शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

दलाई लामांना निरोप देण्यासाठी चिकलठाणा विमानतळावर गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 11:35 IST

दलाई लामांनी निर्मळ हास्याने घेतला शहरवासीयांचा निरोप

ठळक मुद्दे धम्मदेसनेनंतर उपासक झाले भावुक

औरंगाबाद :  जागतिक बौद्ध धम्मगुरू पूजनीय दलाई लामा रविवारी दुपारी १२.४५ वाजता चिकलठाणा विमानतळावरून चार्टर विमानाने दिल्लीला रवाना झाले. यावेळी त्यांना निरोप देण्यासाठी उपासक-उपासिकांची मोठी गर्दी झाली होती. अनेकांची आस्थेवाईकपणे चौकशी करीत आपल्या निर्मळ हास्याने दलाई लामा यांनी सर्वांचा निरोप घेतला. 

पूजनीय दलाई लामा यांच्या प्रमुख उपस्थितीत नागसेनवनातील पीईएसच्या क्रीडा संकुलावर २२ ते २४ नोव्हेंबरदरम्यान जागतिक धम्म परिषद पार पडली. २२ नोव्हेंबर रोजी दिल्लीहून औरंगाबाद विमानतळावर चार्टर विमानाने दलाई लामा यांचे शहरात आगमन झाले होते. ३ दिवसांच्या परिषदेनंतर रविवारी दुपारी ते दिल्लीला रवाना झाले. विमानतळावर आगमन होताच प्राधिकरणातर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले. 

दलाई लामा यांचे सान्निध्य मिळावे, म्हणून उपासक-उपासिकांनी एकच गर्दी केली होती. विमानतळावर प्रवेश केल्यापासून, तर विमानात बसेपर्यंत दलाई लामा यांनी अनेकांशी संवाद साधला. अनेकांच्या डोक्यावर हात ठेवत होते. अनेकांना ते दुरूनच हात उंचावून प्रतिसाद देत होते. यावेळी अनेक जण त्यांच्यासोबतचा हा क्षण मोबाईलमध्ये कैद करीत होते. विमानतळाचे संचालक डी.जी. साळवे यांच्यासह अधिकारी-कर्मचाºयांची उपस्थिती होती. यावेळी विमानतळावर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

टॅग्स :Dalai Lamaदलाई लामाAurangabadऔरंगाबादAurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ