्यात आली.

फवारणी, ॲबेटिंग सुरूशहरात महापालिकेकडून आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे. फवारणी, ॲबेटिंग सुरू आहे. नागरिकांनी आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा. घराशेजारी पाणी साचणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डाॅ. पारस मंडलेचा यांनी केले.

नागरिकांनी काळजी घ्यावीजिल्ह्यात दिवसभरात डेंग्यूच्या १० रुग्णांची वाढ झाली आहे. यात २ महापालिका हद्दीतील आणि २ जालना जिल्ह्यातील आहेत, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. अभय धानोरकर यांनी सांगितले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादdengueडेंग्यू