शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
4
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
5
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
6
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
7
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
8
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
9
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
10
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
11
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
12
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
13
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
14
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
15
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
16
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
17
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
18
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!
19
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
20
हा दिग्गज १०८ अब्ज डॉलर्सची संपत्ती दान करणार; ठरणार आजवरचं सर्वात मोठं परोपकारी कार्य

क्रूरकर्मा! हत्येनंतर आरोपींनी मृतदेहाला आंघोळ घातली, त्याचे कपडे बदलले; घाटी रुग्णालयात नेले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2022 13:05 IST

चोरीच्या संशयावरून मनोजला सुरुवातीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. मात्र, तो दाद देत नसल्याचे लक्षात येताच त्यांनी त्याचे हातपाय बांधून फावड्याच्या दांड्याने त्यास ठेचले.

औरंगाबाद : चोरीच्या संशयावरून मनोजची हत्या केल्यानंतर मारेकऱ्यांनी अत्यंत शांतपणे त्याच्या अंगावरील फाटलेले कपडे, रक्ताचे डाग पाहून डॉक्टरांना संशय येऊ नये, यासाठी त्याला स्नान घातले. त्याच्या अंगावरील रक्ताचे डाग पुसून शरीर स्वच्छ केले. एवढेच नव्हे तर त्यांनी त्याच्या अंगावरील फाटके कपडे काढून दुसरे कपडे घातल्याची माहिती पोलीस चाैकशीत समोर आली.

पोलीस सूत्राने सांगितले की, आरोपींना पकडल्यानंतर त्यांनी दिलेली माहिती धक्कादायक आहे. चोरीच्या संशयावरून मनोजला सुरुवातीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. मात्र, तो दाद देत नसल्याचे लक्षात येताच त्यांनी त्याचे हातपाय बांधून फावड्याच्या दांड्याने त्यास ठेचले. हे करताना प्रत्येकाने त्याला दांड्याचे फटके दिले. मारहाणीत घायाळ झालेला मनोज चोरी केली नसल्याचे रडत सांगत होता. मात्र, निर्दयी आरोपींना त्याची दया आली नाही. कोणी दांड्याने तर कोणी लाथाबुक्क्यांनी सुमारे तासभर त्याला मारहाण केली. यात तो मरण पावल्याचे आरोपींच्या लक्षात आले. नंतर स्नान घालून, अंगावरील कपडे बदलून त्यास घाटीत नेले. घाटीतील डॉक्टरांना मनोज खासगी रुग्णालयाजवळ पडलेला होता, अशी खोटी माहिती देऊन बनवेगिरी केली.

तरुणाला मारहाण करताना देत होते घोषणामनोजला मारहाण करताना आरोपी ‘मांगीरबाबा की जय’ अशा घोषणा देत होते. त्यांच्यापैकी काही जण मनोजच्या डोक्याला आणि खांद्याला मारू नका, असे म्हणत होते.

नऊ महिन्यांपूर्वी झाली होती आकाश राजपूतची अशीच हत्यागतवर्षी ९ ऑगस्टला हनुमाननगर येथील चौकात तनपुरे गँगने आकाश राजपूत या तरुणाची पूर्ववैमनस्यातून धारदार शस्त्राने निर्घृण हत्या केली होती. भर चौकात आरोपी आकाशची हत्या करीत होते. मात्र, गँगच्या दहशतीमुळे त्याच्या मदतीला कोणीही धावले नव्हते. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपींना अटक केली. आरोपी अद्यापही जेलमध्ये आहेत. मनोजची हातपाय बांधून निर्दयीपणे हत्या झाल्याने शहरवासीयांना आकाशच्या हत्येची आठवण झाली. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू