शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

मराठवाडा, विदर्भात शेती अन् पिकेही पाण्याखाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2021 08:56 IST

अनेक गावांचा संपर्क तुटला; सोयाबीन, तूर, कपाशीचे मोठे नुकसान

ठळक मुद्देअकोला, बुलडाणा व वाशिम या तिन्ही जिल्ह्यांत पावसाने कहर केला आहे. यवतमाळ, वर्धा आणि अमरावती जिल्ह्यातील १३ तालुक्यांत मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंत अतिवृष्टी झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद/नागपूर : विदर्भ आणि मराठवाड्यात सलग सुरू असलेल्या जोरदार पावसाने नदी-नाल्यांना पूर आले आहेत. शेतजमिनीत पाणी शिरल्याने पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. सोयाबीन, तूर आदी पिके पाण्यात गेली आहेत, तर उडीद, मुगाची काढणी अडचणीत आली आहे. मराठवाड्यात सलग तीन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसाने नदी-नाल्यांना पूर आले आहेत. अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. बीड जिल्ह्याला तिसऱ्या दिवशीही मुसळधार पावसाने झोडपले. गेवराई तालुक्यातील राजापूरचा इतर गावांशी संपर्क तुटला आहे. जालना, औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यातही दमदार पाऊस झाला. लातूर जिल्ह्यात मांजरा व तेरणा नदीवरील बंधारे पूर्ण क्षमतेने भरले आहेत. हिंगोली जिल्ह्यातील २० मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली असून, चार दिवसांत पुराच्या पाण्याने तिघांचा बळी घेतला आहे. परभणी जिल्ह्यात गोदावरी, पूर्णा, दुधना या नद्यांसह ओढ्यांना पूर आला असून, पालम-गंगाखेड, गंगाखेड-परभणी, ताडकळस-पालम इ. प्रमुख मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. 

अकोला, बुलडाणा व वाशिम या तिन्ही जिल्ह्यांत पावसाने कहर केला आहे. यवतमाळ, वर्धा आणि अमरावती जिल्ह्यातील १३ तालुक्यांत मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंत अतिवृष्टी झाली.  वर्धा जिल्ह्यातील तीन तालुक्यांत अतिवृष्टी झाली. निम्न वर्धा प्रकल्पाचे ३१, तर बोर धरण प्रकल्पाचे सात दरवाजे उघडण्यात आले. चंद्रपूर जिल्ह्यात सर्वत्र तीन दिवसांपासून सातत्याने पाऊस पडत आहे. जळगाव जिल्ह्यात वाघूर व हतनूर धरणात पाण्याची आवक सुरू आहे. धरणांच्या पातळीत वाढ होत आहे. हतनूर धरणाचे १४ दरवाजे पूर्णपणे उघडले व वाघूर धरणाचेही दरवाजे उघडावे लागण्याची शक्यता आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊसCrop Loanपीक कर्ज