शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
5
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
6
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
7
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
8
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
9
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
10
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
11
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
12
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
13
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
14
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
15
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
16
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
17
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
18
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
19
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा

क्रूरता ! पत्नीचा खून, रडणाऱ्या मुलाचे बोट केले फ्रॅक्चर अन् चिमुकलीला डोळ्याजवळ मारला ठोसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 13:47 IST

Murder at Pisadevi आरोपीचे अघोरी कृत्य : आईला मारहाण होत असल्याचे पाहून रडारड करणाऱ्या ७ वर्षांच्या मुलाला मारहाण करून त्याच्या हाताचे बोट मोडले

ठळक मुद्देपिसादेवी येथील खून प्रकरणात आरोपी सापडेनापत्नीचा आधी आवळला गळा; नंतर डोक्यात घातला दगड, रॉड

औरंगाबाद : टोकाचा वाद झाल्यानंतर त्याने पत्नी कविताचा गळा आवळला व डोक्यात मोठा दगड घातला. एवढ्यावरच न थांबता रॉडने जबरदस्त प्रहार करून तिला ठार केल्याचे शवविच्छेदन अहवालात समोर आले. आईला मारहाण होत असल्याचे पाहून रडारड करणाऱ्या ७ वर्षांच्या मुलाला मारहाण करून त्याच्या हाताचे बोट मोडले आणि तीन वर्षांच्या मुलीच्या डोळ्याजवळ ठोसा मारल्याने तिच्या डोळ्याजवळ काळीनिळा व्रण झाला.

रक्ताने माखलेले हातपाय धुऊन शांत डोक्याने स्कूटी घेऊन पसार झालेला आरोपी सिद्धेश गंगासागर त्रिवेदी घटनेला ४० तास उलटल्यानंतरही पोलिसांच्या हाती लागला नाही. चिकलठाणा पोलिसांनी सांगितले की, पिसादेवी येथील रुख्मिणी स्क्वेअर अपार्टमेंटमधेल फ्लॅटमध्ये कविता त्रिवेदी यांची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करून त्यांचा पती पसार झाल्याची घटना मंगळवारी रात्री ८ वाजता समोर आली होती. मृताचे वडील जगदीश ईश्वरराव अवस्थी (रा. लोहनेर, ता. देवळा, जि. नाशिक) यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी सिद्धेशविरुद्ध चिकलठाणा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. बुधवारी सकाळी घाटी रुग्णालयात कविताचे शवविच्छेदन करण्यात आले. या अहवालानुसार कविताचा कशाने तरी गळा आवळण्यात आला. नंतर तिच्या डोक्यात जोरदार प्रहार करून खून करण्यात आल्याचे समोर आले. तिच्या संपूर्ण शरीरावर मारहाणीचे व्रण आहेत. यावरून अत्यंत निर्दयी आणि अमानुषपणे कविताला ठेचून मारण्यात आले. कविताच्या पार्थिवावर बुधवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास पिसादेवी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

आरोपीला पकडण्यासाठी तीन पथकेपोलीस उपअधीक्षक डॉ. विशाल नेहुल यांच्या मार्गदर्शनाखाली चिकलठाणा ठाण्याचे सहायक निरीक्षक विश्वास पाटील, पोलीस उपनिरीक्षक ठुबे, कर्मचारी रवींद्र साळवे, अजित शेकडे, सोपान डकले, दीपक देशमुख, दीपक सुरासे, अण्णा गावंडे आणि स्था.गु. शाखेच्या अधिकाऱ्यांची तीन पथके आरोपीचा शोध घेत आहेत.

सिद्धेशला अनुकंपातत्त्वावर मिळाली होती नोकरीसिद्धेशचे वडील आणि आई औरंगाबाद उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कार्यरत होते. सेवेत असताना त्याच्या आईचे निधन झाल्यामुळे अनुकंपातत्त्ववर त्याला बाजार समितीने लिपिक पदावर नोकरी दिली होती.

कविताच्या आई-वडिलांनी शेजाऱ्यांना केले कॉलमुलगी व जावई फोन उचलत नाहीत. यामुळे तिच्या आई-वडिलांनी कविताच्या शेजारी कुटुंबाला मोबाइलवर सायंकाळी ५ वाजता कॉल केला. तेव्हा त्यांनी घराला बाहेरून कुलूप आहे, तसेच आतून लहान मुलांच्या रडण्याचा आवाज येत असल्याचे सांगितले. यामुळे त्यांना संशय आल्याने अवस्थी कुटुंब लगेच औरंगाबादला येण्यास निघाले. त्यांच्या सांगण्यावरून शेजाऱ्यांनी घराचे कुलूप तोडून आत जाऊन पाहिले असता कविताचा खून झाल्याचे दिसले. रात्री ८ वाजता शेजाऱ्यांनी ही घटना पोलिसांना कळविली.