शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
7
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
8
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
9
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
10
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
11
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
12
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
13
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
14
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
15
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
16
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
17
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
18
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
19
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
20
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!

क्रूरता ! पत्नीचा खून, रडणाऱ्या मुलाचे बोट केले फ्रॅक्चर अन् चिमुकलीला डोळ्याजवळ मारला ठोसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 13:47 IST

Murder at Pisadevi आरोपीचे अघोरी कृत्य : आईला मारहाण होत असल्याचे पाहून रडारड करणाऱ्या ७ वर्षांच्या मुलाला मारहाण करून त्याच्या हाताचे बोट मोडले

ठळक मुद्देपिसादेवी येथील खून प्रकरणात आरोपी सापडेनापत्नीचा आधी आवळला गळा; नंतर डोक्यात घातला दगड, रॉड

औरंगाबाद : टोकाचा वाद झाल्यानंतर त्याने पत्नी कविताचा गळा आवळला व डोक्यात मोठा दगड घातला. एवढ्यावरच न थांबता रॉडने जबरदस्त प्रहार करून तिला ठार केल्याचे शवविच्छेदन अहवालात समोर आले. आईला मारहाण होत असल्याचे पाहून रडारड करणाऱ्या ७ वर्षांच्या मुलाला मारहाण करून त्याच्या हाताचे बोट मोडले आणि तीन वर्षांच्या मुलीच्या डोळ्याजवळ ठोसा मारल्याने तिच्या डोळ्याजवळ काळीनिळा व्रण झाला.

रक्ताने माखलेले हातपाय धुऊन शांत डोक्याने स्कूटी घेऊन पसार झालेला आरोपी सिद्धेश गंगासागर त्रिवेदी घटनेला ४० तास उलटल्यानंतरही पोलिसांच्या हाती लागला नाही. चिकलठाणा पोलिसांनी सांगितले की, पिसादेवी येथील रुख्मिणी स्क्वेअर अपार्टमेंटमधेल फ्लॅटमध्ये कविता त्रिवेदी यांची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करून त्यांचा पती पसार झाल्याची घटना मंगळवारी रात्री ८ वाजता समोर आली होती. मृताचे वडील जगदीश ईश्वरराव अवस्थी (रा. लोहनेर, ता. देवळा, जि. नाशिक) यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी सिद्धेशविरुद्ध चिकलठाणा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. बुधवारी सकाळी घाटी रुग्णालयात कविताचे शवविच्छेदन करण्यात आले. या अहवालानुसार कविताचा कशाने तरी गळा आवळण्यात आला. नंतर तिच्या डोक्यात जोरदार प्रहार करून खून करण्यात आल्याचे समोर आले. तिच्या संपूर्ण शरीरावर मारहाणीचे व्रण आहेत. यावरून अत्यंत निर्दयी आणि अमानुषपणे कविताला ठेचून मारण्यात आले. कविताच्या पार्थिवावर बुधवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास पिसादेवी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

आरोपीला पकडण्यासाठी तीन पथकेपोलीस उपअधीक्षक डॉ. विशाल नेहुल यांच्या मार्गदर्शनाखाली चिकलठाणा ठाण्याचे सहायक निरीक्षक विश्वास पाटील, पोलीस उपनिरीक्षक ठुबे, कर्मचारी रवींद्र साळवे, अजित शेकडे, सोपान डकले, दीपक देशमुख, दीपक सुरासे, अण्णा गावंडे आणि स्था.गु. शाखेच्या अधिकाऱ्यांची तीन पथके आरोपीचा शोध घेत आहेत.

सिद्धेशला अनुकंपातत्त्वावर मिळाली होती नोकरीसिद्धेशचे वडील आणि आई औरंगाबाद उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कार्यरत होते. सेवेत असताना त्याच्या आईचे निधन झाल्यामुळे अनुकंपातत्त्ववर त्याला बाजार समितीने लिपिक पदावर नोकरी दिली होती.

कविताच्या आई-वडिलांनी शेजाऱ्यांना केले कॉलमुलगी व जावई फोन उचलत नाहीत. यामुळे तिच्या आई-वडिलांनी कविताच्या शेजारी कुटुंबाला मोबाइलवर सायंकाळी ५ वाजता कॉल केला. तेव्हा त्यांनी घराला बाहेरून कुलूप आहे, तसेच आतून लहान मुलांच्या रडण्याचा आवाज येत असल्याचे सांगितले. यामुळे त्यांना संशय आल्याने अवस्थी कुटुंब लगेच औरंगाबादला येण्यास निघाले. त्यांच्या सांगण्यावरून शेजाऱ्यांनी घराचे कुलूप तोडून आत जाऊन पाहिले असता कविताचा खून झाल्याचे दिसले. रात्री ८ वाजता शेजाऱ्यांनी ही घटना पोलिसांना कळविली.