शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

मराठवाडा, विदर्भात शेती अन् पिकेही पाण्याखाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2021 08:56 IST

अनेक गावांचा संपर्क तुटला; सोयाबीन, तूर, कपाशीचे मोठे नुकसान

ठळक मुद्देअकोला, बुलडाणा व वाशिम या तिन्ही जिल्ह्यांत पावसाने कहर केला आहे. यवतमाळ, वर्धा आणि अमरावती जिल्ह्यातील १३ तालुक्यांत मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंत अतिवृष्टी झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद/नागपूर : विदर्भ आणि मराठवाड्यात सलग सुरू असलेल्या जोरदार पावसाने नदी-नाल्यांना पूर आले आहेत. शेतजमिनीत पाणी शिरल्याने पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. सोयाबीन, तूर आदी पिके पाण्यात गेली आहेत, तर उडीद, मुगाची काढणी अडचणीत आली आहे. मराठवाड्यात सलग तीन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसाने नदी-नाल्यांना पूर आले आहेत. अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. बीड जिल्ह्याला तिसऱ्या दिवशीही मुसळधार पावसाने झोडपले. गेवराई तालुक्यातील राजापूरचा इतर गावांशी संपर्क तुटला आहे. जालना, औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यातही दमदार पाऊस झाला. लातूर जिल्ह्यात मांजरा व तेरणा नदीवरील बंधारे पूर्ण क्षमतेने भरले आहेत. हिंगोली जिल्ह्यातील २० मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली असून, चार दिवसांत पुराच्या पाण्याने तिघांचा बळी घेतला आहे. परभणी जिल्ह्यात गोदावरी, पूर्णा, दुधना या नद्यांसह ओढ्यांना पूर आला असून, पालम-गंगाखेड, गंगाखेड-परभणी, ताडकळस-पालम इ. प्रमुख मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. 

अकोला, बुलडाणा व वाशिम या तिन्ही जिल्ह्यांत पावसाने कहर केला आहे. यवतमाळ, वर्धा आणि अमरावती जिल्ह्यातील १३ तालुक्यांत मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंत अतिवृष्टी झाली.  वर्धा जिल्ह्यातील तीन तालुक्यांत अतिवृष्टी झाली. निम्न वर्धा प्रकल्पाचे ३१, तर बोर धरण प्रकल्पाचे सात दरवाजे उघडण्यात आले. चंद्रपूर जिल्ह्यात सर्वत्र तीन दिवसांपासून सातत्याने पाऊस पडत आहे. जळगाव जिल्ह्यात वाघूर व हतनूर धरणात पाण्याची आवक सुरू आहे. धरणांच्या पातळीत वाढ होत आहे. हतनूर धरणाचे १४ दरवाजे पूर्णपणे उघडले व वाघूर धरणाचेही दरवाजे उघडावे लागण्याची शक्यता आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊसCrop Loanपीक कर्ज