शहरं
Join us  
Trending Stories
1
Local Body Elections: नगरांच्या निवडणुकांमध्ये 'दुसरा' टप्पा, काही ठिकाणी २० डिसेंबरला मतदान
2
हाताला सलाइन, नाकाला ऑक्सिजन पाइप; छगन भुजबळांचा रुग्णालयातून प्रचार, भावनिक होत म्हणाले...
3
IND vs SA 1st ODI : टॉस गमावला, पण मॅच जिंकली! कसोटीतील बिघाडीनंतर टीम इंडियाची वनडे मालिकेत आघाडी
4
“कितीही करा कल्ला, मालवण शिवसेनेचाच बालेकिल्ला”: एकनाथ शिंदे; निलेश राणेंचेही केले कौतुक
5
“मुंबईत ठाकरेंचे काही चालणार नाही, उद्धव यांनी राज यांना सोबत घेऊन चूक केली”; कुणाचा दावा?
6
“नवरा १००₹ देत नव्हता, पण देवाभाऊ लाडक्या बहिणींना १५०० देतात”; भाजपा नेत्यांचे विधान चर्चेत
7
SIR तपासात गडबड उघड! गोव्यात ९० हजार मतदारांवरील मोठी विसंगती आली समोर; अधिकारी म्हणाले...
8
०१ डिसेंबरला रेल्वे नियम बदलणार! तत्काळ तिकिटासाठी लागणार OTP; मुंबईतील ‘या’ ट्रेनपासून सुरू
9
“जिकडे बॉम्बे असेल तिकडे मुंबई करू, शाळेची नावेही बदलू”; उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला निर्धार
10
IND vs SA 1st ODI : कुलदीपनं ३ चेंडूत फिरवली मॅच! एकाच ओव्हरमध्ये २ विकेट्स अन्...
11
VIDEO : "समझने वालों को इशारा काफी!" विराटला गंभीरची मिठी; पण रोहितची रिअ‍ॅक्शनच ठरली 'शोस्टॉपर'
12
दिल्लीतील पराभवानंतर अवध ओझा सरांचा राजकारणाला रामराम; AAP मधून बाहेर पडले...
13
VIDEO : "उपकार विसरू नका! नाहीतर…" बेताल वक्तव्य करणाऱ्या SA कोचला गावसकरांनी दिली ताकीद
14
IND vs SA : अनुभवी फलंदाजांनी पेश केला खास नजराणा; किंग कोहली अन् रोहितसह KL राहुलनं दाखवला क्लास!
15
छेड काढल्याचा आरोप, वैद्यकीय अधिकाऱ्याला नातेवाईकांची मारहाण
16
२४ तासांत ७ स्फोटांनी हादरले बलुचिस्तान! रेल्वे ट्रॅक बॉम्बने उडवला; पोलिस ठाण्यावर ग्रेनेड हल्ला
17
गीता जयंती २०२५: सगळी भगवद्गीता नको, सुखी जीवनासाठी ५ उपदेश कायम लक्षात ठेवा; वाचा, गीतासार
18
आईच्या कुशीत झोपलेल्या चिमुकल्याला बिबट्या घेऊन गेला, गावात भीतीचे वातावरण...
19
जगाला धक्का! नामिबियात 'एडोल्फ हिटलर' सलग पाचव्यांदा विजयी; वाद वाढताच नेत्याने घेतला मोठा निर्णय...
20
'रनमशिन' कोहलीचा मोठा पराक्रम! क्रिकेटच्या देवाला मागे टाकत बनला वनडेतील शतकांचा 'बादशहा'
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीवरून खडाजंगी

By admin | Updated: August 18, 2015 00:14 IST

बीड : जिल्हा नियोजन समितीच्या अंतर्गत गतवर्षात मंजूरी मिळालेल्या विकास कामांना निधीची तरतूद करण्यासाठी सोमवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली.

बीड : जिल्हा नियोजन समितीच्या अंतर्गत गतवर्षात मंजूरी मिळालेल्या विकास कामांना निधीची तरतूद करण्यासाठी सोमवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. मात्र, शेतकऱ्यांची कर्जमाफी, प्रारूप आराखडा या मुद्यावरून सत्ताधारी-विरोधकात खडाजंगी झाली.बैठकीला पालकमंत्री तथा ग्राम विकास मंत्री पंकजा मुंडे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खा. रजनी पाटील, खा. डॉ. प्रीतम मुंडे, आ. जयदत्त क्षीरसागर, आ. आर. टी. देशमुख, आ. भीमराव धोंडे, आ. लक्ष्मण पवार, आ. संगीता ठोंबरे, आ. अमरसिंह पंडित, जि. प. अध्यक्ष विजयसिंह पंडित, जि. प. उपाध्यक्षा आशा दौंड, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे यांच्यासह जि. प. सदस्यांची उपस्थिती होती.गत वर्षात जिल्हा नियोजन समिती अंतर्गत २४० कोटी ७८ लाख रूपयांचा निधी जून २०१५ मध्ये जिल्हा नियोजन समितीला प्राप्त झाला आहे. यानिधीच्या खर्चासंदर्भात नियोजन समितीची बैठक सोमवारी घेण्यात आली. नियोजन बैठक दुष्काळाच्या प्रश्नाभोवतीच फिरल्याचे चित्र पहावयास मिळाले. सत्ताधारी व प्रशासनावर विरोधी आमदारांनी कडाडून टीका केली. याप्रसंगी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दुष्काळाच्या उपाय योजनांचे मुद्दे पुढे केले.कर्जमाफीचा ठराव घ्या...दुष्काळाने शेतकऱ्यांचे जगणे अवघड झाले आहे. चारा, पाणी याची मोठी समस्या जिल्हयात निर्माण झालेली आहे. तीन वर्षांपासून शेतकऱ्यांना शेतातून एक रूपयाचे उत्पन्न मिळालेले नाही. यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडील कर्ज माफ करण्याचा ठराव सत्ताधाऱ्यांनी घ्यावा, अशी मागणी यावेळी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केली. हा विषय राज्यशासनाच्या अखत्यारित येतो. यामुळे हा निर्णय जिल्हा नियोजन समितीमध्ये घेता येणार नाही, असे पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी सांगताच सभागृहात विरोधकांनी गोंधळ सुरू केला. यावर अमरसिंह पंडित यांनी केवळ ठराव तरी घ्या असे सांगितल्यानंतर पालकमंत्री मुंडे यांनी कर्जमाफी संदर्भात ठराव घेण्यास सहमती दर्शविली असल्याचे सूत्रांनी सांगितले.प्रशासन उशिरा झाले जागेसद्यस्थितीत तीन ते चार टक्के पाणीसाठा जिल्हयात शिल्लक आहे. तीन-चार महिन्यापूर्वी अवैध पाणी उपसा थांबवला असता तर आज जिल्हयातील काही प्रकल्पांमध्ये पाणी शिल्लक राहिले असते. मात्र अवैध पाणी उपसा झाल्यानंतर जिल्हा प्रशासन जागे झाल्याचा आरोप यावेळी विरोधकांनी केला.पंकजा मुंडे यांनी साधले ‘टाईमिंग’फेंबु्रवारी २०१५ दरम्यान झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला पालकमंत्री पंकजा मुंडे या तब्बल एक तासाने उशिरा आल्या होत्या. या मुद्दयाचा विरोधकांनी बाऊ केला होता. सोमवारी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचा टाईमिंग पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी अचूक साधला. चक्क त्या बैठकीच्या अर्धातास अगोदर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दालनात उपस्थित होत्या. त्यांच्या पाठोपाठ १२:५५वा. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आ.जयदत्त क्षीरसागर, आ. अमरसिंह पंडित, जि. प. अध्यक्ष विजयसिंह पंडित, आ. विक्रम काळे आले. अगोदर आराखडा नंतरच निधी जिल्ह्यातील बहुतांश कामे अपूर्ण आहेत. निधी उचलायचा, कामे अर्धवट करून सोडून द्यायचे, असे प्रकार मोठ्या प्रमाणात होत आहेत. यामुळे मी नियमात राहून वेगळे काम करण्याचा प्रयत्न करत आहे. यापुढे अगोदर नियोजन आराखडा, नंतरच निधी व कामांची वेळोवेळी अधिकाऱ्यांमार्फत तपासणी करण्याच्या दृष्टिकोणातून भविष्यातील नियोजन करण्यात येईल असे पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.जलयुक्त शिवार योजनेसाठी दहा टक्के रक्कमटंचाई निवारणार्थ जलयुक्त शिवार योजनेसाठी आराखड्याच्या १० टक्के रक्कम ठेवण्यात आली असून १८ कोटी ५० लक्ष रूपयांचा निधी इतर योजनांतून वळविण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. (प्रतिनिधी)