शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

गोदावरी पात्रात कावड भरताना तोल जाऊन पडलेल्या भाविकाचा बुडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2023 18:50 IST

धरणालगतच्या पुलावरुन अचानक तोल गेल्याने तरुण पाण्यात पडला

पैठण: जायकवाडी धरणाखालील पुलावरून गोदावरी नदीचे पाणी कावडीत भरताना तोल जाऊन पात्रात पडल्याने एका तरूणाचा शनिवारी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. लक्ष्मण भीमराव पवार (३१) रा.ज्योतिबाचीवाडी ता.कर्जत जि. अहमदनगर असे मयत तरुणांचे नाव आहे. गावातील कुलदेवतेच्या यात्रेनिमित्त गोदावरीचे पाणी घेऊन जाण्यासाठी तो गावातून  आलेल्या कावड यात्रेत पैठण येथे आला होता. 

याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार  ज्योतिबाचीवाडी येथे कुलदेवतेचा यात्रा उत्सव  साजरा करण्यात येतो. प्रथा परंपरेनुसार या गावातले तरुण पैठण येथील गोदावरीचे पवित्र पाणी घेऊन जाण्यासाठी पैठण येथे येतात.  शुक्रवारी  गावातल्या तरुणासोबत पाण्याची कावड घेऊन जाण्यासाठी लक्ष्मण भीमराव पवार हा तरुण आला होता. शनिवारी सकाळी ९ वाजेच्या दरम्यान धरणालगतच्या पुलावरुन अचानक तोल गेल्याने खाली पडला. यात डोक्याला जखम झाली व तो पाण्यात बुडाला. 

यावेळी परिसरातील नागरिकांनी त्यास वाचविण्याचा प्रयत्न केला परंतु यश आले नाही. खबर मिळताच पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने लक्ष्मण पवार यास पाण्याबाहेर काढून शासकीय रुग्णालयात हलवले परंतु डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले. घटनेची नोंद पैठण पोलीस ठाण्यात घेण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सतीश भोसले, गोपाळ पाटील, सहाय्यक फौजदार सुधीर वाव्हळ , पोलीस जमादार भाऊसाहेब ठोकळ हे करीत आहे.

 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादJayakwadi Damजायकवाडी धरणDeathमृत्यू