शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बीड बायपासवर आणखी किती बळी हवेत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 11:51 IST

विश्लेषण : या रस्त्यावर गेल्या काही वर्षांपासून सतत प्राणांतिक अपघात घडत आहेत. जानेवारी ते आजपर्यंत १० प्राणांतिक अपघात घडले. या अपघातात अकरा जणांचे बळी गेले.

ठळक मुद्देलोकप्रतिनिधी आणि अन्य सरकारी यंत्रणांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने सर्व्हिस रस्त्याचे काम रखडले पोलिसांनी जड वाहनांना सकाळी ८ ते ११ आणि दुपारी ५ ते ९ या कालावधीसाठी प्रवेशबंदी केली.

- बापू सोळुंके 

बीड बायपासवरील अपघात रोखण्यासाठी पोलीस यंत्रणेकडून सतत प्रयत्न होतात. मात्र, लोकप्रतिनिधी आणि अन्य सरकारी यंत्रणांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने बायपासवरील सर्व्हिस रस्त्याचे काम रखडले आहे. परिणामी बायपासवर घडणाऱ्या प्राणांतिक अपघातांची मालिका सुरूच आहे. बुधवारी एका अपघातात दुचाकीस्वार दोन मुलांचा बळी गेला. बायपासवर आणखी किती बळी हवेत, असा सवाल आता उपस्थित होत आहे.

बीड बायपासच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात नागरी वसाहती निर्माण झाल्या. त्यासोबतच या रस्त्यावर मंगल कार्यालये, हॉटेल्स, मोठी रुग्णालये आणि व्यावसायिक प्रतिष्ठानांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. मुख्यत: जालना रोडला पर्याय म्हणून बीड बायपास ओळखला जातो. आता हा रस्ता वळण रस्ता न राहता शहरातील अंतर्गत रस्त्याचाच भाग झाला आहे. या रस्त्यावरून बायपास ओलांडून दुचाकी अथवा लहान कारने शहरात येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली आहे. यात दुचाकीस्वारांची संख्या अधिक आहे. या रस्त्यावर गेल्या काही वर्षांपासून सतत प्राणांतिक अपघात घडत आहेत. जानेवारी ते आजपर्यंत १० प्राणांतिक अपघात घडले. या अपघातात अकरा जणांचे बळी गेले. आजच्या घटनेत दोन मुलांचा मृत्यू झाला. बायपासवरील अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी वाहतूक पोलिसांनी जड वाहनांना सकाळी ८ ते ११ आणि दुपारी ५ ते ९ या कालावधीसाठी प्रवेशबंदी केली. मात्र, ही प्रवेशबंदीच आता वाहनचालकांच्या जिवावर उठल्याचे दिसून येते. प्रवेशबंदीच्या कालावधीत सुमारे तीनशे ते साडेतीनशे ट्रक, हायवा आणि अन्य मोठी वाहने अडवून ठेवली जातात. प्रवेशबंदीचा कालावधी संपताच जड वाहनांचे चालक वेगात बायपासवर येतात. 

या वाहनचालकांमध्ये पुढे जाण्यासाठी आपसात जणू स्पर्धाच सुरू होते. यामुळे बायपास जड वाहनांनी व्यापून जातो. बायपासवर जड वाहनांचे चालक दुचाकी आणि कारसाठी एकही लेन शिल्लक ठेवत नाहीत. बायपासवर वर्षभरात झालेले बहुतेक प्राणांतिक अपघात हे जड वाहनांमुळेच झाले असून, या अपघातात दुचाकीस्वारांचेच बळी गेले आहेत. बायपासवरील वाढत्या अपघातांची संख्या पाहून पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी पुढाकार घेऊन बायपासवरील  सर्व्हिस रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलीस आयुक्तांच्या रेट्याखाली महिनाभर मनपा आणि जागतिक बँक अधिकाऱ्यांनी यासाठी प्रयत्न केले.

सर्व्हिस रस्त्यासाठी सुमारे तीनशे कोटींचा प्रस्ताव तयार केला. मात्र, राजकीय इच्छाशक्तीअभावी हा प्रस्ताव शासनाकडे पडून आहे.  शासनाने निधी मंजूर न केल्याने बायपासच्या सर्व्हिस रस्त्याचे काम रखडले आहे. सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी यासाठी मनापासून पुढाकार घेतला तर अशक्य काहीच नाही. शासनाकडून ३०० कोटी रुपये मंजूर करून आणल्यास सर्व्हिस रोडचा प्रश्न मार्गी लागून बायपासवरील आजच्या सारखा प्राणांतिक अपघात टाळता आला असता. मात्र, लोकप्रतिनिधींना आणखी किती बळी हवेत, असा सवाल उपस्थित होत आहे. 

टॅग्स :AccidentअपघातSatara areaसातारा परिसरAurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाPoliceपोलिस