शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

क्रूरता ! पत्नीचा खून, रडणाऱ्या मुलाचे बोट केले फ्रॅक्चर अन् चिमुकलीला डोळ्याजवळ मारला ठोसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 13:47 IST

Murder at Pisadevi आरोपीचे अघोरी कृत्य : आईला मारहाण होत असल्याचे पाहून रडारड करणाऱ्या ७ वर्षांच्या मुलाला मारहाण करून त्याच्या हाताचे बोट मोडले

ठळक मुद्देपिसादेवी येथील खून प्रकरणात आरोपी सापडेनापत्नीचा आधी आवळला गळा; नंतर डोक्यात घातला दगड, रॉड

औरंगाबाद : टोकाचा वाद झाल्यानंतर त्याने पत्नी कविताचा गळा आवळला व डोक्यात मोठा दगड घातला. एवढ्यावरच न थांबता रॉडने जबरदस्त प्रहार करून तिला ठार केल्याचे शवविच्छेदन अहवालात समोर आले. आईला मारहाण होत असल्याचे पाहून रडारड करणाऱ्या ७ वर्षांच्या मुलाला मारहाण करून त्याच्या हाताचे बोट मोडले आणि तीन वर्षांच्या मुलीच्या डोळ्याजवळ ठोसा मारल्याने तिच्या डोळ्याजवळ काळीनिळा व्रण झाला.

रक्ताने माखलेले हातपाय धुऊन शांत डोक्याने स्कूटी घेऊन पसार झालेला आरोपी सिद्धेश गंगासागर त्रिवेदी घटनेला ४० तास उलटल्यानंतरही पोलिसांच्या हाती लागला नाही. चिकलठाणा पोलिसांनी सांगितले की, पिसादेवी येथील रुख्मिणी स्क्वेअर अपार्टमेंटमधेल फ्लॅटमध्ये कविता त्रिवेदी यांची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करून त्यांचा पती पसार झाल्याची घटना मंगळवारी रात्री ८ वाजता समोर आली होती. मृताचे वडील जगदीश ईश्वरराव अवस्थी (रा. लोहनेर, ता. देवळा, जि. नाशिक) यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी सिद्धेशविरुद्ध चिकलठाणा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. बुधवारी सकाळी घाटी रुग्णालयात कविताचे शवविच्छेदन करण्यात आले. या अहवालानुसार कविताचा कशाने तरी गळा आवळण्यात आला. नंतर तिच्या डोक्यात जोरदार प्रहार करून खून करण्यात आल्याचे समोर आले. तिच्या संपूर्ण शरीरावर मारहाणीचे व्रण आहेत. यावरून अत्यंत निर्दयी आणि अमानुषपणे कविताला ठेचून मारण्यात आले. कविताच्या पार्थिवावर बुधवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास पिसादेवी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

आरोपीला पकडण्यासाठी तीन पथकेपोलीस उपअधीक्षक डॉ. विशाल नेहुल यांच्या मार्गदर्शनाखाली चिकलठाणा ठाण्याचे सहायक निरीक्षक विश्वास पाटील, पोलीस उपनिरीक्षक ठुबे, कर्मचारी रवींद्र साळवे, अजित शेकडे, सोपान डकले, दीपक देशमुख, दीपक सुरासे, अण्णा गावंडे आणि स्था.गु. शाखेच्या अधिकाऱ्यांची तीन पथके आरोपीचा शोध घेत आहेत.

सिद्धेशला अनुकंपातत्त्वावर मिळाली होती नोकरीसिद्धेशचे वडील आणि आई औरंगाबाद उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कार्यरत होते. सेवेत असताना त्याच्या आईचे निधन झाल्यामुळे अनुकंपातत्त्ववर त्याला बाजार समितीने लिपिक पदावर नोकरी दिली होती.

कविताच्या आई-वडिलांनी शेजाऱ्यांना केले कॉलमुलगी व जावई फोन उचलत नाहीत. यामुळे तिच्या आई-वडिलांनी कविताच्या शेजारी कुटुंबाला मोबाइलवर सायंकाळी ५ वाजता कॉल केला. तेव्हा त्यांनी घराला बाहेरून कुलूप आहे, तसेच आतून लहान मुलांच्या रडण्याचा आवाज येत असल्याचे सांगितले. यामुळे त्यांना संशय आल्याने अवस्थी कुटुंब लगेच औरंगाबादला येण्यास निघाले. त्यांच्या सांगण्यावरून शेजाऱ्यांनी घराचे कुलूप तोडून आत जाऊन पाहिले असता कविताचा खून झाल्याचे दिसले. रात्री ८ वाजता शेजाऱ्यांनी ही घटना पोलिसांना कळविली.