शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
2
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
3
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
4
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे 29 महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
5
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
6
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
7
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
8
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
9
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
10
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
11
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
12
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
13
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
14
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
15
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
16
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
17
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
18
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
19
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
20
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
Daily Top 2Weekly Top 5

बीड बायपासवर आणखी किती बळी हवेत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 11:51 IST

विश्लेषण : या रस्त्यावर गेल्या काही वर्षांपासून सतत प्राणांतिक अपघात घडत आहेत. जानेवारी ते आजपर्यंत १० प्राणांतिक अपघात घडले. या अपघातात अकरा जणांचे बळी गेले.

ठळक मुद्देलोकप्रतिनिधी आणि अन्य सरकारी यंत्रणांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने सर्व्हिस रस्त्याचे काम रखडले पोलिसांनी जड वाहनांना सकाळी ८ ते ११ आणि दुपारी ५ ते ९ या कालावधीसाठी प्रवेशबंदी केली.

- बापू सोळुंके 

बीड बायपासवरील अपघात रोखण्यासाठी पोलीस यंत्रणेकडून सतत प्रयत्न होतात. मात्र, लोकप्रतिनिधी आणि अन्य सरकारी यंत्रणांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने बायपासवरील सर्व्हिस रस्त्याचे काम रखडले आहे. परिणामी बायपासवर घडणाऱ्या प्राणांतिक अपघातांची मालिका सुरूच आहे. बुधवारी एका अपघातात दुचाकीस्वार दोन मुलांचा बळी गेला. बायपासवर आणखी किती बळी हवेत, असा सवाल आता उपस्थित होत आहे.

बीड बायपासच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात नागरी वसाहती निर्माण झाल्या. त्यासोबतच या रस्त्यावर मंगल कार्यालये, हॉटेल्स, मोठी रुग्णालये आणि व्यावसायिक प्रतिष्ठानांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. मुख्यत: जालना रोडला पर्याय म्हणून बीड बायपास ओळखला जातो. आता हा रस्ता वळण रस्ता न राहता शहरातील अंतर्गत रस्त्याचाच भाग झाला आहे. या रस्त्यावरून बायपास ओलांडून दुचाकी अथवा लहान कारने शहरात येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली आहे. यात दुचाकीस्वारांची संख्या अधिक आहे. या रस्त्यावर गेल्या काही वर्षांपासून सतत प्राणांतिक अपघात घडत आहेत. जानेवारी ते आजपर्यंत १० प्राणांतिक अपघात घडले. या अपघातात अकरा जणांचे बळी गेले. आजच्या घटनेत दोन मुलांचा मृत्यू झाला. बायपासवरील अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी वाहतूक पोलिसांनी जड वाहनांना सकाळी ८ ते ११ आणि दुपारी ५ ते ९ या कालावधीसाठी प्रवेशबंदी केली. मात्र, ही प्रवेशबंदीच आता वाहनचालकांच्या जिवावर उठल्याचे दिसून येते. प्रवेशबंदीच्या कालावधीत सुमारे तीनशे ते साडेतीनशे ट्रक, हायवा आणि अन्य मोठी वाहने अडवून ठेवली जातात. प्रवेशबंदीचा कालावधी संपताच जड वाहनांचे चालक वेगात बायपासवर येतात. 

या वाहनचालकांमध्ये पुढे जाण्यासाठी आपसात जणू स्पर्धाच सुरू होते. यामुळे बायपास जड वाहनांनी व्यापून जातो. बायपासवर जड वाहनांचे चालक दुचाकी आणि कारसाठी एकही लेन शिल्लक ठेवत नाहीत. बायपासवर वर्षभरात झालेले बहुतेक प्राणांतिक अपघात हे जड वाहनांमुळेच झाले असून, या अपघातात दुचाकीस्वारांचेच बळी गेले आहेत. बायपासवरील वाढत्या अपघातांची संख्या पाहून पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी पुढाकार घेऊन बायपासवरील  सर्व्हिस रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलीस आयुक्तांच्या रेट्याखाली महिनाभर मनपा आणि जागतिक बँक अधिकाऱ्यांनी यासाठी प्रयत्न केले.

सर्व्हिस रस्त्यासाठी सुमारे तीनशे कोटींचा प्रस्ताव तयार केला. मात्र, राजकीय इच्छाशक्तीअभावी हा प्रस्ताव शासनाकडे पडून आहे.  शासनाने निधी मंजूर न केल्याने बायपासच्या सर्व्हिस रस्त्याचे काम रखडले आहे. सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी यासाठी मनापासून पुढाकार घेतला तर अशक्य काहीच नाही. शासनाकडून ३०० कोटी रुपये मंजूर करून आणल्यास सर्व्हिस रोडचा प्रश्न मार्गी लागून बायपासवरील आजच्या सारखा प्राणांतिक अपघात टाळता आला असता. मात्र, लोकप्रतिनिधींना आणखी किती बळी हवेत, असा सवाल उपस्थित होत आहे. 

टॅग्स :AccidentअपघातSatara areaसातारा परिसरAurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाPoliceपोलिस