शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

प्रगतीपथावरील कामे थांबविण्याचा निर्णय लहरी, बेकायदा; राज्य सरकारला खंडपीठाचा दणका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2023 17:29 IST

उच्च न्यायालयाचा आदेश : तत्कालीन शासनाची मंजूर कामे थांबविणे बेकायदा, मनमानी, लहरी

औरंगाबाद : आधीच्या राज्य शासनाने मंजूर केलेली आणि ३० ते ७० टक्के पूर्ण झालेली कामे थांबविण्याचा विद्यमान शासनाचा निर्णय बेकायदा, मनमानी व लहरी असल्याचे निरीक्षण नोंदवून मुंबई उच्च न्यायालयाच्याऔरंगाबाद खंडपीठाचे न्या. मंगेश पाटील आणि न्या. संतोष चपळगावकर यांच्या खंडपीठाने निधी वितरणाच्या निर्णयास स्थगिती देणारा शिंदे - फडणवीस सरकारचा ‘तो’ निर्णय सोमवारी रद्द केला.

तत्कालीन शासनाने २९ जून २०२२च्या शासन निर्णयाद्वारे वितरित केलेला सदर कामासाठीचा १५० कोटींचा निधी नांदेड वाघाळा महापालिकेला देण्याचा आदेश खंडपीठाने विद्यमान शासनाला दिला आहे. ‘केवळ सरकार बदलल्यामुळे लोककल्याणकारी कामे थांबवता येत नाहीत.’ याबाबतच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यांचा संदर्भ देऊन शासनाचा वादग्रस्त आदेश रद्द करण्याची विनंती याचिकाकर्त्यांनी केली होती.

शासनाच्या ध्येय धोरणांप्रमाणे नगरविकास खात्याने २२ जून २०२१च्या शासन निर्णयाद्वारे १५० कोटींचे अनुदान नांदेड वाघाळा महापालिकेला ‘मूलभूत सुविधा’ या सदराखाली मंज़ूर केले होते. कामे प्रगतीपथावर असताना १५० कोटींचा निधीही मनपाला वितरित करण्यात आला होता. पण, महाविकास आघाडीचे सरकार जाऊन आलेल्या शिंदे - फडणवीस सरकारने अवघ्या ४८ तासांच्या आत कोणतेही कारण न दर्शविता १ जुलै २०२२च्या शासन निर्णयाद्वारे निधी वितरित करण्याच्या २२ जून २०२२च्या निर्णयास स्थगिती दिली होती.

सदर निर्णयास तत्कालीन महापौर जयश्री पावडे आणि स्थायी समिती सभापती किशोर स्वामी यांनी ॲड. महेश देशमुख यांच्यामार्फत दोन याचिकांद्वारे औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले होते. सोमवारी सुनावणीवेळी ॲड. देशमुख यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले की, तांत्रिक व प्रशासकीय मान्यता आदेश रद्द केलेला नाही. मंजूर केलेली कामे प्रगतीपथावर आहेत. मनपातर्फे ॲड. राधाकृष्ण इंगोले यांनी ३० ते ७० टक्के कामे पूर्ण होऊन प्रगतीपथावर असल्याचे व शासनाने निधी वापरास परवानगी देण्याची विनंती केली. सरकारी वकील डी. आर. काळे यांनी शासनाचा आदेश योग्य असल्याचे म्हटले.

सुनावणीअंती शासनाने दाखल केलेल्या शपथपत्रात वादग्रस्त आदेश जारी करण्याची कोणतीही पार्श्वभूमी अथवा कारणमीमांसा केलेली नाही. १ जुलैपासून सुमारे ८ महिन्यांत सदर कामांचा पुन:आढावा घेतला नाही किंवा आजतागायत कोणतेही ठोस विधान केले नाही, असे निरीक्षण खंडपीठाने नोंदवून वरीलप्रमाणे आदेश दिला.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठCourtन्यायालयNandedनांदेडEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस