शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

मरणाने केली सुटका पण... धगधगत्या चितेला अचानक आलेल्या पुराने वेढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2022 14:38 IST

कन्नड तालुक्यातील आमदाबाद येथील अंजना नदीच्या पात्रात धगधगत्या चितेला पुराच्या पाण्याने वेढले.

नाचनवेल (औरंगाबाद) : कन्नड तालुक्यातील आमदाबाद येथील एका महिलेचे निधन झाल्यानंतर नातेवाईकांसह ग्रामस्थांनी नदी पात्रातील उंच जागेवर अंत्यसंस्कार केले; परंतु काही वेळातच नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने धगधगत्या चितेला पुराच्या पाण्याने वेढल्याची घटना बुधवारी सकाळी १० च्या सुमारास घडली.

नाचनवेल येथून जवळच असलेल्या आमदाबाद येथे स्वतंत्र अशी स्मशानभूमी विकसित केलेली नाही. गावाशेजारी असलेल्या अंजना नदीच्या पात्रालगतच मयतांवर अंत्यसंस्कार करण्यात येतात. दोन वर्षांपूर्वी अंजना नदीला आलेल्या पुरामुळे या नदीलगतचा ग्रामस्थांना जाण्याचा रस्ता वाहून गेला आहे. त्यामुळे सध्या या भागात झालेल्या पावसामुळे नदीपात्र परिसरात सर्वत्र पाणी साचले आहे. या गावाला दोन महिन्यांपूर्वी स्मशानभूमी विकासासाठी निधी मंजूर झाला आहे. परंतु सध्या पावसाळा असल्याने काम सुरू झालेले नाही. या पार्श्वभूमीवर या गावातील शांताबाई गोटीराम बनकर (वय ८५ वर्षे) यांचे मंगळवारी सायंकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी सकाळी १० वाजता नातेवाईक व ग्रामस्थांनी पाण्यातून जात अंजना नदीमध्ये उंच जागेवर अंत्यसंस्कार केले. चितेला भडाग्नी दिल्यानंतर काही वेळातच अंजना नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊ लागली. त्यानंतर काही क्षणातच धगधगत्या चितेला पुराच्या पाण्याने वेढले. त्यामुळे नातेवाईकांची अस्वस्थता वाढली. मात्र मोठ्या शर्थीने नातेवाईक व ग्रामस्थांनी प्रयत्न केल्याने मृतदेह जळाला.

वरील भागात पाऊस झाल्याने वाढली पाणी पातळीआमदाबाद येथील अंजना नदीच्या वरील भागात असलेल्या बिलदरी, कोळंबी, भारंबा आदी गावांच्या परिसरात मंगळवारी रात्री जोरदार पाऊस झाला. त्यामुळे अंजना नदीच्या पाणी पातळीत बुधवारी सकाळी वाढ झाली. शिवाय आमदाबाद गावाशेजारी या नदीवर कोल्हापुरी बंधारा असल्यानेही नदीपात्रात पाणी तुंबते. याचा फटका अंत्यसंस्कारासाठी आलेल्या ग्रामस्थांना बसतो.

 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादriverनदी