पिण्याच्या पाण्यासाठी देगलूरकरांचे हाल
By Admin | Updated: May 13, 2014 01:03 IST2014-05-13T00:05:02+5:302014-05-13T01:03:51+5:30
देगलूर : व्हीटी पंपाची नादुरूस्ती, कमी दाबाने पाणीपुरवठा, दूषित पाणीपुरवठा अशा अनेक कारणांमुळे देगलूर शहरातील जनतेचे पिण्याच्या पाण्याअभावी बेहाल होत आहेत़

पिण्याच्या पाण्यासाठी देगलूरकरांचे हाल
देगलूर : व्हीटी पंपाची नादुरूस्ती, कमी दाबाने पाणीपुरवठा, दूषित पाणीपुरवठा अशा अनेक कारणांमुळे देगलूर शहरातील जनतेचे पिण्याच्या पाण्याअभावी बेहाल होत आहेत़ देगलूर शहराला शहरापासून ११ कि़मी़ अंतरावर असलेल्या करडखेड मध्यम प्रकल्पातून पाणीपुरवठा होतो़ शहराच्या टाकीत पाणी आणण्यासाठी दोन व्हीटी पंप ओहत़ दोन्ही पंप चालू असतील तरच शहराच्या जलकुंभात आवश्यक तेवढा जलसाठा केला जावू शकतो़ यावर्षी सुदैवाने करडखेड मध्यम प्रकल्पात बर्यापैकी जलसाठा उपलब्ध आहे़ परंतु व्हीटी पंपात सतत होत असलेल्या बिघाडामुळे, कमी दाबाने होत असलेल्या विद्युत पुरवठ्यामुळे अनंत अडचणी निर्माण होत आहेत़ देगलूर शहरात गेल्या काही वर्षांपासून विषम दाबाने पाणीपुरवठा होत आहे़ शहराच्या काही भागातील नळांना दुसर्या मजल्यावर चढेल एवढ्या दाबाने पाणी येते, तर शिवनगर, सद्गुरूनगर, ओमनगर, बापूनगर, दत्तनगर, सुभाषनगर, दत्तमंदिर परिसरात अत्यंत कमी दाबाने पाणी येते़ या ठिकाणी काही मंडळी विद्युत मोटारीने पाणी ओढून घेतात, त्यामुळे अनेकांचे नळ ठणठणीत असतात़ गेल्या १५-२० दिवसांपासून शहराला वेगवेगळ्या कारणामुळे आवश्यक तेवढा व योग्यवेळी पाणीपुरवठा होत नसल्यामुळे ज्यांच्या घरी बोअर नाही, अशा हजारो नागरिकांना पाण्यासाठी दारोदार भटकावे लागत आहे़ ऩ प़ प्रशासनाच्या अत्यंत शिथिल कारभारामुळे जनता वैतागून गेली आहे़ (वार्ताहर)