शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
4
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
5
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
6
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
8
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
9
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
10
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
11
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
12
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
13
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
14
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
15
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
16
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
17
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
18
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
19
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
20
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल

दोन महत्वाची शहरे रेल्वेपासून तोडली, औरंगाबादहून नागरपूरसाठी रोज धावतात ६८ ट्रॅव्हल्स

By संतोष हिरेमठ | Updated: November 17, 2022 18:42 IST

औरंगाबाद-नागपूर : कोरोनापूर्वी ३ रेल्वेंची कनेक्टिव्हिटी, आता फक्त बसचा पर्याय

- संतोष हिरेमठऔरंगाबाद : नागपूर ही महाराष्ट्र राज्याची उपराजधानी आहे. विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात होते. उद्योग, व्यवसाय, व्यापार, शिक्षणाबरोबर राजकीयदृष्ट्याही हे शहर महत्त्वाचे आहे. मात्र, औरंगाबादहून नागपूरला जायचे असेल तर सध्या ट्रॅव्हल्स आणि एसटी बसशिवाय पर्यायच उरला नाही. कारण कोरोनाकाळात ३ रेल्वेंची नागपूर कनेक्टिव्हिटीच तुटली आहे आणि त्याकडे लोकप्रतिनिधींबरोबर ‘दमरे’चे दुर्लक्ष होत आहे. परिणामी, औरंगाबादहून दररोज ६८ ट्रॅव्हल्स नागपूरसाठी धावत आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर काही कालावधीसाठी सर्व रेल्वे बंद करण्यात आल्या होत्या. टप्प्याटप्प्यांत नंतर रेल्वे सुरू करण्यात आला. या सगळ्यात नागपूर-मुंबई नंदीग्राम एक्स्प्रेस नागपूरऐवजी आदिलाबादहून सुरू करण्यात आली. कोल्हापूर-धनबाद एक्स्प्रेस ही रेल्वे १९ फेब्रुवारी २०२१ पासून लातूरमार्गे वळविण्यात आली, तर अजनी-मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस अजूनही रुळावर आलेली नाही. नागपूरला जायचे असेल तर आजघडीला प्रवाशांना ट्रॅव्हल्स, एसटी बसने प्रवास करण्याशिवाय पर्याय उरला नाही. ट्रॅव्हल्सने प्रवास करताना खिसा रिकामा करण्याचीही वेळ प्रवाशांवर ओढावत आहे. त्यामुळे नागपूरसाठी पुन्हा एकदा रेल्वे कनेक्टिव्हिटी देण्याची मागणी जोर धरत आहे.

रेल्वे कनेक्टिव्हिटी मिळावीऔरंगाबादला नागपूरसाठी रेल्वे कनेक्टिव्हिटी मिळाली पाहिजे. सल्लागार समितीच्या बैठकीत दक्षिण मध्य रेल्वेकडे यासंदर्भात मागणी केली जाईल.- महेश मल्लेकर, सदस्य, दक्षिण मध्य रेल्वे सल्लागार समिती

‘नंदीग्राम’ पूर्वीप्रमाणे चालवाऔरंगाबादहून अलोका, अमरावतीमार्गे नागपूरसाठी नवीन रेल्वे सुरू केली पाहिजे. शिवाय नंदीग्राम एक्स्प्रेसला पुन्हा एकदा नागपूरपर्यंत नेले पाहिजे.- राजकुमार सोमाणी, रेल्वे प्रवासी सेना

दोन रेल्वेंची आवश्यकताऔरंगाबादहून अमरावती आणि औरंगाबाद-नागपूरसाठी रेल्वे सुरू करण्याची गरज आहे. औरंगाबादमार्गे नागपूरसाठी धावणाऱ्या तीन रेल्वेंची कनेक्टिव्हिटी तुटली आहे. त्याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे.- स्वानंद सोळंके, रेल्वे अभ्यासक

- औरंगाबादहून नागपूरला धावणाऱ्या ट्रॅव्हल्स : ६८- ट्रॅव्हल्सचे नागपूरसाठीचे भाडे : ७०० रुपये ते २३०० रुपये- औरंगाबादहून नागपूरला धावणाऱ्या एसटी : १३-‘एसटी’चे नागपूरसाठी भाडे : ७६० ते १११०

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादrailwayरेल्वेtourismपर्यटन