शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
3
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
4
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
5
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
6
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
7
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
8
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
9
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
10
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
11
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
12
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
13
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
14
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
15
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
16
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
17
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
18
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
19
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
20
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO

ऐन सुट्यांमध्ये दिल्ली विमान प्रवासाचे भाडे भिडले गगनाला; प्रवाशांच्या खिशाला कात्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 12:39 IST

छत्रपती संभाजीनगरहून दिल्लीसाठी एअर इंडियाचे विमान सकाळी ७:४० वाजता उड्डाण घेते.

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरहून मे महिन्यात दिल्लीला विमानाने जाणाऱ्या प्रवाशांच्या खिशाला चाट बसत आहे. कारण मे महिन्यातील दिल्ली विमानाचे प्रवास भाडे गगनाला भिडले आहे. त्यामुळे विमान प्रवासी आणि टूर व्यावसायिकांकडून ओरड होत आहे.

छत्रपती संभाजीनगरहून दिल्लीसाठी एअर इंडियाचे विमान सकाळी ७:४० वाजता उड्डाण घेते. तर इंडिगोचे विमान सायंकाळी ६:५५ वाजता उड्डाण घेते. मे महिन्यात दिल्लीला जाणाऱ्या प्रवाशांना भाडेवाढीला सामोरे जावे लागत आहे. शालेय सुट्यांमुळे मे महिन्यात पर्यटनाला जाणाऱ्यांची संख्या अधिक असते. प्रवाशांच्या वाढत्या संख्येचा गैरफायदा घेत विमान कंपन्यांनी भाडेवाढीचा दणका दिल्याची ओरड होत आहे.

१० हजार रुपयेमे महिन्यात दिल्ली गाठायची तर एअर इंडियासाठी १० हजार व इंडिगोसाठी ७ हजार ५०० रुपये कमीत कमी मोजावे लागत आहेत. तारखेनुसार यात वेगवेगळे दर आहेत. तसेच हैदराबाद, मुंबई, बंगळुरू विमान प्रवास तिकीट दरांची मनमानी सुरू आहे. संध्याकाळी मुंबईहून येणारे व जाणारे विमान दररोज उशिरा उड्डाण घेते. त्यामुळे अनेकांचे आंतरराष्ट्रीय विमान चुकत आहे, असे ट्रॅव्हल एजंट असोसिएशनतर्फे सांगण्यात आले.

या समस्येची दखल घेणारे नेते नाहीतप्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत दोन्ही विमान कंपन्यांनी स्वस्त फेअरचे बुकिंग क्लास बंद करून महाग फेअर क्लास सुरू केला. अवाजवी नफेखोरी सुरू केली. दिल्लीसाठी फक्त दोन विमाने आहेत. यावर बोलणारे कोणी नेते नाहीत. कंपन्यांवर अंकुश नसल्याने त्यांचे फावते. असोसिएशनमार्फत इंडिगो विमान कंपनीला मुंबईच्या विमानाची वेळ थोडी लवकर करावी आणि दिल्लीसाठी सकाळचे अजून एक विमान सुरू करा, अहमदाबादला एक विमान द्यावे, आदी मागण्या केल्या आहेत.- मंगेश कपोते, अध्यक्ष, ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ औरंगाबाद

टॅग्स :airplaneविमानchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरtourismपर्यटन